शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

जलशिवार योजना पुरंदरला वरदान

By admin | Updated: September 22, 2015 03:21 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे

नारायणपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे. या अभियानांतर्गत तालुक्यात ३०९ कामे मंजूर झालेली असून त्यापैकी तब्बल १९० कामे पूर्ण झाली आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज या कामांची तालुक्यातील गावोगावी जाऊन पाहणी केली. अनेक बंधारे तुडुंब भरून वाहत असल्याचे पाहून शिवतारे यांनी समाधान व्यक्त केले. पुरंदर तालुक्यातील दिवे, सोनोरी, पानवडी, सटलवाडी, एखतपूर-मुंजवडी, साकुर्डे, काळदरी, देवडी, हिवरे, मांढर, टेकवडी, परिंचे, गुळुंचे, नावळी, वाळूंज, नवलेवाडी, पिंगोरी, वाल्हा, तक्रारवाडी, शिवरी, पांडेश्वर आदी गावांचा या योजनेत समावेश आहे. या गावांमध्ये नवीन सिमेंट बंधारे, गाळ काढणे, खोलीकरण करणे, बंधारा दुरुस्ती करणे, बांध-बंदिस्ती अशी अनेकविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शिवतारे म्हणाले, की दुष्काळमुक्तीसाठी १९६२नंतर अनेक आयोग नेमले गेले; पण त्यांच्या शिफारसी बासनात गुंडाळण्यात आल्या. या सगळ्या बाबींचा अभ्यास करून अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, मी ही योजना शासनाला सुचवली होती. प्रायोगिक तत्त्वावर पुरंदर तालुक्यात ही योजना राबवावी आणि यश पाहून नंतर राज्यात हा पॅटर्न राबवावा, असेही मी सुचवले होते. शासनाने त्या वेळी उदासीनता दाखवली; मात्र राज्यात युतीचे सरकार आल्यावर ही योजना प्रामुख्याने हातात घेण्यात आली. राज्यभर त्याचे यश दिसत असून, अनेक गावे जलयुक्त होत आहेत. भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी याची मोठी मदत झाली आहे. सत्ता गेल्यामुळे कामधंदा न उरलेले अनेक उतावीळ विरोधक माझ्यावर टीका करत होते. त्यांना माझी कामगिरी हेच उत्तर असेल असेही शिवतारे म्हणाले.