शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेध विलिनीकरणाचे : नांदेड २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:10 IST

नांदेडमधल्या आजीबाईंची प्रतिक्रिया; महापालिकेकडून मोठी अपेक्षा दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आमचं नांदेड अजूनही पूर्वीसारखंच खेडं आहे ...

नांदेडमधल्या आजीबाईंची प्रतिक्रिया; महापालिकेकडून मोठी अपेक्षा

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आमचं नांदेड अजूनही पूर्वीसारखंच खेडं आहे फक्त आता मोकळ्या जागा गेल्या,” अशी मिस्कील प्रतिक्रिया गावातील एक आजीबाईंनी ʻलोकमतʼबरोबर बोलताना दिली.

नांदेड गावात क्रीडांगण, मल्लनिस्सारण प्रकल्प, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, उद्यान आणि बस टर्मिनलसाठी या प्रकल्पांसाठी जागा मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

नांदेड फाट्यावरील सिंहगडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मुख्य चौकात वाहतूक कोंडी होते. त्यातून अपघातही घडले आहेत. तीच अवस्था गावातील मुख्य रस्त्याचीही आहे. एकाच वेळी दोन चारचाकी गाड्या निघणे कठीण आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे झालेली आहेत, परंतु तेथेही अतिक्रमण आहे. गावातील वेगवेगळ्या भागात विजेचे खांब उभारले, परंतु त्या खांबांवरील दिवे बंद आहेत. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने रात्रीच्या अपघात किंवा चोरी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारतात.

पुणे महानगरपालिकेत जेव्हा अकरा गावांचा समावेश केला गेला तेव्हा आम्हालाही समावेशाची आशा होती. पण आज त्या अकरा गावांची अवस्था काय आहे? त्यांच्या पायाभूत सुविधांचे आणि इतर प्रश्न सुटले का? आमच्या शेजारी शिवणे गाव आहे, जे याआधी महानगरपालिकेत समावेश झालेल्या अकरा गावांमध्ये होते. अजूनही शिवणेतील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत, अशी तक्रार करतानाच पालिकेकडून मोठी अपेक्षा असल्याचेही गावकरी नमूद करतात.

कोट

“पाणी मुबलक आहे, पण जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने त्या पाण्याचा उपयोग काय? आमचं गाव स्वयंपूर्ण असून गावाच्या विलिनीकरणाने आमच्या गावचंच नुकसान होणार आहे.”

- मयूरी कारले, नागरिक

कोट

“गावातील कचरा व पाण्याच्या समस्या सुटणे गरजेचे आहे. महानगरपालिका आमच्या समस्या सोडवणार असेल तर आम्ही सरकारच्या निर्णयाचे नक्की स्वागत करू.”

-मारुती मरगळे, सामाजिक कार्यकर्ते

कोट

“यापूर्वी, समाविष्ट झालेल्या अकरा गावांसारखी स्थिती आमची होऊ नये. कचरा व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याची समस्या ही आमची मुख्य अडचण आहे.”

-विजय दारवटकर, सामाजिक कार्यकर्ते

फोटो ओळी:

शिवणे-नांदेड या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ, नदीकिनारी गावातील कचरा टाकला जातो. यामुळे भटक्या जनावरांचा वावर वाढतो. दुर्गंधीमुळे अनारोग्य निर्माण होते.