शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

बेरोजगार तरुण व नवउद्योजकांचा मुख्यमंत्री रोजगार योजनेकडून भ्रमनिरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:11 IST

सुषमा नेहरकर-शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू केली. कोरोनाकाळात ...

सुषमा नेहरकर-शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू केली. कोरोनाकाळात ही योजना बेरोजगार तरुण व नवउद्योजकांसाठी आधार ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र, बँकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बेरोजगार तरुण व नवउद्योजकांचा भ्रमनिरास झाला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २ हजार १३३ प्रस्ताव दिले असताना बँकांकडून केवळ १४६ प्रस्ताव मंजूर केले आहेत.

राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील बेरोजगार तरुण व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे ही ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजना हाती घेतली. या योजनेत सेवा क्षेत्राबरोबरच पहिल्यांदाच व्यवसायासाठी १० लाख रुपये कर्ज देणार असून, उत्पादनांसाठी ५० लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे. या योजनेत १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान आहे. ५ ते १० टक्के स्वगुंतवणूक आहे. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जरुपात घ्यावी लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे. समितीने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर हे प्रस्ताव बँकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतात.

पुणे जिल्ह्यात तरुण व नवउद्योजकांकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तब्बल २ हजार १३३ प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे पाठवले आहेत. या प्रस्तावांना जिल्हाधिकारी यांच्या समितीने मंजूर करून बँकांकडे कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी पाठवली आहेत. परंतु बँकांकडून अनेक प्रकरणांना केराची टोपली दाखवली आहे. आतापर्यंत केवळ १४६ प्रकरणे मंजूर केली आहेत.

--

गेल्या वर्षभरात उद्योगांकडून बँकांना दिलेले प्रस्ताव - २ हजार १३३

मंजूर झालेले प्रस्ताव - १४६

प्रलंबित प्रस्ताव - १९८७

--

बँकांची टाळाटाळ

संबंधित व्यक्तीकडून प्रस्ताव योग्य पद्धतीने दिला नाही. प्रस्तावात काही दम नाही, खोटी माहिती भरली, अशी विविध कारणे देत बँकांकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील प्रस्तावांना केराची टोपली दाखवली जाते.

--

बँकांकडे नियमित पाठपुरावा

जिल्हा समितीकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत अनेक प्रस्ताव मंजूर करून बँकांकडे कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी पाठवितात. परंतु, प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी असल्याने कर्ज मंजूर होण्याचे प्रमाण कमी आहे. या संदर्भात सर्व संबंधित बँकांशी पाठपुरावा करून जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- आनंद बेडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक