शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी उलगडली यशोगाथा

By admin | Updated: June 3, 2017 02:53 IST

यूपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं... प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय, हे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यूपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं... प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय, हे एकदा पक्कं ठरवून मगच यूपीएससी परीक्षेला सुरुवात करा... हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क यांचा मेळ घाला... आयएएस बनून जिल्हयाचा प्रमुख बनणं यासारखं दुसरं यश असूच शकत नाही, त्यामुळे कसून तयारी करा, असे कानमंत्र देत यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची शुक्रवारी यशोगाथा उलगडली.द युनिक अ‍ॅकॅडमीच्या वतीने यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गणेश कला, क्रीडा मंदिर येथे करण्यात आले होते. या वेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयक्त शीतल उगले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, मल्हार पाटील, भूषण देशमुख, प्रवीण चव्हाण, मनोहर भोळे, मंगेश खराटे, अमर जगताप या वेळी उपस्थित होते. यूपीएससी परीक्षेकडे का वळलो, त्याचा अभ्यास कसा केला, त्यासाठी काय संघर्ष करावा लागला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करीत कसे यशस्वी ठरलो आदी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून मांडले. यूपीएससीमध्ये राज्यातून पहिली आलेली विश्वांजली गायकवाड म्हणाली, ‘‘तुम्हाला यूपीएससी परीक्षा का करायची आहे, ते पहिल्यांदा निश्चित करा. सगळं लिहून काढा, हवं तर कुणाला सांगू नका. मात्र तुम्ही हे का करताय, ते तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट असलं पाहिजे. त्यानंतर आपण नाहक यामध्ये अडकलो नाही ना, असे वाटत नाही. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना वेळेचे नियोजन करणं याला फार महत्त्व आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये स्वत:ची मते मांडणे अपेक्षित असते.’’दिनेश गुरव म्हणाला, ‘‘इंजिनिअरिंग करत असतानाच यूपीएससी करायचे निश्चित केले होते. त्यानुसार परीक्षेच्या तयारीसाठी स्वत:ला झोकून दिले. दुसऱ्या प्रयत्नांमध्ये यश आले.’’किरण खरे म्हणाला, ‘‘आयएएस अधिकारीपदामध्ये सत्ता आहे. देशातला हा सर्वात बेस्ट जॉब आहे. त्यामुळे स्वत:ला ओळखून या परीक्षेची तयारी सुरू करावी.’’तुकाराम जाधव म्हणाले, ‘‘युनिकला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. प्रत्येक वर्षी आम्ही यूपीएससीच्या निकालानंतर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतो. कारण प्रत्येक निकालानंतर वेगवेगळया सक्सेस स्टोरी पुढे येत असतात.’’या वेळी अजय पवार, यशवंत सोनवणे, गोरख भामरे, आशिष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महेश शिरापूरकर यांनी सूत्रसंचालन केले....हे म्हणजे यश असतंजळगावच्या आशिष पाटील याने त्याच्या मनोगतामध्ये धमाकेदार बॅटिंग केली. पुण्यात येऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा झगडा करीत यश मिळविलं ते त्याने सांगितलं. तो म्हणाला, ‘‘कालपर्यंत बसचे दोन रुपये तिकीट वाचविण्यासाठी कल्पना लढवायचो. एकेका रूममध्ये चार-पाच जण दाटीवाटीने राहायचो. साधा ७ रुपयांचा चहा जास्त पाणी घालून मिळाला तरी चरफडायचो. मात्र यूपीएसीच्या निकालानंतर रात्रीतून सारं चित्र बदलून गेलं. आज २० रुपयांचा महागडा चहा पिला तरी त्याचे फार वाईट वाटल नाही. हे म्हणजे यश असतं.’’