शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण विकासासाठी एकता महत्त्वाची

By admin | Updated: March 26, 2015 00:24 IST

ईश्वर, अल्ला, येशू सारे एकच आहेत. सर्वांगीण विकासासाठी एकता सर्वांत महत्त्वाची आहे. कोणताही धर्म वाईट नाही

पुणे : ईश्वर, अल्ला, येशू सारे एकच आहेत. सर्वांगीण विकासासाठी एकता सर्वांत महत्त्वाची आहे. कोणताही धर्म वाईट नाही. एकमेकांतील चांगल्या वाईटाची पारख करा, हिंसा ज्यामुळे होते त्या द्वेषाचा नाश करा, असा मौल्यवान संदेश सर्व धर्माच्या प्रमुखांनी दिला.सर्व पंथ समादर मंच व सामाजिक समरसता मंचच्या वतीने बुधवारी सर्व धर्माच्या प्रमुखांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी समादर मंचचे जालिंदर कांबळे, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर बाणासुरे, सरचिटणीस अण्णा धुमाळ, शीख धर्माचे ग्यानी गुरविंदर सिंग, रामकृष्ण मठचे आचार्य सुनील महाराज, इस्लाम धर्माचे अनिस चिश्ती, यहुदी धर्माचे डेव्हिड, जैन धर्माचे विरागभाई गुरूजी, बौद्ध धर्माचे दत्तोबा कांबळे उपस्थित होते.(प्रतिनिधी)या जगात कोणत्याही देशात धार्मिक सत्ता स्थापन होऊ शकत नाही. केवळ निधर्मी सत्ताच स्थापन होऊ शकेल. कारण ईश्वर, अल्ला, येशू सगळे एकच आहेत. सर्व धर्मग्रंथही हेच सांगतात. एकमेकांतील भिंती लहान करा. त्या वाढवल्यात, तर विहिरीत अडकून पडल्यासारखे एकटे पडाल. एकमेकांच्या धर्माचा खरा इतिहास वाचा आणि समाजासमोर आणा.- अनिस चिश्ती या जगातील सर्व धर्म चांगलेच आहेत. कोणताही धर्म कमी दर्जाचा किंवा वाईट नाही. आणि वाईट वागायला शिकवत नाही. जो एकमेकांतील भेद विसरून सर्वांना आपलंसं करेल, तोच खरा ईश्वर जाणेल.- गुरविंदर सिंगज्याठिकाणी कोणताच धर्म नसेल अशा वैचारिक पातळीवर स्वत:ला न्या. तिथे पोहोचायचा एकता हाच केवळ मार्ग असेल. आपल्या साऱ्यांचे शरीर, रक्त सारखेच आहेत. फरक फक्त नाव, राहणीमान आणि विचारांचा आहे. त्यामुळे हा भेद केवळ वरवरचा आहे. विविध फुलांना एका माळेत माळताना जसा धागा एकच असतो त्याप्रमाणेच सर्व माणसांतही आहे. असा धर्म तयार करायचा प्रयत्न करू जो एकमेकांना तोडण्याऐवजी जोडायचे काम करेल.- सुनील महाराजया जगातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे अहिंसा आहे. एकमेकांना आणि विचारांना समजून न घेतल्याने द्वेषाला जागा मिळते. आणि या द्वेषातूनच अहिंसेचा जन्म होतो. एकमेकांबद्दलचा द्वेष सोडून स्वबळावर, स्वत:वर विश्वास ठेवून मेहनतीने समाजासाठी काय करता येईल, याचा विचार करा. कारण मेहनतीचे फळ नेहमीच चांगले मिळते.- विरागभाई गुरूजी