शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने घेतला बळी

By admin | Updated: March 31, 2016 03:04 IST

गावाकडे पडलेल्या दुष्काळामुळे पोट ‘जगवण्या’साठी पुण्यामध्ये आलेल्या कुटुंबाची पाण्याची वणवण काही थांबली नाही. पुण्यासारख्या शहरातही पाठी लागलेल्या पाणीटंचाईने शेवटी

पुणे : गावाकडे पडलेल्या दुष्काळामुळे पोट ‘जगवण्या’साठी पुण्यामध्ये आलेल्या कुटुंबाची पाण्याची वणवण काही थांबली नाही. पुण्यासारख्या शहरातही पाठी लागलेल्या पाणीटंचाईने शेवटी त्यांच्या घरातल्या अवघ्या बारा वर्षांच्या मुलीचा बळी घेतला. पिण्यासाठी पाणी आणायला जात असताना, अज्ञात वाहनाने या मुलीला धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.किरण बाळासाहेब मांडे (वय १२, रा. तापकीरचाळ, बाणेर गावठाण) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार रवींद्र देवरुखकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडे कुटुंब मूळचे परभणी जिल्ह्यामधले आहे. मागील तीन वर्षांपासून मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे. कामधंद्यासाठी दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेल्या बाळासाहेब मांडेंचे कुटुंब मोलमजुरी करून जगत होते. बाणेर गावठाणातील तापकीर चाळीमध्ये एका खोलीत हे कुटुंब राहाते. गावाकडे पाणी नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागलेल्या या कुटुंबाला पुण्यातही पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास किरण पाणी आणण्याकरिता सायकलवरून जात होती. त्या वेळी भरधाव आलेल्या मोटारीने तिला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या किरणला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघात केलेला मोटारचालक गाडीसह पसार झाला. (प्रतिनिधी)उपनिरीक्षकाला सौजन्याचे वावडेया अपघाताची माहिती घेण्यासाठी चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. बी. बाबर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यापुढे कोणत्याही गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी मला फोन करायचा नाही. माहिती प्रेसरूमला पाठवतो, त्यामुळे माहिती त्याठिकाणावरूनच घ्यावी अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना प्रथम संपर्क साधला असता, आपण अद्याप घटनेची कागदपत्रेच पाहिली नसल्याचे उत्तर दिले. एवढ्याशा गुन्ह्याच्या माहितीसाठी आमच्या वरिष्ठांना कशाला फोन करता, असा प्रश्नही त्यांनी केला. एवढा गंभीर गुन्हा घडूनही त्याबाबत असलेली तपास अधिकाऱ्यामधली उदासीनता यानिमित्ताने समोर आली. मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबाची माहिती देण्यास चतु:शृंगी पोलिसांनी शेवटपर्यंत टाळाटाळ का केली, हे न उलगडलेले कोडे आहे.