शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

वेध विलिनीकरणाचे : नांदेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST

नांदेडकरांची ग्रामपंचायतीकडून उपेक्षाच पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव, कचऱ्यामुळे दुर्गंधी दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आमच्या गावातील कचरा ...

नांदेडकरांची ग्रामपंचायतीकडून उपेक्षाच

पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव, कचऱ्यामुळे दुर्गंधी

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आमच्या गावातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीने एका खासगी संस्थेला कंत्राट दिले आहे. मात्र गावात स्मशानभूमी, शिवणे-नांदेड पुलानजीक आणि कॅनॉलजवळील जागेवर घाणीचे साम्राज्य असून, त्यातून साथीचे रोग पसरण्याची भीती असल्याची मुख्य तक्रार नांदेड ग्रामस्थांनी केली. नांदेड ग्रामपंचायत या समस्येवर वेळकाढूपणा करीत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.

पुणे महानगरपालिकेच्या खडकवासला धरणातून जाणाऱ्या जलवाहिनीद्वारे आम्हाला पाणीपुरवठा होतो, पण त्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पच नसल्याने गावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. जे पाणी येते तेही अपुरे असते. ʻनांदेड सिटीʼला फिल्टर पाणी देता मग आम्हाला का नाही, असा प्रश्न नांदेडकरांसमोर आहे.

सुमारे ७० हजार लोकसंख्येच्या नांदेडमध्ये पाणी आणि कचरा या मुख्य समस्या आहेत. आजूबाजूच्या पाच ते सहा ग्रामपंचायतींना दत्तक घेण्याइतकी नांदेड ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. पण स्वतःच्याच गावात पायाभूत सुविधांची वानवा असल्याने नागरिक हैराण आहेत. शिवणे-नांदेड पुलाची अवस्था बिकट आहे. या पुलाचे बांधकाम अतिशय जुनाट असून दोन्ही बाजूला कठडे नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होतात. पुलावरून एकावेळी एकच गाडी जाऊ शकते. नदीला पूर आल्यावर या दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. नदीच्या पुरात आतापर्यंत अनेकजण वाहून गेले असल्याने नव्या पुलाची गरज नागरिक व्यक्त करतात.

मल्लनिस्सारण प्रकल्पासाठी जागा नसल्याने सांडपाणी नदीपात्रातच सोडले जाते. यामुळे नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. मोकळी जागा शिल्लक नसल्याने गावाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने तरुणांची गैरसोय झाली आहे.

चौकट

मूळ नांदेड गावाचा (नांदेड सिटी वगळून) समावेश महानगरपालिकेत करावा. पायाभूत सुविधांसाठी महापालिकेने जागा द्यावी. - तुषार कारले, माजी तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष.

चौकट

प्रकल्पांसाठी जागा मिळाली तर अनेक प्रश्न सुटतील. महानगरपालिका देते तेवढ्याच सुविधा आम्ही ग्रामपंचायतीमार्फत देऊ. त्यामुळे महानगरपालिकेत समावेश झाल्याने फार फरक पडेल असं वाटत नाही.

-भारती लगड, सरपंच.

Photo line :

नांदेड-शिवणे पुलाला दोन्ही बाजूंनी कठडे नसल्याने तो धोकादायक ठरला असून अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते.