शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

वेध विलिनीकरणाचे : नांदेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST

नांदेडकरांची ग्रामपंचायतीकडून उपेक्षाच पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव, कचऱ्यामुळे दुर्गंधी दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आमच्या गावातील कचरा ...

नांदेडकरांची ग्रामपंचायतीकडून उपेक्षाच

पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव, कचऱ्यामुळे दुर्गंधी

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आमच्या गावातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीने एका खासगी संस्थेला कंत्राट दिले आहे. मात्र गावात स्मशानभूमी, शिवणे-नांदेड पुलानजीक आणि कॅनॉलजवळील जागेवर घाणीचे साम्राज्य असून, त्यातून साथीचे रोग पसरण्याची भीती असल्याची मुख्य तक्रार नांदेड ग्रामस्थांनी केली. नांदेड ग्रामपंचायत या समस्येवर वेळकाढूपणा करीत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.

पुणे महानगरपालिकेच्या खडकवासला धरणातून जाणाऱ्या जलवाहिनीद्वारे आम्हाला पाणीपुरवठा होतो, पण त्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पच नसल्याने गावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. जे पाणी येते तेही अपुरे असते. ʻनांदेड सिटीʼला फिल्टर पाणी देता मग आम्हाला का नाही, असा प्रश्न नांदेडकरांसमोर आहे.

सुमारे ७० हजार लोकसंख्येच्या नांदेडमध्ये पाणी आणि कचरा या मुख्य समस्या आहेत. आजूबाजूच्या पाच ते सहा ग्रामपंचायतींना दत्तक घेण्याइतकी नांदेड ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. पण स्वतःच्याच गावात पायाभूत सुविधांची वानवा असल्याने नागरिक हैराण आहेत. शिवणे-नांदेड पुलाची अवस्था बिकट आहे. या पुलाचे बांधकाम अतिशय जुनाट असून दोन्ही बाजूला कठडे नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होतात. पुलावरून एकावेळी एकच गाडी जाऊ शकते. नदीला पूर आल्यावर या दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. नदीच्या पुरात आतापर्यंत अनेकजण वाहून गेले असल्याने नव्या पुलाची गरज नागरिक व्यक्त करतात.

मल्लनिस्सारण प्रकल्पासाठी जागा नसल्याने सांडपाणी नदीपात्रातच सोडले जाते. यामुळे नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. मोकळी जागा शिल्लक नसल्याने गावाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने तरुणांची गैरसोय झाली आहे.

चौकट

मूळ नांदेड गावाचा (नांदेड सिटी वगळून) समावेश महानगरपालिकेत करावा. पायाभूत सुविधांसाठी महापालिकेने जागा द्यावी. - तुषार कारले, माजी तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष.

चौकट

प्रकल्पांसाठी जागा मिळाली तर अनेक प्रश्न सुटतील. महानगरपालिका देते तेवढ्याच सुविधा आम्ही ग्रामपंचायतीमार्फत देऊ. त्यामुळे महानगरपालिकेत समावेश झाल्याने फार फरक पडेल असं वाटत नाही.

-भारती लगड, सरपंच.

Photo line :

नांदेड-शिवणे पुलाला दोन्ही बाजूंनी कठडे नसल्याने तो धोकादायक ठरला असून अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते.