शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

सेंद्रिय खतासाठी मेंढ्यांचा वापर

By admin | Updated: June 2, 2014 01:45 IST

वेगवान नागरीकरणामुळे शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेती नाहीशी होऊन येथे मोठमोठ्या इमारती उभ्या रहात आहेत.

रहाटणी : वेगवान नागरीकरणामुळे शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेती नाहीशी होऊन येथे मोठमोठ्या इमारती उभ्या रहात आहेत. मात्र काही शेतकरी आपल्या जमिनी राखून आहेत. ते आजही हंगामाप्रमाणे पिके घेत आहेत. शेतकरी जमिनीला सुपीक करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरत आहेत. त्यातच जमिनीची पोत वाढविण्यासाठी शेतात शेळ्या-मेंढ्या बसविल्या जातात. ही परंपरागत पद्धत कायम असल्याचे रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात दिसते. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपिकतेवर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत जाते. दुसरीकडे महागडी व रासायनिक खते खरेदी करणे शेतकर्‍यांना कठीण झाले आहे. महागाईने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडल्याची वेळ आली आहे. आर्थिक ओढाताणीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. महागडी रासायनिक खते वापरणे परवडत नसल्याने अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला आहे. मात्र, त्यासाठी शेणखत वापरणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे चांगले पीक येत असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे शेतात शेळ्या-मेंढ्या बसविल्या जातात. यासाठी फिरतीवरील मेंढपाळांशी अगोदर संपर्कात रहावे लागते. शेतीची मशागत, पेरणी, कोळपणी हे योग्य वेळीच करावी लागते. आधुनिक यंत्राचा वापर करून का होईना पण शेती करणे अनेकांनी सोडले नाही.सध्या रहाटणी येथील तापकीरमळा परिसरात मेंढपाळांचे वाडे दाखल झाले आहेत. शेतात ठिकठिकाणी शेळ्या-मेंढ्या बसवले जात आहेत. एकीकडे शहराचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असताना दुसरीकडे शेतकरी जुन्या परंपरा सुरू ठेवत असल्याचे पाहून ग्रामीण भागात आल्याचा भास होतो. सिमेंटच्या जंगलात सुपीक शेती करण्याचे धाडस अनेक शेतकरी करीत आहेत. अगदी काही दिवसांवर मृगनक्षत्र येऊन ठेपला आहे. मोसमी पावसाला केव्हाही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे शहरातीलही शेतकरी जमिनीच्या मशागतीसाठी कामात मग्न दिसून येत आहे. (वार्ताहर)