शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने अडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सणसर : नीरा भीमा नदी जलस्थीरिकरण प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्यातील भूसुरंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सणसर : नीरा भीमा नदी जलस्थीरिकरण प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्यातील भूसुरंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहे, तर अनेक विहिरींचे पाणी आटल्याने सपकाळवस्ती ग्रामस्त आक्रमक झाले आहे. रविवारी काम बंद पाडल्यावर सोमवारी पुन्हा प्रकल्पाची वाहने आल्याने ग्रामस्थांनी ती रस्त्यातच अडवून पुन्हा काम बंद पाडले.

मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नीरा नदी वरून बोगद्याद्वारे उजनी धरण व तेथून पुढे पाणी मराठवाड्यासाठी वळविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे बोगद्याचे काम सध्या सणसर (ता.इंदापुर) येथील ३६ फाटा येथे सुरू आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील सपकळवाडीत गावात अनेकांच्या घरांना तडे गेले. तर या परिसरातील विहिरींचे पाणी आटल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत रविवारी प्रकल्पाच्या बांधकाम ठिकाणी जात काम बंद पाडले होते. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनीही हे काम बंद करत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. मात्र, सोमवारी सकाळी मुरुमाने भरलेले ट्रक हे प्रकल्पाच्या ठिकाणावरून मुरूम यार्डाकडे भरून नेत असतांना ग्रामस्थांनी पाहिले. ग्रामस्थांनी तात्काळ एकत्र येत वाहनांच्या पुढे येत ती अडवली. वाहने पुढे नेऊ नका असे म्हणत ग्रामस्थ ट्रक पुढे झोपण्याचा प्रयत्न केला. रविवारी प्रकल्पाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांना न जुमानता पुन्हा काम सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उमेश सपकळ,जगदीश सपकळ, आप्पा सपकळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

नीरा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंगाचा वापर केला जात आहे. त्याच्या हादऱ्यामुळे परिसरातील घरांना तडे जात असून नुकसान होत आहे. बोगद्यामुळे आमच्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणी गेले आहे. हिवाळ्यातही विहिरींना पाणी कमी झाले आहे. त्यावरून हे आंदोलन सुरू आहे. या विषयी रविवारी ग्रामस्थांनी सर्व अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. मात्र शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम सुरू करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहे.

कोट

रविवारी ग्रामस्थांच्या आंदोलनांनतर ठेकेदारांनी प्रकल्पाचे किंवा तेथील यंत्रसामुग्रीचे नुकसान होणार नाही ती कामे सुरू ठेवण्यात येईल असे सांगितले होते. बोगद्यातील पाणी काढणे गरजेचे असल्याने ते काम सुरू ठेवावे. मात्र, बोगद्यातील काढलेला मुरूम तसाच ठेवावा, अशा सूचना दिल्या होत्या. असे असतांही साेमवारी सकाळी मुरुमाने भरलेली वाहने मुरूम यार्डा कडे जात होती. ठेकदेदाराने फसवणूक केल्यामुळे ग्रामस्थांनी अडविली. अधिकाऱ्यांनी आमचा संयम तुटू देऊ नये. अन्यथा आंदोलनाला वेगळे वळण लागेल.

-सचिन सपकळ, सरपंच, सपकळवाडी

फोटो ओळ : नदीजोड प्रकल्पाची मुरुमाने भरलेली वाहने अडवतांना सपकळवाडी येथील शेतकरी.