शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने अडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सणसर : नीरा भीमा नदी जलस्थीरिकरण प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्यातील भूसुरंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सणसर : नीरा भीमा नदी जलस्थीरिकरण प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्यातील भूसुरंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहे, तर अनेक विहिरींचे पाणी आटल्याने सपकाळवस्ती ग्रामस्त आक्रमक झाले आहे. रविवारी काम बंद पाडल्यावर सोमवारी पुन्हा प्रकल्पाची वाहने आल्याने ग्रामस्थांनी ती रस्त्यातच अडवून पुन्हा काम बंद पाडले.

मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नीरा नदी वरून बोगद्याद्वारे उजनी धरण व तेथून पुढे पाणी मराठवाड्यासाठी वळविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे बोगद्याचे काम सध्या सणसर (ता.इंदापुर) येथील ३६ फाटा येथे सुरू आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील सपकळवाडीत गावात अनेकांच्या घरांना तडे गेले. तर या परिसरातील विहिरींचे पाणी आटल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत रविवारी प्रकल्पाच्या बांधकाम ठिकाणी जात काम बंद पाडले होते. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनीही हे काम बंद करत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. मात्र, सोमवारी सकाळी मुरुमाने भरलेले ट्रक हे प्रकल्पाच्या ठिकाणावरून मुरूम यार्डाकडे भरून नेत असतांना ग्रामस्थांनी पाहिले. ग्रामस्थांनी तात्काळ एकत्र येत वाहनांच्या पुढे येत ती अडवली. वाहने पुढे नेऊ नका असे म्हणत ग्रामस्थ ट्रक पुढे झोपण्याचा प्रयत्न केला. रविवारी प्रकल्पाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांना न जुमानता पुन्हा काम सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उमेश सपकळ,जगदीश सपकळ, आप्पा सपकळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

नीरा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंगाचा वापर केला जात आहे. त्याच्या हादऱ्यामुळे परिसरातील घरांना तडे जात असून नुकसान होत आहे. बोगद्यामुळे आमच्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणी गेले आहे. हिवाळ्यातही विहिरींना पाणी कमी झाले आहे. त्यावरून हे आंदोलन सुरू आहे. या विषयी रविवारी ग्रामस्थांनी सर्व अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. मात्र शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम सुरू करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहे.

कोट

रविवारी ग्रामस्थांच्या आंदोलनांनतर ठेकेदारांनी प्रकल्पाचे किंवा तेथील यंत्रसामुग्रीचे नुकसान होणार नाही ती कामे सुरू ठेवण्यात येईल असे सांगितले होते. बोगद्यातील पाणी काढणे गरजेचे असल्याने ते काम सुरू ठेवावे. मात्र, बोगद्यातील काढलेला मुरूम तसाच ठेवावा, अशा सूचना दिल्या होत्या. असे असतांही साेमवारी सकाळी मुरुमाने भरलेली वाहने मुरूम यार्डा कडे जात होती. ठेकदेदाराने फसवणूक केल्यामुळे ग्रामस्थांनी अडविली. अधिकाऱ्यांनी आमचा संयम तुटू देऊ नये. अन्यथा आंदोलनाला वेगळे वळण लागेल.

-सचिन सपकळ, सरपंच, सपकळवाडी

फोटो ओळ : नदीजोड प्रकल्पाची मुरुमाने भरलेली वाहने अडवतांना सपकळवाडी येथील शेतकरी.