शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

सर्वांगीण विकासासाठी एकता महत्त्वाची

By admin | Updated: March 26, 2015 00:24 IST

ईश्वर, अल्ला, येशू सारे एकच आहेत. सर्वांगीण विकासासाठी एकता सर्वांत महत्त्वाची आहे. कोणताही धर्म वाईट नाही

पुणे : ईश्वर, अल्ला, येशू सारे एकच आहेत. सर्वांगीण विकासासाठी एकता सर्वांत महत्त्वाची आहे. कोणताही धर्म वाईट नाही. एकमेकांतील चांगल्या वाईटाची पारख करा, हिंसा ज्यामुळे होते त्या द्वेषाचा नाश करा, असा मौल्यवान संदेश सर्व धर्माच्या प्रमुखांनी दिला.सर्व पंथ समादर मंच व सामाजिक समरसता मंचच्या वतीने बुधवारी सर्व धर्माच्या प्रमुखांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी समादर मंचचे जालिंदर कांबळे, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर बाणासुरे, सरचिटणीस अण्णा धुमाळ, शीख धर्माचे ग्यानी गुरविंदर सिंग, रामकृष्ण मठचे आचार्य सुनील महाराज, इस्लाम धर्माचे अनिस चिश्ती, यहुदी धर्माचे डेव्हिड, जैन धर्माचे विरागभाई गुरूजी, बौद्ध धर्माचे दत्तोबा कांबळे उपस्थित होते.(प्रतिनिधी)या जगात कोणत्याही देशात धार्मिक सत्ता स्थापन होऊ शकत नाही. केवळ निधर्मी सत्ताच स्थापन होऊ शकेल. कारण ईश्वर, अल्ला, येशू सगळे एकच आहेत. सर्व धर्मग्रंथही हेच सांगतात. एकमेकांतील भिंती लहान करा. त्या वाढवल्यात, तर विहिरीत अडकून पडल्यासारखे एकटे पडाल. एकमेकांच्या धर्माचा खरा इतिहास वाचा आणि समाजासमोर आणा.- अनिस चिश्ती या जगातील सर्व धर्म चांगलेच आहेत. कोणताही धर्म कमी दर्जाचा किंवा वाईट नाही. आणि वाईट वागायला शिकवत नाही. जो एकमेकांतील भेद विसरून सर्वांना आपलंसं करेल, तोच खरा ईश्वर जाणेल.- गुरविंदर सिंगज्याठिकाणी कोणताच धर्म नसेल अशा वैचारिक पातळीवर स्वत:ला न्या. तिथे पोहोचायचा एकता हाच केवळ मार्ग असेल. आपल्या साऱ्यांचे शरीर, रक्त सारखेच आहेत. फरक फक्त नाव, राहणीमान आणि विचारांचा आहे. त्यामुळे हा भेद केवळ वरवरचा आहे. विविध फुलांना एका माळेत माळताना जसा धागा एकच असतो त्याप्रमाणेच सर्व माणसांतही आहे. असा धर्म तयार करायचा प्रयत्न करू जो एकमेकांना तोडण्याऐवजी जोडायचे काम करेल.- सुनील महाराजया जगातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे अहिंसा आहे. एकमेकांना आणि विचारांना समजून न घेतल्याने द्वेषाला जागा मिळते. आणि या द्वेषातूनच अहिंसेचा जन्म होतो. एकमेकांबद्दलचा द्वेष सोडून स्वबळावर, स्वत:वर विश्वास ठेवून मेहनतीने समाजासाठी काय करता येईल, याचा विचार करा. कारण मेहनतीचे फळ नेहमीच चांगले मिळते.- विरागभाई गुरूजी