शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी उलगडली यशोगाथा

By admin | Updated: June 3, 2017 02:53 IST

यूपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं... प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय, हे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यूपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं... प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय, हे एकदा पक्कं ठरवून मगच यूपीएससी परीक्षेला सुरुवात करा... हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क यांचा मेळ घाला... आयएएस बनून जिल्हयाचा प्रमुख बनणं यासारखं दुसरं यश असूच शकत नाही, त्यामुळे कसून तयारी करा, असे कानमंत्र देत यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची शुक्रवारी यशोगाथा उलगडली.द युनिक अ‍ॅकॅडमीच्या वतीने यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गणेश कला, क्रीडा मंदिर येथे करण्यात आले होते. या वेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयक्त शीतल उगले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, मल्हार पाटील, भूषण देशमुख, प्रवीण चव्हाण, मनोहर भोळे, मंगेश खराटे, अमर जगताप या वेळी उपस्थित होते. यूपीएससी परीक्षेकडे का वळलो, त्याचा अभ्यास कसा केला, त्यासाठी काय संघर्ष करावा लागला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करीत कसे यशस्वी ठरलो आदी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून मांडले. यूपीएससीमध्ये राज्यातून पहिली आलेली विश्वांजली गायकवाड म्हणाली, ‘‘तुम्हाला यूपीएससी परीक्षा का करायची आहे, ते पहिल्यांदा निश्चित करा. सगळं लिहून काढा, हवं तर कुणाला सांगू नका. मात्र तुम्ही हे का करताय, ते तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट असलं पाहिजे. त्यानंतर आपण नाहक यामध्ये अडकलो नाही ना, असे वाटत नाही. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना वेळेचे नियोजन करणं याला फार महत्त्व आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये स्वत:ची मते मांडणे अपेक्षित असते.’’दिनेश गुरव म्हणाला, ‘‘इंजिनिअरिंग करत असतानाच यूपीएससी करायचे निश्चित केले होते. त्यानुसार परीक्षेच्या तयारीसाठी स्वत:ला झोकून दिले. दुसऱ्या प्रयत्नांमध्ये यश आले.’’किरण खरे म्हणाला, ‘‘आयएएस अधिकारीपदामध्ये सत्ता आहे. देशातला हा सर्वात बेस्ट जॉब आहे. त्यामुळे स्वत:ला ओळखून या परीक्षेची तयारी सुरू करावी.’’तुकाराम जाधव म्हणाले, ‘‘युनिकला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. प्रत्येक वर्षी आम्ही यूपीएससीच्या निकालानंतर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतो. कारण प्रत्येक निकालानंतर वेगवेगळया सक्सेस स्टोरी पुढे येत असतात.’’या वेळी अजय पवार, यशवंत सोनवणे, गोरख भामरे, आशिष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महेश शिरापूरकर यांनी सूत्रसंचालन केले....हे म्हणजे यश असतंजळगावच्या आशिष पाटील याने त्याच्या मनोगतामध्ये धमाकेदार बॅटिंग केली. पुण्यात येऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा झगडा करीत यश मिळविलं ते त्याने सांगितलं. तो म्हणाला, ‘‘कालपर्यंत बसचे दोन रुपये तिकीट वाचविण्यासाठी कल्पना लढवायचो. एकेका रूममध्ये चार-पाच जण दाटीवाटीने राहायचो. साधा ७ रुपयांचा चहा जास्त पाणी घालून मिळाला तरी चरफडायचो. मात्र यूपीएसीच्या निकालानंतर रात्रीतून सारं चित्र बदलून गेलं. आज २० रुपयांचा महागडा चहा पिला तरी त्याचे फार वाईट वाटल नाही. हे म्हणजे यश असतं.’’