शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

हा विजय वाचाळवीरांसाठी सणसणीत टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST

पुणे : आजचा जो विजय आम्हाला मिळाला आहे, त्यावरून सुशिक्षित आणि शिक्षक वर्ग आमच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपची ...

पुणे : आजचा जो विजय आम्हाला मिळाला आहे, त्यावरून सुशिक्षित आणि शिक्षक वर्ग आमच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपची मक्तेदारी असलेली पुणे, नागपुरची जागाही आम्ही जिंकली आहे. त्यामुळे जे वाचावळवीर आहेत, त्यांना हा एक सणसणीत टोला बसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इंन्सिट्युटमध्ये एका बैठकीसाठी पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, आजच्या विजयाने महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. भविष्यातील निवडणूका देखील आम्ही एकत्रित करीत आहोत. आमच्या वेगळं लढण्याने विरोधकांचं फावणार असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही. यासाठी तीनही पक्षांचे वरीष्ठ निर्णय घेणार आहेत. अमरावतीची जागा जिंकता आली असती तर आणखी आनंद झाला असता. तिथं जे घडलं त्याचं दुःख आहे.

जयंत पाटील म्हणाले,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यावर महाराष्ट्राच चित्र कसे असेल, हे या निवडणुकीत दिसून आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलणे आवश्यक नाही. त्यांच्या आव्हानाबद्दल नंतर बघता येईल. भाजपच्या काही नेत्यांना स्वप्न पडतात की ऑपरेशन लोटस करु, महाविकास आघाडीच्या आमदारांना अमिष दाखवून राजीनामा द्यायला लावायचे आणि सरकारला धोका निर्माण करायचा. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जरी राजीनामा दिला आणि त्यांनी पुन्हा निवडणूक लढवायची ठरवले, तरी महाविकास आघाडी त्यांना पराभूत करेल.

धुळे- नंदुरबारमधे भाजपने आमचेच उमेदवार फोडून निवडणूक लढवली. अमरीश पटेल यांच्याव्यतिरिक्त इतर उमेदवार असता. तर वेगळा निकाल लागला असता. पदवीधरचा मतदार हा चिकित्सक आणि विचारी असतो. त्यामुळे या निकालाचे वेगळं महत्व आहे. तसेच जयसिंगराव गायकवाड आल्याने महाविकास आघाडीला फायदा झाला असल्याचे टोपे म्हणाले.