शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आठवणीतून उलगडले अनोखे पुणे

By admin | Updated: April 24, 2017 05:13 IST

कसब्यापुरते मर्यादित असलेल्या पुण्याचा पुनवडी ते माहिती तंत्रज्ञानाचं एक प्रमुख केंद्र म्हणून होत असलेल्या वाटचालीचा इतिहास

पुणे : कसब्यापुरते मर्यादित असलेल्या पुण्याचा पुनवडी ते माहिती तंत्रज्ञानाचं एक प्रमुख केंद्र म्हणून होत असलेल्या वाटचालीचा इतिहास ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी उलगडून सांगताना सभागृह पुण्याच्या आठवणींमध्ये हरवून गेले होते. निमित्त होते ‘हरवलेले पुणे’ या डॉ. अविनाश सोवनी लिखित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे. रविवारी झालेल्या या सोहळ्यास भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस डॉ. श्री. मा. भावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस मंचावर उपस्थित होत्या. मनोगतात पुण्याच्या इतिहासाच्या आठवणी सांगताना बलकवडे यांनी उपस्थितांना त्या काळात नेऊन ठेवले. पुणे शहराचा एक छोटसं गाव ते महानगरापर्यंतच्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला. मनोगतात ते म्हणाले, ‘‘१८६५ मध्ये ना. वि. जोशी यांनी पुण्याच्या इतिहासावर लेखन करत ‘पुनवडी ते पुणे’ ही संकल्पना मांडली. शिवरायांच्या पुण्यातील आगमनाने पुणे हे भारताचे केंद्रबिंदू झाले. आठव्या व नवव्या शतकात प्रशासकीय शहर म्हणून असलेली पुण्याची ओळख यादवांच्या काळात धार्मिक अशी झाली. या शहरावर गाढवाचा नांगर फिरला असून हे शहर वास्तव्यास योग्य नाही अशा पसरवल्या गेलेल्या समजाला जिजाऊंनी शिवाजीमहाराजांना घेऊन पुण्यात वास्तव्य केल्याने खऱ्या अर्थाने तडा गेला.’’ डॉ. श्री. मा. भावे यांनी लहानपणापासूनच्या पुण्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. पुणे हे हिरवळीचं शहर होतं मात्र ही ओळख आता हळूहळू आपण पुसत असून आता सिमेंटचं पुणे अशी नवी ओळख आपण तयार करत आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुण्याला गॉर्डन सिटी आॅफ डेक्कन असे इंग्रजांनी संबोधले होते असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)