शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र असेपर्यंत राष्ट्र शाबूत

By admin | Updated: March 20, 2017 04:18 IST

मराठी माणूस हा कधीही एकत्र येणार नाही किंवा महाराष्ट्र कमकुवत राहील अशीच व्यूहरचना दिल्लीतून कायम केली गेली आहे.

तळेगाव दाभाडे : मराठी माणूस हा कधीही एकत्र येणार नाही किंवा महाराष्ट्र कमकुवत राहील अशीच व्यूहरचना दिल्लीतून कायम केली गेली आहे. परंतु जोपर्यंत महाराष्ट्र आहे, तोपर्यंत आपले राष्ट्र शाबूत राहील, असे प्रतिपादन व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी यांनी केले.गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्राची समृद्ध परंपरा’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना घावटे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक संग्राम काकडे होते. नगरसेवक सचिन टकले, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बच्चुशेठ तांबोळी, कवयित्री शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर उपस्थित होते. घावटे म्हणाले की, ‘महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले’ असे सेनापती बापट यांनी म्हटले होते ते शब्दश: खरे आहेत. ‘भारतामध्ये जन्म होणे दुर्लभ आहे आणि महाराष्ट्रात जन्माला येणे हे तर अतिदुर्लभ आहे, असे प्राचीन संस्कृत वचन आहे. कारण ज्याच्या नावातच राष्ट्र आहे, असे महाराष्ट्र हे आपल्या देशातील एकमेव राज्य आहे. जगातील अनेक जगज्जेत्यांबरोबर शिवाजीमहाराजांची तुलना केली जाते. परंतु त्या जगज्जेत्यांच्या हयातीनंतर त्यांची साम्राज्ये लयास गेली; पण जंग जंग पछाडूनही मराठ्यांचे राज्य अबाधित राहिले. उलट पेशवेकाळात अटक ते कटक असे संपूर्ण भारतभर मराठ्यांचे राज्य होते आणि त्या काळात दिल्लीवर भगवे निशाण फडकले होते. व्याख्यानापूर्वी, पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘निसर्गराजा’ या संस्थेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजनात उमाकांत महाजन, संदीप शेळके, सतीश देशपांडे, माधुरी देशपांडे यांनी सहकार्य केले. ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन, प्रा. जीवन पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)