शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

उरुळी कांचनला होतेय वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:13 IST

-- उरुळी कांचन : उरुळी कांचन गावातील दैनंदिन वाहतूक व्यवस्था पूर्ण बेशिस्त झाली असून त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष नसल्याने ...

--

उरुळी कांचन : उरुळी कांचन गावातील दैनंदिन वाहतूक व्यवस्था पूर्ण बेशिस्त झाली असून त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष नसल्याने जनता त्रस्त झाली असून वाहतुकीची दुरावस्था या गावातील सर्वसामान्य नागरिकाची डोकेदुखी झाली आहे यावर नेमका तोडगा काढून यातून जनतेला दिलासा देणारी कोणतीच योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून वा या भागाचे आमदार, खासदार या वरिष्ठ लोकप्रतिनिधिकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे.

साध्या साध्या कामासाठी दुचाकीस्वाराला देखील अर्धा ते पाऊन तास रस्त्यात घालवावा लागत आहे. सध्या उरुळी कांचन गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया चालू असून या ठिकाणी २० ऑगस्ट पासून प्रशासक राज आहे, पंचायत समिती हवेलीचे विस्तार अधिकारी निकेतन धापटे व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस हे सध्या कारभारी आहेत, हे दोघेही नवीन असल्याने ते कार्यकारी मंडळ निवडून येण्याची वाट बघत या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा ठपका सर्वसामान्य नागरिकांनी ठेवला आहे. उरुळी कांचनच्या भौतिक गरजांसाठी जनतेने निवडून दिलेल्या सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी एकत्र येवून सर्वांगीण विकास आराखडा तयार करून जनतेला दिलासा देण्याचे काम करणे अपेक्षित असताना ते गेल्या १५ ते २० वर्षाच्या काळात होत नाही अशी खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.

सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो ज्याने गावाचे दोन भागात विभाजन केले आहे, तसेच मुंबई - पुणे या ठिकाणाहून दौंड, सोलापूर,हैदराबादच्या बाजूला जाणाऱ्या रेल्वे गाड्या उरुळी स्टेशनवरून जातात या लोहमार्गानेही गावाच्या हद्दीचे विभाजन झाले आहे, अशा प्रकारे दोन महत्वाच्या दळणवळण मार्गाच्या गावठाण हद्दीतून जाण्याने गावाचे तीन तुकडे झाले आहेत यावरून होणारी मोठ्या वाहनांची वाहतूक व वाढलेल्या नागरीकरणाने या ठिकाणी असलेल्या कामगार, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी वर्ग यांच्या दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर आदी वाहनांची दररोजची वाढणारी संख्या यामुळे असलेले रस्ते हा वाहतुकीचा भार पेलण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहेत.

--

चौकट

ट्राफिक जामसाठी अतक्रिमण प्रमुख कारण

सेवा रस्त्यावरील टपऱ्यांचे, हातगाड्यांचे अतिक्रमण तसेच रस्त्यांवरील, ओढ्यावरील व सार्वजनिक जागांवरील वाढणारे अतिक्रमण पोलिसांच्या मदतीने काढण्या कडे होणारे दुर्लक्ष गावातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहे. त्याकडे जाणीव पूर्वक केले जाणारे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे, या कोंडीतून रुग्णवाहीकाही सुटत नाही. याला पर्याय देत बेशिस्त मोडीत काढून वाहतुकीला शिस्त लावणे अत्यंत गरजेचे झाले असताना ग्रामपंचायत प्रशासन ठप्प का? असा प्रश्न जनतेला सतावत आहे.

--

फोटो : ०२ उरुळी कांचन वाहतुक कोंडी

फोटो ओळ : तळवाडी चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.