शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

वैष्णवांचा मेळा पुण्यात

By admin | Updated: July 2, 2016 12:56 IST

पंढरीच्या विठुरायाचा मुखी अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखल झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले.

पुणे : पंढरीच्या विठुरायाचा मुखी अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखल झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले. पाटील इस्टेट येथील उड्डाणपुलाखालच्या चौकात पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून विशेष कक्ष उभारण्यात आला होता. याचबरोबर इतर राजकीय पक्ष, संस्था, बँका यांनीही स्वागतासाठी कक्ष उभारले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे पाटील इस्टेट इथे आगमन झाले. संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे चाक पंक्चर झाल्याने त्यांना येण्यास दोन तासांचा विलंब झाला. पाटील इस्टेट येथील चौकात रात्री पावणेआठच्या सुमारास ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे आगमन झाले. महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेविका आशा साने, सुनंदा गडाळे, नंदा लोणकर, रेश्मा भोसले यांनी पालखीचे स्वागत केले. महापौरांनी संत तुकाराममहाराजांच्या पालखीरथामध्ये चढून काही वेळ रथाचे सारथ्य करून पालखीचे स्वागत केले. पालख्यांचे आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. चौकात दोरीने फुलांच्या करंड्या बांधण्यात आल्या होत्या, पालखी चौकात येताच या करंड्यांमधील फुलांचा वर्षाव करण्यात आला. ‘बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम, ज्ञानोबा माऊली.. माऊली’ असा एकच जयघोष या वेळी झाला. स्वागताचे अत्यंत मनोहारी दृश्य या वेळी पाहायला मिळाले. ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीला विलंब झाल्याने वेगाने ती पुढे मार्गस्थ झाली.पालख्यांचे स्वागत करताना प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुणेकर कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालख्यांचे आज आगमन झाले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर आसुसलेले आहेत. दोन दिवस त्यांचा मुक्काम पुण्यात असेल. या काळात पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांच्या आगमनाने पावसाचा वर्षाव व्हावा, असे पांडुरंगाला साकडे आहे.’’पाटील इस्टेट येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये वीणाधारी वारकऱ्यांना श्रीफल देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. कक्षातील स्पीकर भक्तिगीते लावण्यात आली होती.वरुणराजाने लावली हुरहुरशहरात पालख्यांचे आगमन होताना त्यांचे स्वागत करायला वरुणराजा हमखास येत असतो. यंदा जून संपत आला तरी अजून पुरेसा पाऊस झालेला नाही; त्यामुळे पेरण्या न करताच अनेक शेतकरी वारीत सहभागी झाले आहेत. पुण्यामध्ये प्रवेश करीत असताना दर वर्षी न चुकता येणारा पाऊस यंदा न आल्याने वारकऱ्यांना मोठी हुरहुर लागल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.