शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

भाज्या बजेटमध्ये!

By admin | Updated: February 26, 2017 03:36 IST

तरकारी व भाजीपाला यांचे बाजारभाव कमी असल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. शंभर रुपयांत पिशवीभर भाज्या घरी नेता येत असल्याने घरातील ‘बजेट’

मंचर : तरकारी व भाजीपाला यांचे बाजारभाव कमी असल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. शंभर रुपयांत पिशवीभर भाज्या घरी नेता येत असल्याने घरातील ‘बजेट’ चांगले जमूू लागले आहे. वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी या भाज्या ५ रुपये पावशेर दराने मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे. किरकोळ बाजारात तरकारी भाजीपाला यांचे भाव अजूनही कमी आहेत. शेतीमालाचे बाजारभाव कमीच असल्याने किरकोळ बाजारात तरकारी व भाजीपाला कमी भावाने विकला जातोय. बाजारात फेरफटका मारला, की कमी बाजारभावाची प्रचिती येते. घरातील महिन्याचे बजेट बसविताना भाजीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चावर बरेच काही अवलंबून असते. भाज्यांचे दर वाढले, की काटकसर करून स्वस्तात मिळणारी भाजी विकत घ्यावी लागते अथवा कडधान्याची भाजी करावी लागते. कमी बाजारभावामुळे सध्या तरी तसे काही करावे लागत नाही, अशी प्रतिक्रिया महिलावर्गातून व्यक्त होत आहे. पालेभाज्यांचे दरही कमी असल्याने त्यांचा वापर वाढला आहे. मेथीची जुडी ४० ते ५० रुपयांना यापूर्वी मिळत होती. तीच आता ५ रुपयांना मिळू लागल्याने पालेभाज्या खाण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा सर्वाधिक फायदा हॉटेल व्यावसायिकांना झाला आहे. राईसप्लेटमध्ये आता विविध प्रकारच्या भाज्या दिसू लागल्या आहेत. शिवाय, त्यांचा भाजीवरचा खर्च कमी झाला आहे. मंचरमध्ये ताजी भाजी ग्राहकांना मिळू लागली आहे, अशी माहिती विक्रेत्या शारदा गाडे यांनी दिली. शेतकऱ्यांना मात्र फटका : एकीकडे ग्राहकांचा फायदा होत असताना शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसतोय. कमी बाजारभावामुळे त्यांचे पिकाचे भांडवलसुद्धा वसूल होत नाही. दोन वर्षांपासून शेतकरी अडचणीत आला आहे. बहुतेक पिकांना बाजारभाव मिळाला नसल्याने त्याची आर्थिक घडी बिघडली आहे. तो बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहे.तरकारी बाजारभाव पावशेरमध्ये : वांगी : ५ रुपये, फ्लॉवर : ५ रुपये, टोमॅटो : ५ रुपये, भेंडी : १० रुपये, वटाणा : ७ रुपये, कोबी : ३ रुपये, ढोबळी : १० रुपये, फरसबी : १० रुपये, गाजर : ५ रुपये, आले : ७ रुपये, बटाटा : १० रुपये किलो, कांदा १० रुपये किलो.