शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

जलशिवार योजना पुरंदरला वरदान

By admin | Updated: September 22, 2015 03:21 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे

नारायणपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे. या अभियानांतर्गत तालुक्यात ३०९ कामे मंजूर झालेली असून त्यापैकी तब्बल १९० कामे पूर्ण झाली आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज या कामांची तालुक्यातील गावोगावी जाऊन पाहणी केली. अनेक बंधारे तुडुंब भरून वाहत असल्याचे पाहून शिवतारे यांनी समाधान व्यक्त केले. पुरंदर तालुक्यातील दिवे, सोनोरी, पानवडी, सटलवाडी, एखतपूर-मुंजवडी, साकुर्डे, काळदरी, देवडी, हिवरे, मांढर, टेकवडी, परिंचे, गुळुंचे, नावळी, वाळूंज, नवलेवाडी, पिंगोरी, वाल्हा, तक्रारवाडी, शिवरी, पांडेश्वर आदी गावांचा या योजनेत समावेश आहे. या गावांमध्ये नवीन सिमेंट बंधारे, गाळ काढणे, खोलीकरण करणे, बंधारा दुरुस्ती करणे, बांध-बंदिस्ती अशी अनेकविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शिवतारे म्हणाले, की दुष्काळमुक्तीसाठी १९६२नंतर अनेक आयोग नेमले गेले; पण त्यांच्या शिफारसी बासनात गुंडाळण्यात आल्या. या सगळ्या बाबींचा अभ्यास करून अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, मी ही योजना शासनाला सुचवली होती. प्रायोगिक तत्त्वावर पुरंदर तालुक्यात ही योजना राबवावी आणि यश पाहून नंतर राज्यात हा पॅटर्न राबवावा, असेही मी सुचवले होते. शासनाने त्या वेळी उदासीनता दाखवली; मात्र राज्यात युतीचे सरकार आल्यावर ही योजना प्रामुख्याने हातात घेण्यात आली. राज्यभर त्याचे यश दिसत असून, अनेक गावे जलयुक्त होत आहेत. भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी याची मोठी मदत झाली आहे. सत्ता गेल्यामुळे कामधंदा न उरलेले अनेक उतावीळ विरोधक माझ्यावर टीका करत होते. त्यांना माझी कामगिरी हेच उत्तर असेल असेही शिवतारे म्हणाले.