शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडीची ‘वाट’ लावणार; पुणे महापालिकेचा नवा ‘प्लान’ रेडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 13:27 IST

वेताळ टेकडीचे नुकसान होणार असल्याने पुणेकरांचा विरोध, पालिकेने अलाइनमेंट बदलूनही अधिक नुकसान

पुणे: बालभारती-पौड रस्त्याच्या प्रकल्पात महापालिकेने पुन्हा बदल केले असून, टेकडीची वाट लावण्यासाठी ‘नवा प्लान’ बनवला आहे. रस्त्यातील हे नवीन बदल टेकडीसाठी अधिक घातक आहेत. नव्या प्लानसाठी पर्यावरणावरील नुकसानीच्या प्रभावाचा (ईआयए) अहवालही केलेला नाही. जुन्या अहवालावरच हा प्रकल्प रेटला जात आहे. तज्ज्ञ समितीचा अंतिम अभिप्राय असल्याशिवाय प्रकल्प करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही त्याकडेही दुर्लक्ष करून हा प्रकल्प पुणे महापालिका रेटत आहे, अशी माहिती महापालिकेच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रशांत इनामदार यांनी दिली आहे.

लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने बालभारती-पौड रस्ता प्रस्तावित केला. यामुळे वेताळ टेकडीला नुकसान होणार असल्याने पुणेकरांनी विरोध केला; परंतु काही दिवस शांत बसल्यानंतर पुणे महापालिकेने आता पुन्हा या रस्त्याच्या अलाइनमेंट बदलल्या आहेत. त्या अतिशय मोठ्या असून, त्यामुळे टेकडीचे अधिक नुकसान होणार आहे. त्याची माहिती बालभारती-पौड रस्त्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रशांत इनामदार यांना माहिती अधिकाराखाली समजली. त्यामुळे त्यांनी लगेच महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हा प्रकल्प थांबविण्याची मागणी केली आहे.

नव्या बदलांसाठी पुन्हा नवीन ‘ईआयए’ अहवाल आणि वाहतूक कोंडीचा सर्व्हे करणे अपेक्षित आहे. जो महापालिकेने केलेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प ते राबवू शकत नाहीत. तसेच उच्च न्यायालयाने या प्रकल्पाबाबत अतिशय महत्त्वपूर्ण निर्देश दिलेले आहेत. त्यात असे म्हटले आहे की, तज्ज्ञ समितीच्या अंतिम अभिप्रायानंतरच हा प्रकल्प राबवावा; परंतु महापालिकेने या तज्ज्ञ सदस्यांना कानाडोळा करून प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, असेही इनामदार म्हणाले.

काय केले नवे बदल?

- पूर्वी टेकडीवरून रस्ता जाणार होता. तो आता उड्डाणपुलात रूपांतरित केला जाणार आहे.- पौड रस्त्याजवळ पूल संपतो तिकडे दोन्ही बाजूला टाऊनशिपला मान्यता- सेनापती बापट रस्त्यावर भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल प्रस्तावित

जुलै २०२३ मध्ये नवीन बदल केले

महापालिकेने प्रकल्पामध्ये जुलै २०२३ मध्ये नवीन बदल केले. त्याची माहिती आम्हाला देखील देण्यात आली नाही. उच्च न्यायालयानुसार ते तज्ज्ञ सदस्यांना देणे बंधनकारक आहे. तसेच नवीन बदलांचा पुन्हा पर्यावरणावर परिणाम करणारा अहवाल (ईआयए) करणे अपेक्षित आहे. जो केलेला नाही. जुन्या अहवालांवर हा प्रस्ताव रेटला जात आहे. नवीन टाऊनशिपला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तिथे सर्वच बाबतीत प्रदूषण होईल. म्हणून हा प्रस्ताव सुरू करू नये आणि पुन्हा नव्याने ‘ईआयए’ अहवाल करावा आणि वाहतुकीचा सर्वेही करावा. - प्रशांत इनामदार, सदस्य, पुणे महापालिका बालभारती-पौड रस्ता तज्ज्ञ समिती

 बालभारती - पौड रस्त्याची गरजच नाही

सध्या मेट्रोचा विस्तार होत आहे. पुणेकरांनी त्याचा अधिकाधिक वापर करावा. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच पर्यावरणाचे नुकसान थांबेल. मेट्रोचा वापर वाढला तर बालभारती - पौड रस्त्याची गरजच नाही. - सुमिता काळे, सदस्य, वेताळ टेकडी बचाव कृती समिती

टेकडीखालील पाण्याचे स्त्रोत नष्ट होतील

मेट्रोमुळे कोथरुडच्या रहिवाशांना औंध, हिंजेवाडी, पिंपरी चिंचवडला अतिशय कमी वेळेत पोहोचता येईल. त्याचा वापर नागरिकांनी करावा. टेकडीवरून रस्ता केला तर त्यामुळे ३ हजार झाडे कापावी लागतील. टेकडीखालील पाण्याचे स्त्रोत नष्ट होतील, त्याने पाण्याची पातळी खालावेल. म्हणून हे सर्व थांबविण्यासाठी प्रकल्प बंद करणे हेच योग्य आहे. - डाॅ. सुषमा दाते, सदस्य, वेताळ टेकडी बचाव कृती समिती

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाenvironmentपर्यावरणTrafficवाहतूक कोंडी