शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बीव्हीजीकडून विकसित ‘शतप्लस’ रुग्णांसाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘शतप्लस’ हे आयुर्वेदिक औषध वापरण्यास कोणताही तोटा नाही. ससून रूग्णालयात करण्यात आलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘शतप्लस’ हे आयुर्वेदिक औषध वापरण्यास कोणताही तोटा नाही. ससून रूग्णालयात करण्यात आलेल्या प्रयोगात ९६ टक्के लोक बरे झाल्याचे सिद्ध झाले आहे. कर्वे शिक्षण संस्थांमधील ५०० रुग्णांना दिले. एका रूग्णाला ५ दिवस हे औषध पुरते. त्यामुळे आम्ही एसएनडीटी विलीगीकरण कक्षाला देखील ३०० बाटल्या देणार आहोत. मात्र, पहिला रूग्ण आल्यानंतर दहा जणांच्या ५ दिवस चाचण्या केल्या जाव्यात. रूग्ण आल्यानंतर ऑॅक्सिजन पातळी किती होती, संसर्ग किती होता याची नोंद ठेवली जावी. याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला तर आम्ही एक लाख बाटल्या, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेडने (बीव्हीजी) रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी आणि विविध विषाणूजन्य संसर्गाशी लढा देण्यासाठी ‘शतप्लस’ हे आयुर्वेदिक औषध निर्मित केले आहे. सध्याच्या काळात कोरोना संसर्गाला नियंत्रित करू शकणारे असे हे औषध निरोगी शरीरासाठी आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी आशेचा किरण असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारकशक्ती संतुलित करणाऱ्या या आयुर्वेदिक औषधाची माहिती देताना बीव्हीजीचे संस्थापक हणमंतराव गायकवाड म्हणाले, "शतप्लस" हे औषध लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरणारे आहे. हे औषध वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित असून, त्यात अँटी आक्सिडेटिव्ह, अँटी इंप्लेमेटरी, अँटी व्हायरल आणि इम्युनो मॉड्युलेटरी हे गुणधर्म आहेत.

कोट

आयुर्वेद आणि नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित शतप्लस चिकित्सेमुळे प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये सार्स कोविड विषाणूच्या संख्येत ९४ टक्के घट दिसून आली आहे. उपचारांच्या पहिल्या ४ दिवसांतच ७३ टक्के, सातव्या दिवशी ९६.७ टक्के, तर उपचाराच्या दहाव्या दिवशी शंभर टक्के शतप्लस उपचार गटातील रूग्णांना फायदा झाला आहे.

हणमंतराव गायकवाड, संस्थापक, बीव्हीजी लाईफ सायन्सेस

-----------------------