शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

उरुळी कांचनला होतेय वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:13 IST

-- उरुळी कांचन : उरुळी कांचन गावातील दैनंदिन वाहतूक व्यवस्था पूर्ण बेशिस्त झाली असून त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष नसल्याने ...

--

उरुळी कांचन : उरुळी कांचन गावातील दैनंदिन वाहतूक व्यवस्था पूर्ण बेशिस्त झाली असून त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष नसल्याने जनता त्रस्त झाली असून वाहतुकीची दुरावस्था या गावातील सर्वसामान्य नागरिकाची डोकेदुखी झाली आहे यावर नेमका तोडगा काढून यातून जनतेला दिलासा देणारी कोणतीच योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून वा या भागाचे आमदार, खासदार या वरिष्ठ लोकप्रतिनिधिकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे.

साध्या साध्या कामासाठी दुचाकीस्वाराला देखील अर्धा ते पाऊन तास रस्त्यात घालवावा लागत आहे. सध्या उरुळी कांचन गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया चालू असून या ठिकाणी २० ऑगस्ट पासून प्रशासक राज आहे, पंचायत समिती हवेलीचे विस्तार अधिकारी निकेतन धापटे व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस हे सध्या कारभारी आहेत, हे दोघेही नवीन असल्याने ते कार्यकारी मंडळ निवडून येण्याची वाट बघत या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा ठपका सर्वसामान्य नागरिकांनी ठेवला आहे. उरुळी कांचनच्या भौतिक गरजांसाठी जनतेने निवडून दिलेल्या सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी एकत्र येवून सर्वांगीण विकास आराखडा तयार करून जनतेला दिलासा देण्याचे काम करणे अपेक्षित असताना ते गेल्या १५ ते २० वर्षाच्या काळात होत नाही अशी खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.

सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो ज्याने गावाचे दोन भागात विभाजन केले आहे, तसेच मुंबई - पुणे या ठिकाणाहून दौंड, सोलापूर,हैदराबादच्या बाजूला जाणाऱ्या रेल्वे गाड्या उरुळी स्टेशनवरून जातात या लोहमार्गानेही गावाच्या हद्दीचे विभाजन झाले आहे, अशा प्रकारे दोन महत्वाच्या दळणवळण मार्गाच्या गावठाण हद्दीतून जाण्याने गावाचे तीन तुकडे झाले आहेत यावरून होणारी मोठ्या वाहनांची वाहतूक व वाढलेल्या नागरीकरणाने या ठिकाणी असलेल्या कामगार, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी वर्ग यांच्या दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर आदी वाहनांची दररोजची वाढणारी संख्या यामुळे असलेले रस्ते हा वाहतुकीचा भार पेलण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहेत.

--

चौकट

ट्राफिक जामसाठी अतक्रिमण प्रमुख कारण

सेवा रस्त्यावरील टपऱ्यांचे, हातगाड्यांचे अतिक्रमण तसेच रस्त्यांवरील, ओढ्यावरील व सार्वजनिक जागांवरील वाढणारे अतिक्रमण पोलिसांच्या मदतीने काढण्या कडे होणारे दुर्लक्ष गावातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहे. त्याकडे जाणीव पूर्वक केले जाणारे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे, या कोंडीतून रुग्णवाहीकाही सुटत नाही. याला पर्याय देत बेशिस्त मोडीत काढून वाहतुकीला शिस्त लावणे अत्यंत गरजेचे झाले असताना ग्रामपंचायत प्रशासन ठप्प का? असा प्रश्न जनतेला सतावत आहे.

--

फोटो : ०२ उरुळी कांचन वाहतुक कोंडी

फोटो ओळ : तळवाडी चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.