शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

वेध विलिनीकरणाचे : नांदेड २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:10 IST

नांदेडमधल्या आजीबाईंची प्रतिक्रिया; महापालिकेकडून मोठी अपेक्षा दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आमचं नांदेड अजूनही पूर्वीसारखंच खेडं आहे ...

नांदेडमधल्या आजीबाईंची प्रतिक्रिया; महापालिकेकडून मोठी अपेक्षा

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आमचं नांदेड अजूनही पूर्वीसारखंच खेडं आहे फक्त आता मोकळ्या जागा गेल्या,” अशी मिस्कील प्रतिक्रिया गावातील एक आजीबाईंनी ʻलोकमतʼबरोबर बोलताना दिली.

नांदेड गावात क्रीडांगण, मल्लनिस्सारण प्रकल्प, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, उद्यान आणि बस टर्मिनलसाठी या प्रकल्पांसाठी जागा मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

नांदेड फाट्यावरील सिंहगडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मुख्य चौकात वाहतूक कोंडी होते. त्यातून अपघातही घडले आहेत. तीच अवस्था गावातील मुख्य रस्त्याचीही आहे. एकाच वेळी दोन चारचाकी गाड्या निघणे कठीण आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे झालेली आहेत, परंतु तेथेही अतिक्रमण आहे. गावातील वेगवेगळ्या भागात विजेचे खांब उभारले, परंतु त्या खांबांवरील दिवे बंद आहेत. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने रात्रीच्या अपघात किंवा चोरी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारतात.

पुणे महानगरपालिकेत जेव्हा अकरा गावांचा समावेश केला गेला तेव्हा आम्हालाही समावेशाची आशा होती. पण आज त्या अकरा गावांची अवस्था काय आहे? त्यांच्या पायाभूत सुविधांचे आणि इतर प्रश्न सुटले का? आमच्या शेजारी शिवणे गाव आहे, जे याआधी महानगरपालिकेत समावेश झालेल्या अकरा गावांमध्ये होते. अजूनही शिवणेतील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत, अशी तक्रार करतानाच पालिकेकडून मोठी अपेक्षा असल्याचेही गावकरी नमूद करतात.

कोट

“पाणी मुबलक आहे, पण जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने त्या पाण्याचा उपयोग काय? आमचं गाव स्वयंपूर्ण असून गावाच्या विलिनीकरणाने आमच्या गावचंच नुकसान होणार आहे.”

- मयूरी कारले, नागरिक

कोट

“गावातील कचरा व पाण्याच्या समस्या सुटणे गरजेचे आहे. महानगरपालिका आमच्या समस्या सोडवणार असेल तर आम्ही सरकारच्या निर्णयाचे नक्की स्वागत करू.”

-मारुती मरगळे, सामाजिक कार्यकर्ते

कोट

“यापूर्वी, समाविष्ट झालेल्या अकरा गावांसारखी स्थिती आमची होऊ नये. कचरा व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याची समस्या ही आमची मुख्य अडचण आहे.”

-विजय दारवटकर, सामाजिक कार्यकर्ते

फोटो ओळी:

शिवणे-नांदेड या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ, नदीकिनारी गावातील कचरा टाकला जातो. यामुळे भटक्या जनावरांचा वावर वाढतो. दुर्गंधीमुळे अनारोग्य निर्माण होते.