शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

सीएमडीं’चा अस्थिर झुला

By admin | Updated: April 12, 2015 00:26 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही.

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही. या काळात पीएमपीची धुरा खांद्यावर असलेले तब्बल १२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पुणेकरांनी पाहिले. कधी एक दिवस तर कधी चार महिन्यांसाठी भार खांद्यावर घेतलेल्या ‘सीएमडीं’चा अस्थिर झुला पीएमपीच्या सुधारणांना लटकवणारा ठरला आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकांची स्वतंत्र सार्वजनिक वाहतूक सेवा २००७ मध्ये एकत्र करून ‘पीएमपी’ ही कंपनी स्थापन करण्यात आली. कंपनी तयार करताना कंपनीचे सर्वेसर्वा म्हणून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पद निर्माण करण्यात आले. या पदावर ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी नेमण्याचे निश्चित केले. त्यानुसार १९ आॅगस्ट २००७ रोजी सुब्बराव पाटील यांच्या रूपाने ‘पीएमपी’ला पहिले सीएमडी मिळाले. पाटील यांना काम करण्यासाठी सुमारे १३ महिन्यांचाच कालावधी मिळाला. मात्र, या काळातही त्यांनी पीएमपी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यानंतर अश्वनीकुमार यांच्यावर केवळ एकच दिवस हा भार सोपविण्यात आला. त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा पाटील यांना दीड महिन्याची तर त्यानंतर पुन्हा अश्वनीकुमार यांना तीन महिन्यांसाठी संधी देण्यात आली.‘सीएमडी’ बदलाची ही मोहीम राज्य शासनाने पुढेही नित्यनेमाने सुरूच ठेवली. मागील आठ वर्षांत तब्बल १२ अधिकारी बदलण्यात आले. खाडे यांच्यानंतर आर. एन. जोशी यांचा अपवाद वगळता सीएमडी म्हणून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर हा भार अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आला. त्यांच्याकडे इतर विभागांची मुख्य जबाबदारी होती. त्यामध्ये महेश झगडे, शिरीष कारले, दिलीप बंड, राजीव जाधव, डॉ. श्रीकर परदेशी आणि काही दिवसांपूर्वीच आलेले ओमप्रकाश बकोरिया या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ जोशी यांनीच पूर्ण तीन वर्षे पीएमपी सांभाळली. मात्र, सुरुवातीपासून टप्प्याटप्याने नवीन अधिकारी मिळत गेल्याने पीएमपीच्या दुर्दशेला सुरुवात झाली. मागील दोन-तीन वर्षांत तर पीएमपीला जणू उतरती कळा लागली आहे. आतापर्यंत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकसुब्बराव पाटील (१९ आॅगस्ट २००७ ते २१ सप्टेंबर २००८), अश्वनीकुमार (२२ सप्टेंबर २००८ (एकच दिवस), सुब्बराव पाटील (२३ सप्टेबिंर ते ५ नोव्हेंबर २००८), अश्वनीकुमार (५ नोव्हेंबर २००८ ते ५ फेबु्रवारी २००९), नितीन खाडे (९ फेबु्रवारी ते २५ आॅगस्ट २००९), महेश झगडे (२५ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर २००९ (अतिरिक्त पदभार), शिरीष कारले (७ सप्टेंबर २००९ ते २३ फेबु्रवारी २०१० (अतिरिक्त पदभार), दिलीप बंड (२३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११ (अतिरिक्त पदभार), आर. एन. जोशी (३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४), राजीव जाधव (१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०१४ (अतिरिक्त पदभार), डॉ. श्रीकर परदेशी (१४ डिसेंबर २०१४ ते ४ एप्रिल २०१५ (अतिरिक्त पदभार)