शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सीएमडीं’चा अस्थिर झुला

By admin | Updated: April 12, 2015 00:26 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही.

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही. या काळात पीएमपीची धुरा खांद्यावर असलेले तब्बल १२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पुणेकरांनी पाहिले. कधी एक दिवस तर कधी चार महिन्यांसाठी भार खांद्यावर घेतलेल्या ‘सीएमडीं’चा अस्थिर झुला पीएमपीच्या सुधारणांना लटकवणारा ठरला आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकांची स्वतंत्र सार्वजनिक वाहतूक सेवा २००७ मध्ये एकत्र करून ‘पीएमपी’ ही कंपनी स्थापन करण्यात आली. कंपनी तयार करताना कंपनीचे सर्वेसर्वा म्हणून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पद निर्माण करण्यात आले. या पदावर ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी नेमण्याचे निश्चित केले. त्यानुसार १९ आॅगस्ट २००७ रोजी सुब्बराव पाटील यांच्या रूपाने ‘पीएमपी’ला पहिले सीएमडी मिळाले. पाटील यांना काम करण्यासाठी सुमारे १३ महिन्यांचाच कालावधी मिळाला. मात्र, या काळातही त्यांनी पीएमपी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यानंतर अश्वनीकुमार यांच्यावर केवळ एकच दिवस हा भार सोपविण्यात आला. त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा पाटील यांना दीड महिन्याची तर त्यानंतर पुन्हा अश्वनीकुमार यांना तीन महिन्यांसाठी संधी देण्यात आली.‘सीएमडी’ बदलाची ही मोहीम राज्य शासनाने पुढेही नित्यनेमाने सुरूच ठेवली. मागील आठ वर्षांत तब्बल १२ अधिकारी बदलण्यात आले. खाडे यांच्यानंतर आर. एन. जोशी यांचा अपवाद वगळता सीएमडी म्हणून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर हा भार अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आला. त्यांच्याकडे इतर विभागांची मुख्य जबाबदारी होती. त्यामध्ये महेश झगडे, शिरीष कारले, दिलीप बंड, राजीव जाधव, डॉ. श्रीकर परदेशी आणि काही दिवसांपूर्वीच आलेले ओमप्रकाश बकोरिया या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ जोशी यांनीच पूर्ण तीन वर्षे पीएमपी सांभाळली. मात्र, सुरुवातीपासून टप्प्याटप्याने नवीन अधिकारी मिळत गेल्याने पीएमपीच्या दुर्दशेला सुरुवात झाली. मागील दोन-तीन वर्षांत तर पीएमपीला जणू उतरती कळा लागली आहे. आतापर्यंत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकसुब्बराव पाटील (१९ आॅगस्ट २००७ ते २१ सप्टेंबर २००८), अश्वनीकुमार (२२ सप्टेंबर २००८ (एकच दिवस), सुब्बराव पाटील (२३ सप्टेबिंर ते ५ नोव्हेंबर २००८), अश्वनीकुमार (५ नोव्हेंबर २००८ ते ५ फेबु्रवारी २००९), नितीन खाडे (९ फेबु्रवारी ते २५ आॅगस्ट २००९), महेश झगडे (२५ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर २००९ (अतिरिक्त पदभार), शिरीष कारले (७ सप्टेंबर २००९ ते २३ फेबु्रवारी २०१० (अतिरिक्त पदभार), दिलीप बंड (२३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११ (अतिरिक्त पदभार), आर. एन. जोशी (३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४), राजीव जाधव (१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०१४ (अतिरिक्त पदभार), डॉ. श्रीकर परदेशी (१४ डिसेंबर २०१४ ते ४ एप्रिल २०१५ (अतिरिक्त पदभार)