शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने अडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सणसर : नीरा भीमा नदी जलस्थीरिकरण प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्यातील भूसुरंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सणसर : नीरा भीमा नदी जलस्थीरिकरण प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्यातील भूसुरंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहे, तर अनेक विहिरींचे पाणी आटल्याने सपकाळवस्ती ग्रामस्त आक्रमक झाले आहे. रविवारी काम बंद पाडल्यावर सोमवारी पुन्हा प्रकल्पाची वाहने आल्याने ग्रामस्थांनी ती रस्त्यातच अडवून पुन्हा काम बंद पाडले.

मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नीरा नदी वरून बोगद्याद्वारे उजनी धरण व तेथून पुढे पाणी मराठवाड्यासाठी वळविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे बोगद्याचे काम सध्या सणसर (ता.इंदापुर) येथील ३६ फाटा येथे सुरू आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील सपकळवाडीत गावात अनेकांच्या घरांना तडे गेले. तर या परिसरातील विहिरींचे पाणी आटल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत रविवारी प्रकल्पाच्या बांधकाम ठिकाणी जात काम बंद पाडले होते. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनीही हे काम बंद करत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. मात्र, सोमवारी सकाळी मुरुमाने भरलेले ट्रक हे प्रकल्पाच्या ठिकाणावरून मुरूम यार्डाकडे भरून नेत असतांना ग्रामस्थांनी पाहिले. ग्रामस्थांनी तात्काळ एकत्र येत वाहनांच्या पुढे येत ती अडवली. वाहने पुढे नेऊ नका असे म्हणत ग्रामस्थ ट्रक पुढे झोपण्याचा प्रयत्न केला. रविवारी प्रकल्पाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांना न जुमानता पुन्हा काम सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उमेश सपकळ,जगदीश सपकळ, आप्पा सपकळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

नीरा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंगाचा वापर केला जात आहे. त्याच्या हादऱ्यामुळे परिसरातील घरांना तडे जात असून नुकसान होत आहे. बोगद्यामुळे आमच्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणी गेले आहे. हिवाळ्यातही विहिरींना पाणी कमी झाले आहे. त्यावरून हे आंदोलन सुरू आहे. या विषयी रविवारी ग्रामस्थांनी सर्व अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. मात्र शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम सुरू करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहे.

कोट

रविवारी ग्रामस्थांच्या आंदोलनांनतर ठेकेदारांनी प्रकल्पाचे किंवा तेथील यंत्रसामुग्रीचे नुकसान होणार नाही ती कामे सुरू ठेवण्यात येईल असे सांगितले होते. बोगद्यातील पाणी काढणे गरजेचे असल्याने ते काम सुरू ठेवावे. मात्र, बोगद्यातील काढलेला मुरूम तसाच ठेवावा, अशा सूचना दिल्या होत्या. असे असतांही साेमवारी सकाळी मुरुमाने भरलेली वाहने मुरूम यार्डा कडे जात होती. ठेकदेदाराने फसवणूक केल्यामुळे ग्रामस्थांनी अडविली. अधिकाऱ्यांनी आमचा संयम तुटू देऊ नये. अन्यथा आंदोलनाला वेगळे वळण लागेल.

-सचिन सपकळ, सरपंच, सपकळवाडी

फोटो ओळ : नदीजोड प्रकल्पाची मुरुमाने भरलेली वाहने अडवतांना सपकळवाडी येथील शेतकरी.