शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

सर्वांगीण विकासासाठी एकता महत्त्वाची

By admin | Updated: March 26, 2015 00:24 IST

ईश्वर, अल्ला, येशू सारे एकच आहेत. सर्वांगीण विकासासाठी एकता सर्वांत महत्त्वाची आहे. कोणताही धर्म वाईट नाही

पुणे : ईश्वर, अल्ला, येशू सारे एकच आहेत. सर्वांगीण विकासासाठी एकता सर्वांत महत्त्वाची आहे. कोणताही धर्म वाईट नाही. एकमेकांतील चांगल्या वाईटाची पारख करा, हिंसा ज्यामुळे होते त्या द्वेषाचा नाश करा, असा मौल्यवान संदेश सर्व धर्माच्या प्रमुखांनी दिला.सर्व पंथ समादर मंच व सामाजिक समरसता मंचच्या वतीने बुधवारी सर्व धर्माच्या प्रमुखांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी समादर मंचचे जालिंदर कांबळे, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर बाणासुरे, सरचिटणीस अण्णा धुमाळ, शीख धर्माचे ग्यानी गुरविंदर सिंग, रामकृष्ण मठचे आचार्य सुनील महाराज, इस्लाम धर्माचे अनिस चिश्ती, यहुदी धर्माचे डेव्हिड, जैन धर्माचे विरागभाई गुरूजी, बौद्ध धर्माचे दत्तोबा कांबळे उपस्थित होते.(प्रतिनिधी)या जगात कोणत्याही देशात धार्मिक सत्ता स्थापन होऊ शकत नाही. केवळ निधर्मी सत्ताच स्थापन होऊ शकेल. कारण ईश्वर, अल्ला, येशू सगळे एकच आहेत. सर्व धर्मग्रंथही हेच सांगतात. एकमेकांतील भिंती लहान करा. त्या वाढवल्यात, तर विहिरीत अडकून पडल्यासारखे एकटे पडाल. एकमेकांच्या धर्माचा खरा इतिहास वाचा आणि समाजासमोर आणा.- अनिस चिश्ती या जगातील सर्व धर्म चांगलेच आहेत. कोणताही धर्म कमी दर्जाचा किंवा वाईट नाही. आणि वाईट वागायला शिकवत नाही. जो एकमेकांतील भेद विसरून सर्वांना आपलंसं करेल, तोच खरा ईश्वर जाणेल.- गुरविंदर सिंगज्याठिकाणी कोणताच धर्म नसेल अशा वैचारिक पातळीवर स्वत:ला न्या. तिथे पोहोचायचा एकता हाच केवळ मार्ग असेल. आपल्या साऱ्यांचे शरीर, रक्त सारखेच आहेत. फरक फक्त नाव, राहणीमान आणि विचारांचा आहे. त्यामुळे हा भेद केवळ वरवरचा आहे. विविध फुलांना एका माळेत माळताना जसा धागा एकच असतो त्याप्रमाणेच सर्व माणसांतही आहे. असा धर्म तयार करायचा प्रयत्न करू जो एकमेकांना तोडण्याऐवजी जोडायचे काम करेल.- सुनील महाराजया जगातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे अहिंसा आहे. एकमेकांना आणि विचारांना समजून न घेतल्याने द्वेषाला जागा मिळते. आणि या द्वेषातूनच अहिंसेचा जन्म होतो. एकमेकांबद्दलचा द्वेष सोडून स्वबळावर, स्वत:वर विश्वास ठेवून मेहनतीने समाजासाठी काय करता येईल, याचा विचार करा. कारण मेहनतीचे फळ नेहमीच चांगले मिळते.- विरागभाई गुरूजी