शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

‘संघ’ भावनेमधून तरुणांची अनोखी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आणि पुण्यातील सर्व रुग्णालये फुल्ल झाली. वाढत गेलेल्या रुग्णांसोबत मृत्यूचा आकडाही वाढत ...

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आणि पुण्यातील सर्व रुग्णालये फुल्ल झाली. वाढत गेलेल्या रुग्णांसोबत मृत्यूचा आकडाही वाढत गेला. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या यंत्रणेवर प्रचंड ताण आला. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठीही सहा ते आठ तासांचे वेटिंग वाढले. नागरिकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी स्व-रुपवर्धिनी, सेवा सहयोग आणि सुराज्य सर्वांगीण प्रकल्प या संस्था पुढे आल्या. या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी ससूनच्या डेड हाऊसपासून वैकुंठ स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारांपर्यंतची सर्व व्यवस्था चोख लावल्याने वेटिंगचा वेळ कमी झाला आहे.

पालिकेला या कामात मदत करून अंत्यविधी करण्याची जबाबदारी या तीन संस्थांनी उचलली आहे. मुळात ससूनच्या शवागारावर प्रचंड ताण आहे. शवविच्छेदनासोबतच कागदपत्रांची तयारी, मयत पास आदींसाठी मनुष्यबळ नसल्याने मृतदेह सोपविण्यास वेळ लागत होता. यासोबतच शववाहिकेची उपलब्धता हा मोठा प्रश्न होता.

त्यामुळे या स्वयंसेवकांनी तीन टीम तयार केल्या. एक टीम ससून रुग्णालयात तैनात केली. दुसरी टीम वैकुंठ स्मशानभूमीत प्रत्यक्ष अंत्यविधी करण्यासाठी नेमली. तर, तिसरी टीम ‘बॅक ऑफिस’ म्हणून कार्यरत ठेवली. ससूनमध्ये सहा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कार्यकर्ते कोविड मृतदेह आल्यावर डॉक्टरांना कळवितात. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावर सर्व प्रक्रिया पार पडली जाते. नातेवाईकांना झेरॉक्स दुकाने बंद असल्याने कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यातच दीड ते दोन तास वेळ जात होता. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक झेरॉक्स मशीन आणि प्रिंटर ठेवल्याने ही समस्या दूर झाली. यासोबतच मयत पास काढून देण्यासाठी दोन कार्यकर्ते स्वतंत्रपणे नेमण्यात आले. तरुण करीत असलेल्या कामाची दखल घेत पालिकेने त्यांना स्वतंत्र कक्ष आणि इंटरनेट सुविधा पुरविली आहे.

नोंदणी आदी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शववाहिकेमधून वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पाठविला जातो. तेथे पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी केले जातात. यासाठी ४ ते ५ कार्यकर्ते थांबतात. त्यांच्यावर देखरेखीसाठी दोन स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत. सर्वांना आठ तासांच्या शिफ्ट लावून देण्यात आलेल्या आहेत. यानुसार २४ तास हे काम सुरू आहे. २१ एप्रिल रोजी हे काम सुरू झाले असून आतापर्यंत १७० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

-----

या स्वयंसेवकांच्या तीन टीममधील तिसरी टीम ‘बॅक ऑफिस’ म्हणून काम करते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, अंत्यविधीसाठी आवश्यक साहित्य पुरविणे, काम करणाऱ्या स्वयंसेवकांना जेवण पुरविणे अशी कामे ही टीम करते.

-----

मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक पद्धत वापरली जाते आहे. शेण, भुस्सा यापासून तयार करण्यात आलेल्या ब्रॅकेटचा ज्वलनासाठी वापर केला जातो. त्यामुळे फारसा धूर होत नाही. हे ब्रॅकेट जुन्नरवरून आणले जातात.

----

हे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरवारे हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ दिवसांनंतर या कार्यकर्त्यांची स्वाब चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना घरी पाठविले जाणार आहे.

----

स्मशानभूमीत वाढदिवस

अविनाश धायरकर हा तरुण गेले आठवडाभर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत कोरोना संसर्गाने मृत पावलेल्या व्यक्तींना अग्नी देणे, सरण रचणे, नावनोंदणी करणे अशी कामे करीत आहे. अविनाशचा मंगळवारी वाढदिवस होता. स्व-रूपवर्धिनीचा कार्यकर्ता असलेल्या अविनाशने त्याचा वाढदिवस घरी केक कापून नव्हे तर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारांची सेवा बजावतच साजरा केला. सेवेमधून मिळणारा आनंद केक कापण्यापेक्षा अधिक मौल्यवान असल्याचे त्याने सांगितले.