शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून ‘अनलाॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचा कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दर पाच टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचा कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दर पाच टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार ‘अनलाॅक’ची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (दि. ७) सुरू होईल. मात्र ‘अनलाॅक’ कशा प्रकारे याचा निर्णय दोन दिवसांची परिस्थिती पाहून घेण्यात येईल,” असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ४) विभागीय आयुक्तालयात साप्ताहिक कोरोना आढावा बैठक झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पवार बोलत होते.

पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यात तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह पुणे-खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये ‘पाॅझिटिव्हिटी’ दर चांगलाच कमी झाला आहे. यामुळे येथील नियम शिथिल करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व व्यापारी वर्गाकडून होत आहे. त्यानुसार शहरी भागातले नियम शिथिल केले जाणार आहेत. येत्या दोन दिवसातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोणते निर्बंध शिथिल करायचे याचा निर्णय घेण्यात येईल. “पुणे ग्रामीणचा ‘पाॅझिटिव्हिटी’ दर अजूनही १२-१३ टक्क्यांच्या दरम्यान आहे. यामुळे सध्या तरी ग्रामीण भागात नियम शिथिल केले जाणार नाही,” असे त्यांनीही स्पष्ट केले.

दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीचा विषय बैठकीत आला. आळंदी देवस्थानच्या अभय टिळक यांनी वारकऱ्यांची भूमिका पवारांपुढे मांडली. टिळक यांनी तीन पर्याय सरकारपुढे ठेवले. ते म्हणाले, “कोरोना साथ ओसरली तर पाचशे जणांना परवानगी द्यावी. कोरोना कमी झाला नाही तर दोनशे वारकऱ्यांना जाऊ द्यावे. स्थिती अगदीच बिघडली तर शंभर जणांना परवानगी द्यावी.”

चौकट

अजित पवार म्हणाले...

-सलून, ब्युटीपार्लर देखील सुरू करावेत अशी मागणी होत आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू.

-संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पंढरपूर आषाढी पालखी सोहळ्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती वारकऱ्यांशी चर्चा करून तीन-चार दिवसांत अहवाल देणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.