शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ हवे सुरक्षित

By admin | Updated: February 20, 2017 03:09 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका विद्यार्थिनीची काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या आवारात अज्ञात व्यक्तीने छेड काढल्याची

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका विद्यार्थिनीची काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या आवारात अज्ञात व्यक्तीने छेड काढल्याची घटना घडली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडूनही छेड काढणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात अपयश आले. तसेच विद्यापीठात अजूनही आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत. त्यामुळे विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची आवश्यकता आहे.विद्यापीठातील विविध विभाग, शैक्षणिक संस्था आणि प्रवेशद्वारांची संख्या विचारात घेता विद्यापीठाकडे सुरक्षारक्षकांची संख्या कमी आहे. त्यातच विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाजवळच्या चौकातील एक सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे. विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यापीठाने मुलींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेच बसवले नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठातील काही विद्यार्थिनी सकाळी सहा वाजल्यापासूनच ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत काम करतात. मात्र, पहाटे अंधाराचा फायदा घेऊन ही मुलींची छेड काढली जाते. मुलींना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून व जयकर ग्रंथालयातून घेऊन जाण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्याचा लाभ विद्यापीठातील सर्व मुलींकडून घेतला जात नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील पोस्ट आॅफिसकडून मुलींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या वळणावर एका मुलीच्या छेडछाडीची घटना घडली होती.विद्यापीठातील डाप्सा संघटनेचे अध्यक्ष अमोल सरोदे म्हणाले, की सकाळी सहा वाजता कमवा शिका योजनेच्या कामाला जाणाऱ्या मुलींच्या छेडछाडीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठात काही ठिकाणी बंद असलेले दिवे बसवावेत, अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)झाडींमध्ये चालतात पार्ट्या४विद्यापीठातील सुरक्षारक्षकांची संख्या कमी झाली आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. परंतु, महाराष्ट्र गार्ड बोर्डकडून अद्याप सुरक्षारक्षक उपलब्ध करून दिलेले नाहीत. विद्यापीठाच्या खडकी गेटमार्गे कोणीही प्रवेश करून विद्यापीठाच्या झाडींमध्ये जाऊन पार्ट्या करतात. त्यावर विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांना नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे विद्यापीठाला सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यास वाव असल्याचे बोलले जात आहे.