शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुककोंडीने हैराण

By admin | Updated: January 11, 2017 02:34 IST

गेली अनेक वर्षे वाहतूककोंडीच्या विळख्यात सापडलेल्या राजगुरुनगरवासीयांची सुटका, या प्रश्नामध्ये प्रशासनाने घातलेले लक्ष

किशोर भगत / राजगुरूनगरगेली अनेक वर्षे वाहतूककोंडीच्या विळख्यात सापडलेल्या राजगुरुनगरवासीयांची सुटका, या प्रश्नामध्ये प्रशासनाने घातलेले लक्ष दिलासा देणारे असले, तरी सुचविलेल्या उपायांची कठोरपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ होण्याची शक्यता आहे.राजगुरुनगर शहरातील शिरूर-भीमाशंकर रस्ता (वाडा रस्ता) तसेच पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढती लोकसंख्या, अपुरे रस्ते आणि वाहनचालकांची बेशिस्त यामुळे दिवसेंदिवस या कोंडीमुळे वाढच होत आहे. उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांनी ३ महिन्यांपूर्वी कार्यभार घेतल्यानंतर दोनच दिवसांमध्ये त्यांना या वाहतूककोंडीचा अनुभव आला आणि त्यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह हा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेणार असल्याचे सांगितले. परंतु, आळंदी नगर परिषदेची निवडणूक आल्याने ही बैठक लांबली होती. मात्र, गेल्या आठवड्यात ही बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्ते, नागरिकांनी अनेक उपाययोजना सुचविल्या. आता प्रश्न आहे तो कठोर अंमलबजावणीचा!केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणारा पूल आणि पुणे-नाशिक महामार्गाचे बाह्यवळण या दोन कामांमुळे खरे तर हा प्रश्न सुटणार आहे. परंतु, ही दोन्ही कामे होण्यासाठी किमान एक वर्ष तरी जाणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यामध्ये सध्या वापरात असलेल्या गढई मैदान ते पोलीस स्थानक या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नगर परिषदेकडून प्रथम त्याची दुरुस्ती होण्याची गरज आहे. तसेच, क्रीडासंकुलाशेजारील पुणे-नाशिक महामागार्ला जोडणाऱ्या रस्त्याचेही काम होणे आवश्यक आहे. शहरातील वाडा रस्त्यावरील अतिक्रमणे तसेच बेशिस्तपणे लावण्यात येणारी वाहने यांवर कारवाई होण्याची गरज आहे. यापूर्वी सुहास दिवसे व सुनील थोरवे या अधिकाऱ्यांनी त्यांच्या काळात कठोर भूमिका घेऊन अतिक्रमणे काढली होती. तशीच कारवाई या वेळी होण्याची गरज आहे. गावठाणातील कचेरी रस्त्यावर (मोमीनआळी) दोन्ही बाजूंनी दुचाकी लावल्या जातात. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे ठप्प होतो. त्यासाठी दिलावरखाँ दर्ग्याच्या बाहेरील जागेमध्ये पार्किंग केल्यास हा रस्ता खुला होईल. पुणे-नाशिक महामार्गावर सकाळी ९ पासून रात्री नऊपर्यंत पोलिसांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत सुरू असते. परंतु, या ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहनचालक लेन कट करून पुढे वाहने दामटतात आणि वाहतूककोंडी होते. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. या रस्त्यावर दुभाजक टाकावा, अशीही सूचना आली आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल. पाबळ रस्ताही मोठा झाला तरी तेथेही कडेला मोठी वाहने लावल्यामुळे वाहतूककोंडी होते.प्रशासनाला हवी नागरिकांची साथलग्नसराई व निवडणुकांचा हंगाम सध्या सुरू झाला आहे. त्यामुळे वाहतूककोंडीमध्ये भरच पडणार आहे. याशिवाय, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका कधीही जाहीर होतील व प्रशासन पुन्हा निवडणुकीच्या कामामध्ये गुरफटणार असून, त्यामुळे या प्रश्नाकडे पुन्हा दुर्लक्ष होता कामा नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. यासाठी प्रशासनाला नागरिकांनीही साथ देण्याची गरज आहे.