शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

महाराष्ट्र असेपर्यंत राष्ट्र शाबूत

By admin | Updated: March 20, 2017 04:18 IST

मराठी माणूस हा कधीही एकत्र येणार नाही किंवा महाराष्ट्र कमकुवत राहील अशीच व्यूहरचना दिल्लीतून कायम केली गेली आहे.

तळेगाव दाभाडे : मराठी माणूस हा कधीही एकत्र येणार नाही किंवा महाराष्ट्र कमकुवत राहील अशीच व्यूहरचना दिल्लीतून कायम केली गेली आहे. परंतु जोपर्यंत महाराष्ट्र आहे, तोपर्यंत आपले राष्ट्र शाबूत राहील, असे प्रतिपादन व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी यांनी केले.गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्राची समृद्ध परंपरा’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना घावटे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक संग्राम काकडे होते. नगरसेवक सचिन टकले, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बच्चुशेठ तांबोळी, कवयित्री शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर उपस्थित होते. घावटे म्हणाले की, ‘महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले’ असे सेनापती बापट यांनी म्हटले होते ते शब्दश: खरे आहेत. ‘भारतामध्ये जन्म होणे दुर्लभ आहे आणि महाराष्ट्रात जन्माला येणे हे तर अतिदुर्लभ आहे, असे प्राचीन संस्कृत वचन आहे. कारण ज्याच्या नावातच राष्ट्र आहे, असे महाराष्ट्र हे आपल्या देशातील एकमेव राज्य आहे. जगातील अनेक जगज्जेत्यांबरोबर शिवाजीमहाराजांची तुलना केली जाते. परंतु त्या जगज्जेत्यांच्या हयातीनंतर त्यांची साम्राज्ये लयास गेली; पण जंग जंग पछाडूनही मराठ्यांचे राज्य अबाधित राहिले. उलट पेशवेकाळात अटक ते कटक असे संपूर्ण भारतभर मराठ्यांचे राज्य होते आणि त्या काळात दिल्लीवर भगवे निशाण फडकले होते. व्याख्यानापूर्वी, पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘निसर्गराजा’ या संस्थेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजनात उमाकांत महाजन, संदीप शेळके, सतीश देशपांडे, माधुरी देशपांडे यांनी सहकार्य केले. ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन, प्रा. जीवन पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)