शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय खतासाठी मेंढ्यांचा वापर

By admin | Updated: June 2, 2014 01:45 IST

वेगवान नागरीकरणामुळे शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेती नाहीशी होऊन येथे मोठमोठ्या इमारती उभ्या रहात आहेत.

रहाटणी : वेगवान नागरीकरणामुळे शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेती नाहीशी होऊन येथे मोठमोठ्या इमारती उभ्या रहात आहेत. मात्र काही शेतकरी आपल्या जमिनी राखून आहेत. ते आजही हंगामाप्रमाणे पिके घेत आहेत. शेतकरी जमिनीला सुपीक करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरत आहेत. त्यातच जमिनीची पोत वाढविण्यासाठी शेतात शेळ्या-मेंढ्या बसविल्या जातात. ही परंपरागत पद्धत कायम असल्याचे रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात दिसते. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपिकतेवर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत जाते. दुसरीकडे महागडी व रासायनिक खते खरेदी करणे शेतकर्‍यांना कठीण झाले आहे. महागाईने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडल्याची वेळ आली आहे. आर्थिक ओढाताणीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. महागडी रासायनिक खते वापरणे परवडत नसल्याने अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला आहे. मात्र, त्यासाठी शेणखत वापरणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे चांगले पीक येत असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे शेतात शेळ्या-मेंढ्या बसविल्या जातात. यासाठी फिरतीवरील मेंढपाळांशी अगोदर संपर्कात रहावे लागते. शेतीची मशागत, पेरणी, कोळपणी हे योग्य वेळीच करावी लागते. आधुनिक यंत्राचा वापर करून का होईना पण शेती करणे अनेकांनी सोडले नाही.सध्या रहाटणी येथील तापकीरमळा परिसरात मेंढपाळांचे वाडे दाखल झाले आहेत. शेतात ठिकठिकाणी शेळ्या-मेंढ्या बसवले जात आहेत. एकीकडे शहराचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असताना दुसरीकडे शेतकरी जुन्या परंपरा सुरू ठेवत असल्याचे पाहून ग्रामीण भागात आल्याचा भास होतो. सिमेंटच्या जंगलात सुपीक शेती करण्याचे धाडस अनेक शेतकरी करीत आहेत. अगदी काही दिवसांवर मृगनक्षत्र येऊन ठेपला आहे. मोसमी पावसाला केव्हाही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे शहरातीलही शेतकरी जमिनीच्या मशागतीसाठी कामात मग्न दिसून येत आहे. (वार्ताहर)