शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

वैष्णवांचा मेळा पुण्यात

By admin | Updated: July 2, 2016 12:56 IST

पंढरीच्या विठुरायाचा मुखी अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखल झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले.

पुणे : पंढरीच्या विठुरायाचा मुखी अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखल झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले. पाटील इस्टेट येथील उड्डाणपुलाखालच्या चौकात पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून विशेष कक्ष उभारण्यात आला होता. याचबरोबर इतर राजकीय पक्ष, संस्था, बँका यांनीही स्वागतासाठी कक्ष उभारले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे पाटील इस्टेट इथे आगमन झाले. संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे चाक पंक्चर झाल्याने त्यांना येण्यास दोन तासांचा विलंब झाला. पाटील इस्टेट येथील चौकात रात्री पावणेआठच्या सुमारास ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे आगमन झाले. महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेविका आशा साने, सुनंदा गडाळे, नंदा लोणकर, रेश्मा भोसले यांनी पालखीचे स्वागत केले. महापौरांनी संत तुकाराममहाराजांच्या पालखीरथामध्ये चढून काही वेळ रथाचे सारथ्य करून पालखीचे स्वागत केले. पालख्यांचे आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. चौकात दोरीने फुलांच्या करंड्या बांधण्यात आल्या होत्या, पालखी चौकात येताच या करंड्यांमधील फुलांचा वर्षाव करण्यात आला. ‘बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम, ज्ञानोबा माऊली.. माऊली’ असा एकच जयघोष या वेळी झाला. स्वागताचे अत्यंत मनोहारी दृश्य या वेळी पाहायला मिळाले. ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीला विलंब झाल्याने वेगाने ती पुढे मार्गस्थ झाली.पालख्यांचे स्वागत करताना प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुणेकर कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालख्यांचे आज आगमन झाले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर आसुसलेले आहेत. दोन दिवस त्यांचा मुक्काम पुण्यात असेल. या काळात पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांच्या आगमनाने पावसाचा वर्षाव व्हावा, असे पांडुरंगाला साकडे आहे.’’पाटील इस्टेट येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये वीणाधारी वारकऱ्यांना श्रीफल देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. कक्षातील स्पीकर भक्तिगीते लावण्यात आली होती.वरुणराजाने लावली हुरहुरशहरात पालख्यांचे आगमन होताना त्यांचे स्वागत करायला वरुणराजा हमखास येत असतो. यंदा जून संपत आला तरी अजून पुरेसा पाऊस झालेला नाही; त्यामुळे पेरण्या न करताच अनेक शेतकरी वारीत सहभागी झाले आहेत. पुण्यामध्ये प्रवेश करीत असताना दर वर्षी न चुकता येणारा पाऊस यंदा न आल्याने वारकऱ्यांना मोठी हुरहुर लागल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.