शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वेध विलिनीकरणाचे : नांदेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST

नांदेडकरांची ग्रामपंचायतीकडून उपेक्षाच पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव, कचऱ्यामुळे दुर्गंधी दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आमच्या गावातील कचरा ...

नांदेडकरांची ग्रामपंचायतीकडून उपेक्षाच

पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव, कचऱ्यामुळे दुर्गंधी

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आमच्या गावातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीने एका खासगी संस्थेला कंत्राट दिले आहे. मात्र गावात स्मशानभूमी, शिवणे-नांदेड पुलानजीक आणि कॅनॉलजवळील जागेवर घाणीचे साम्राज्य असून, त्यातून साथीचे रोग पसरण्याची भीती असल्याची मुख्य तक्रार नांदेड ग्रामस्थांनी केली. नांदेड ग्रामपंचायत या समस्येवर वेळकाढूपणा करीत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.

पुणे महानगरपालिकेच्या खडकवासला धरणातून जाणाऱ्या जलवाहिनीद्वारे आम्हाला पाणीपुरवठा होतो, पण त्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पच नसल्याने गावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. जे पाणी येते तेही अपुरे असते. ʻनांदेड सिटीʼला फिल्टर पाणी देता मग आम्हाला का नाही, असा प्रश्न नांदेडकरांसमोर आहे.

सुमारे ७० हजार लोकसंख्येच्या नांदेडमध्ये पाणी आणि कचरा या मुख्य समस्या आहेत. आजूबाजूच्या पाच ते सहा ग्रामपंचायतींना दत्तक घेण्याइतकी नांदेड ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. पण स्वतःच्याच गावात पायाभूत सुविधांची वानवा असल्याने नागरिक हैराण आहेत. शिवणे-नांदेड पुलाची अवस्था बिकट आहे. या पुलाचे बांधकाम अतिशय जुनाट असून दोन्ही बाजूला कठडे नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होतात. पुलावरून एकावेळी एकच गाडी जाऊ शकते. नदीला पूर आल्यावर या दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. नदीच्या पुरात आतापर्यंत अनेकजण वाहून गेले असल्याने नव्या पुलाची गरज नागरिक व्यक्त करतात.

मल्लनिस्सारण प्रकल्पासाठी जागा नसल्याने सांडपाणी नदीपात्रातच सोडले जाते. यामुळे नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. मोकळी जागा शिल्लक नसल्याने गावाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने तरुणांची गैरसोय झाली आहे.

चौकट

मूळ नांदेड गावाचा (नांदेड सिटी वगळून) समावेश महानगरपालिकेत करावा. पायाभूत सुविधांसाठी महापालिकेने जागा द्यावी. - तुषार कारले, माजी तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष.

चौकट

प्रकल्पांसाठी जागा मिळाली तर अनेक प्रश्न सुटतील. महानगरपालिका देते तेवढ्याच सुविधा आम्ही ग्रामपंचायतीमार्फत देऊ. त्यामुळे महानगरपालिकेत समावेश झाल्याने फार फरक पडेल असं वाटत नाही.

-भारती लगड, सरपंच.

Photo line :

नांदेड-शिवणे पुलाला दोन्ही बाजूंनी कठडे नसल्याने तो धोकादायक ठरला असून अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते.