शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आंबेगावच्या पश्चिम भागात रानभाज्या बहरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:12 IST

कोणतीही शेती न करता, अथवा कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता, निसर्गतःच उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या भाज्या ...

कोणतीही शेती न करता, अथवा कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता, निसर्गतःच उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या भाज्या जंगलात, शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. पावसाची रिपरिप सुरू झाली की, रानभाज्याही डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवित नाहीत. यात अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे रानभाज्या आवर्जून बनवून खाल्ल्या जातात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी आदिवासी भागातील गावांमध्ये रानभाज्यांचे महोत्सवही भरविले जातात.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या अभयारण्य परिसरात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. अभयारण्याजवळील कोंढवळ व आहुपे या गावमध्ये या भागातील आदिवासी बांधव दुकान थाटून येणारे निसर्गप्रेमी हौशी पर्यटक व शहरी नागरिकांना माहिती नसलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्यांची माहिती सांगतात.

रानभाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदिवासी महिला शहरी भागात बाजारात त्या विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, या रानभाज्यांची माहिती नसल्याने कोणी विकत घेण्यास लवकर तयार होत नाही. ज्या व्यक्तीला त्याची माहिती आहे, तीच व्यक्ती या भाज्या विकत घेताना दिसून येत आहे. रानभाज्यांबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे इच्छा असूनही बाजारात त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेताना, शक्यतो स्थानिक आदिवासींकडूनच विकत घ्याव्यात. त्यांच्याकडूनच रानभाज्यांविषयी अचूक माहिती मिळते. ज्या भाज्यांमध्ये पानांचा समावेश अधिक आहे. त्या विकत घेतल्यानंतर त्या गरम पाण्यात उकळून ते पाणी टाकून द्यावे, त्यानंतरच या बनवाव्यात. या प्रक्रियेमुळे रानभाज्यांमधील अंगभूत गुणधर्म कमी होत नाही. भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढविलेल्या असतात अन् त्यांना खतेही वापरलेली नसतात, तसेच उकडून केलेल्या भाज्यांमध्ये शक्यतो कमी मसाले व तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.

--

चौकट

सर्दी, खोकल्यासह मोठ्या आजारांवर गुणकारी

रानभाज्यांमध्ये काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात. कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो, तर रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. टाकळ्याच्या पानाचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला तखटा असेही म्हणतात. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू व कुवाळूचची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात. ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो, त्यांची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, पुनर्नवा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वाघोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यांसारख्या भाज्यांमध्ये जस्त, तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते.

---

फोटो १७ तळेघर रानभाज्या

तळेघर परिसरात फुललेल्या रानभाज्या

--