शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून ‘अनलाॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचा कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दर पाच टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचा कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दर पाच टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार ‘अनलाॅक’ची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (दि. ७) सुरू होईल. मात्र ‘अनलाॅक’ कशा प्रकारे याचा निर्णय दोन दिवसांची परिस्थिती पाहून घेण्यात येईल,” असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ४) विभागीय आयुक्तालयात साप्ताहिक कोरोना आढावा बैठक झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पवार बोलत होते.

पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यात तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह पुणे-खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये ‘पाॅझिटिव्हिटी’ दर चांगलाच कमी झाला आहे. यामुळे येथील नियम शिथिल करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व व्यापारी वर्गाकडून होत आहे. त्यानुसार शहरी भागातले नियम शिथिल केले जाणार आहेत. येत्या दोन दिवसातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोणते निर्बंध शिथिल करायचे याचा निर्णय घेण्यात येईल. “पुणे ग्रामीणचा ‘पाॅझिटिव्हिटी’ दर अजूनही १२-१३ टक्क्यांच्या दरम्यान आहे. यामुळे सध्या तरी ग्रामीण भागात नियम शिथिल केले जाणार नाही,” असे त्यांनीही स्पष्ट केले.

दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीचा विषय बैठकीत आला. आळंदी देवस्थानच्या अभय टिळक यांनी वारकऱ्यांची भूमिका पवारांपुढे मांडली. टिळक यांनी तीन पर्याय सरकारपुढे ठेवले. ते म्हणाले, “कोरोना साथ ओसरली तर पाचशे जणांना परवानगी द्यावी. कोरोना कमी झाला नाही तर दोनशे वारकऱ्यांना जाऊ द्यावे. स्थिती अगदीच बिघडली तर शंभर जणांना परवानगी द्यावी.”

चौकट

अजित पवार म्हणाले...

-सलून, ब्युटीपार्लर देखील सुरू करावेत अशी मागणी होत आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू.

-संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पंढरपूर आषाढी पालखी सोहळ्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती वारकऱ्यांशी चर्चा करून तीन-चार दिवसांत अहवाल देणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.