शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

लस घेतल्यानंतरही होऊ शकतो संसर्ग, नियमांची अंमलबजावणी हेच लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:26 IST

लसीकरणानंतर तयार झालेल्या अँटिबॉडी किती काळ टिकतील, त्यांची पातळी काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. लस ७५ टक्के परिणामकारक ...

लसीकरणानंतर तयार झालेल्या अँटिबॉडी किती काळ टिकतील, त्यांची पातळी काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. लस ७५ टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. लस घेतल्यानंतर साधारण एक महिन्याने रोगप्रतिकारकशक्ती निर्माण व्हायला सुरुवात होते. फ्ल्यूच्या लसीचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. या लसीचे दोन डोस दिल्यावर विकसित होणा-या अँटीबॉडी वर्षभर टिकतात. कोरोनावरील लसीबाबत सध्या तरी तसा अंदाज बांधता येऊ शकतो. कोणताही संसर्गजन्य आजार झाल्यास एक महिना लस देता येणार नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे पहिला डोस दिल्यावर कोरोना किंवा इतर संसर्गजन्य आजार झाल्यास लगेच दुसरा डोस देता येणार नाही. त्यामुळे बरे झाल्यावर एक महिन्याने दुसरा डोस देता येईल, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

सध्या आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचे लसीकरण सुरू आहे. कोरोनाचा एक डोस घेतल्यानंतर ५० टक्के आणि दोन्ही डोस घेतल्यावर महिन्याभराने ९५ टक्के प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणजेच पहिला डोस घेतल्यानंतरही सामान्य लोकांप्रमाणेच संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे हे प्रतिबंधक उपाय पाळावे लागतील, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

-----

लस म्हणजे कवचकुंडले नव्हेत, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. लसीच्या चाचण्यांमध्येही ९५ टक्के परिणामकारकता सिद्ध होते, तेव्हा ५ टक्के संसर्गाची शक्यता गृहित धरलेली असते. लसीकरण झाल्यावर कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होत असली तरी निष्काळजीपणा सध्या कोणत्याही परिस्थितीत परवडणारा नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही सुरक्षा आणि खबरदारीच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे.

- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय