शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी उलगडली यशोगाथा

By admin | Updated: June 3, 2017 02:53 IST

यूपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं... प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय, हे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यूपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं... प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय, हे एकदा पक्कं ठरवून मगच यूपीएससी परीक्षेला सुरुवात करा... हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क यांचा मेळ घाला... आयएएस बनून जिल्हयाचा प्रमुख बनणं यासारखं दुसरं यश असूच शकत नाही, त्यामुळे कसून तयारी करा, असे कानमंत्र देत यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची शुक्रवारी यशोगाथा उलगडली.द युनिक अ‍ॅकॅडमीच्या वतीने यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गणेश कला, क्रीडा मंदिर येथे करण्यात आले होते. या वेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयक्त शीतल उगले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, मल्हार पाटील, भूषण देशमुख, प्रवीण चव्हाण, मनोहर भोळे, मंगेश खराटे, अमर जगताप या वेळी उपस्थित होते. यूपीएससी परीक्षेकडे का वळलो, त्याचा अभ्यास कसा केला, त्यासाठी काय संघर्ष करावा लागला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करीत कसे यशस्वी ठरलो आदी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून मांडले. यूपीएससीमध्ये राज्यातून पहिली आलेली विश्वांजली गायकवाड म्हणाली, ‘‘तुम्हाला यूपीएससी परीक्षा का करायची आहे, ते पहिल्यांदा निश्चित करा. सगळं लिहून काढा, हवं तर कुणाला सांगू नका. मात्र तुम्ही हे का करताय, ते तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट असलं पाहिजे. त्यानंतर आपण नाहक यामध्ये अडकलो नाही ना, असे वाटत नाही. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना वेळेचे नियोजन करणं याला फार महत्त्व आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये स्वत:ची मते मांडणे अपेक्षित असते.’’दिनेश गुरव म्हणाला, ‘‘इंजिनिअरिंग करत असतानाच यूपीएससी करायचे निश्चित केले होते. त्यानुसार परीक्षेच्या तयारीसाठी स्वत:ला झोकून दिले. दुसऱ्या प्रयत्नांमध्ये यश आले.’’किरण खरे म्हणाला, ‘‘आयएएस अधिकारीपदामध्ये सत्ता आहे. देशातला हा सर्वात बेस्ट जॉब आहे. त्यामुळे स्वत:ला ओळखून या परीक्षेची तयारी सुरू करावी.’’तुकाराम जाधव म्हणाले, ‘‘युनिकला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. प्रत्येक वर्षी आम्ही यूपीएससीच्या निकालानंतर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतो. कारण प्रत्येक निकालानंतर वेगवेगळया सक्सेस स्टोरी पुढे येत असतात.’’या वेळी अजय पवार, यशवंत सोनवणे, गोरख भामरे, आशिष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महेश शिरापूरकर यांनी सूत्रसंचालन केले....हे म्हणजे यश असतंजळगावच्या आशिष पाटील याने त्याच्या मनोगतामध्ये धमाकेदार बॅटिंग केली. पुण्यात येऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा झगडा करीत यश मिळविलं ते त्याने सांगितलं. तो म्हणाला, ‘‘कालपर्यंत बसचे दोन रुपये तिकीट वाचविण्यासाठी कल्पना लढवायचो. एकेका रूममध्ये चार-पाच जण दाटीवाटीने राहायचो. साधा ७ रुपयांचा चहा जास्त पाणी घालून मिळाला तरी चरफडायचो. मात्र यूपीएसीच्या निकालानंतर रात्रीतून सारं चित्र बदलून गेलं. आज २० रुपयांचा महागडा चहा पिला तरी त्याचे फार वाईट वाटल नाही. हे म्हणजे यश असतं.’’