शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

लसीकरण अन‌् तपासणी हाच हिपॅटायटिसवरील रामबाण उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:12 IST

पुणे : भारतात सुमारे ४ कोटी लोकांना हिपॅटायटिस ‘बी’चा, तर ६० लाख ते १.२ कोटी लोकांना हिपॅटायटिस ‘सी’चा संसर्ग ...

पुणे : भारतात सुमारे ४ कोटी लोकांना हिपॅटायटिस ‘बी’चा, तर ६० लाख ते १.२ कोटी लोकांना हिपॅटायटिस ‘सी’चा संसर्ग झालेला आहे,असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लहानपणीच काविळीला प्रतिबंध करता यावा, यासाठी मुलांना जन्मत: हिपॅटायटिस बीविरोधातील लस दिली जाते. एक वर्षाच्या मुलांना हिपॅटायटिस ‘ए’ विरोधातील लसीचा पहिला डोस आणि सहा महिन्यांनी दुसरा डोस दिला जातो. ‘ए’ विरोधातील लसीचा अद्याप राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश झालेला नाही. हिपॅटायटिस ‘ई’वरील लस अद्याप भारतात उपलब्ध नाही.

सध्या विषाणूजन्य आजारांच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. हिपॅटायटिस ए आणि ई या विषाणूंचा प्रसार दूषित पाणी किंवा अन्नातून होत असल्याने या माध्यमातून साथीचा आजार पसरू नये, यासाठी स्वच्छता, निर्जंतुकीकरण यावर भर देणे आवश्यक असते. हिपॅटायटिसची लागण झालेल्या व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोकाही जास्त असतो. अशा परिस्थितीत हिपॅटायटिसच्या रूग्णांनी दर सहा महिन्यांतून एकदा नियमित तपासणी करणे आवश्यक असते. थकवा, मळमळ, उलटया, पोटदुखी, भूक न लागणे, गडद लघवी होणे, सांधेदुखी, त्वचा पिवळसर होणे, सांधेदुखी ही हिपॅटायटिसची लक्षणे आहेत.

-----------------------

कावीळ अर्थात हिपॅटायटिस ‘ए’ आणि ‘ई’ची लागण दूषित पाणी आणि अन्नाद्वारे होते. तर, कावीळ ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’चा प्रसार दूषित रक्त, असुरक्षित शारीरिक संबंध यांद्वारे होतो. कावीळ हे यकृताशी संबंधित आजाराचे लक्षण असते. लहानपणीच काविळीला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने लसीकरण झाल्यास भविष्यातील धोके टाळता येतात. ‘ए’ ते ‘ई’ या पाच प्रकारच्या विषाणूंमुळे कावीळची लागण होते. कोणत्याही प्रकारची कावीळ गर्भवती महिलांसाठी अधिक धोकादायक असते. त्यामुळे हिपॅटायटिसचे निदान होण्यासाठी रक्त तपासणी आवश्यक असते.

- डॉ. प्रमोद जोग, माजी अध्यक्ष, बालरोगतज्ज्ञ संघटना

----------------------

ब-याच लोकांना हिपॅटायटिसविषयी माहिती नसते आणि त्यामुळे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. हिपॅटायटिस बी आणि सीची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत आणि नकळत या विषाणूचा प्रसार होतो. वेळीच तपासणी केल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तींची संपूर्ण तपासणी आणि त्यानुसार उपचार केले जातात. हिपॅटायटिसचे निदान रक्त तपासणीतून केले जाते. यामध्ये अँटीबॉडी आढळून आल्यास रक्त नमुन्याची पीसीआर चाचणी करून विषाणू अजूनही अस्तित्त्वात आहेत की नाही आणि रक्तप्रवाहामध्ये किती अस्तित्त्वात आहे हे तपासले जाते.

- डॉ. कीर्ती कोटला, पॅथॉलॉजिस्ट

--------------------

हिपॅटायटिसकडे दुर्लक्ष केल्यास आजार आणखी वाढू शकतो. म्हणूनच, चाचणी करून आणि लवकर उपचार करून घेणे योग्य ठरते. हिपॅटायटिस झालेल्या व्यक्तीला सिरोसिस किंवा कर्करोगाचा त्रास होऊ शकतो. लवकर निदान आणि उपचारामुळे यकृत निकामी होण्यापासून रोखता येऊ शकते.

- डॉ. मुकेश बुधवानी, जनरल फिजिशियन