शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

भाज्या बजेटमध्ये!

By admin | Updated: February 26, 2017 03:36 IST

तरकारी व भाजीपाला यांचे बाजारभाव कमी असल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. शंभर रुपयांत पिशवीभर भाज्या घरी नेता येत असल्याने घरातील ‘बजेट’

मंचर : तरकारी व भाजीपाला यांचे बाजारभाव कमी असल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. शंभर रुपयांत पिशवीभर भाज्या घरी नेता येत असल्याने घरातील ‘बजेट’ चांगले जमूू लागले आहे. वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी या भाज्या ५ रुपये पावशेर दराने मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे. किरकोळ बाजारात तरकारी भाजीपाला यांचे भाव अजूनही कमी आहेत. शेतीमालाचे बाजारभाव कमीच असल्याने किरकोळ बाजारात तरकारी व भाजीपाला कमी भावाने विकला जातोय. बाजारात फेरफटका मारला, की कमी बाजारभावाची प्रचिती येते. घरातील महिन्याचे बजेट बसविताना भाजीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चावर बरेच काही अवलंबून असते. भाज्यांचे दर वाढले, की काटकसर करून स्वस्तात मिळणारी भाजी विकत घ्यावी लागते अथवा कडधान्याची भाजी करावी लागते. कमी बाजारभावामुळे सध्या तरी तसे काही करावे लागत नाही, अशी प्रतिक्रिया महिलावर्गातून व्यक्त होत आहे. पालेभाज्यांचे दरही कमी असल्याने त्यांचा वापर वाढला आहे. मेथीची जुडी ४० ते ५० रुपयांना यापूर्वी मिळत होती. तीच आता ५ रुपयांना मिळू लागल्याने पालेभाज्या खाण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा सर्वाधिक फायदा हॉटेल व्यावसायिकांना झाला आहे. राईसप्लेटमध्ये आता विविध प्रकारच्या भाज्या दिसू लागल्या आहेत. शिवाय, त्यांचा भाजीवरचा खर्च कमी झाला आहे. मंचरमध्ये ताजी भाजी ग्राहकांना मिळू लागली आहे, अशी माहिती विक्रेत्या शारदा गाडे यांनी दिली. शेतकऱ्यांना मात्र फटका : एकीकडे ग्राहकांचा फायदा होत असताना शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसतोय. कमी बाजारभावामुळे त्यांचे पिकाचे भांडवलसुद्धा वसूल होत नाही. दोन वर्षांपासून शेतकरी अडचणीत आला आहे. बहुतेक पिकांना बाजारभाव मिळाला नसल्याने त्याची आर्थिक घडी बिघडली आहे. तो बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहे.तरकारी बाजारभाव पावशेरमध्ये : वांगी : ५ रुपये, फ्लॉवर : ५ रुपये, टोमॅटो : ५ रुपये, भेंडी : १० रुपये, वटाणा : ७ रुपये, कोबी : ३ रुपये, ढोबळी : १० रुपये, फरसबी : १० रुपये, गाजर : ५ रुपये, आले : ७ रुपये, बटाटा : १० रुपये किलो, कांदा १० रुपये किलो.