शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

चितेवर झोपून नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खराडी गावातील स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. मरणानंतर अग्नी देण्यासाठी स्मशानातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खराडी गावातील स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. मरणानंतर अग्नी देण्यासाठी स्मशानातील चितादेखील खराडीवासीयांच्या नशिबी नसल्याची गंभीर स्थिती आहे. याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांनी चितेवर झोपण्याचे आंदोलन करत या प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.

नगरसेवक जाधव म्हणाले की, तुटपुंज्या बजेटसाठी खराडी चंदननगरच्या नागरिकांची मृत्यूनंतरही अव्हेलना सुरू आहे. खराडी परिसरातील मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार रस्त्यावरच करावे लागत आहेत. यामुळे नागरिक नाराज आहेत. अनेक वेळा निवेदन दिले आहे. मात्र केवळ आश्वासन मिळते. चालूच आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच भयानक होती. काही शव जळत असतानाच अचानक आलेल्या पावसाने पर्याय शोधण्याची वेळ नागरिकांवर येते.

चितेवर जिवंतपणी झोपून निषेध नोंदविण्याशिवाय दुसरा पर्याय प्रशासनाने ठेवला नाही. विरोधी पक्षाचा नगरसेवक असल्याने हीन वागणूक सहन करीत आलो आहोत, मात्र रस्त्यावर शव जाळण्याइतकी वाईट वेळ फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आली, असा आरोप जाधव यांनी केला.