शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

पुणेकरांनी घेतला अनेक प्रजातींचा बळी

By admin | Updated: July 4, 2015 00:08 IST

नदीसुधार योजनेसाठी केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेला तब्बल ९०० कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत पुणेकरांनी केलेल्या प्रदूषणामुळे अनेक दुर्मिळ मासे,

सुनील राऊत, पुणेनदीसुधार योजनेसाठी केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेला तब्बल ९०० कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत पुणेकरांनी केलेल्या प्रदूषणामुळे अनेक दुर्मिळ मासे, वनस्पतींच्या प्रजातीच नष्ट झाल्या आहेत. शहराच्या लोकसंख्येने २५ लाखांचा आकडा गाठला आहे. त्यामुळे शहराची पाण्याची मागणी साडेचार टीएमसीवरून थेट १६ टीएमसीवर पोहोचली. परिणामी शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे आजवर्षाला निर्माण होणारे तब्बलआठ टीएमसी पाणी थेट नदीत सोडले जात असून त्यातील केवळ दोन ते अडीच टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करणे महापालिकेस शक्य झाले आहे.नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या या सांडपाणी तसेच राडारोडा आणि कचऱ्याने मुठा नदीच्या पोटातील जैवसृष्टीचा बळी घेतला आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मुठा नदीपात्रात पत्थर चाटू मासा तसेच मुंगूस लोचमासा यांचे अस्तित्व संपले आहे. याशिवाय वाघ्या बेडकासह असंख्या प्रजातीही नामशेष झालेल्या आहेत. या माशांबरोबरच ‘इक्वीसिटम’, हार्सटेल, क्रिप्टो कोरीनी, व्हँली स्कारीया या वनस्पती नष्ट झालेल्या आहेत. अनेक पक्षांचे तसेच कीटकांचे अधिवास असलेले पाणकणीस, रानटी केवडा, माती पकडून ठेवणारे आणि नदीचे पाणी शुध्द करणारे वाळूंज या वनस्पतीही नामशेष झालेल्या आहेत. तर लागरी, (पाणकोंबडी), फेजन टेल जसाना हे मुठा नदीवर दिसणारे परदेशी तसेच देशी प्रजातीचे पक्षीही नाहीसे झाले आहेत. नदीपात्रात कचरा आणि राडारोडा टाकला जात असल्याने नदीत केवळ कावळे आणि घारीच दिसत आहेत.२00१ पर्यंत पुणे मनपा हद्दीमध्ये ४00 एमएलडी मैलापाण्याची निर्मिती होत होती. सध्या हे प्रमाण ८५0 एमएलडीवर पोहोचलेले आहे. केवळ ३५0 एमएलडी पाण्यावरच महापालिकेस शुध्दीकरण प्रक्रीया करणे शक्य झालेले आहे. त्यामुळे उर्वरीत पाणी थेट नदीत सोडले जात आहे. नैसर्गिक विघटन प्रक्रिया ठप्पमुठा नदीला वर्षात पावसाळ््यातील काही दिवसच पाणी असते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात निर्माण होणारे सांडपाणी नाले, तसेच डे्रनेज वाहिन्यांमधून थेट नदीत आल्याने नदीतील जीवसृष्टी टिकण्यासाठी आवश्यक असलेले बीओडी, सीओडी तसेच डीओचे प्रमाण प्रदूषण नियंत्रक महामंडळाने घालून दिलेल्या निकषांपेक्षा कमी आहे. त्यामुळे नदीतील मासे, तसेच इतर वनस्पतींचे अस्तित्व महापालिकेच्या हद्दीत संपुष्टात आले आहेत.