शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बेरोजगार तरुण व नवउद्योजकांचा मुख्यमंत्री रोजगार योजनेकडून भ्रमनिरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:11 IST

सुषमा नेहरकर-शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू केली. कोरोनाकाळात ...

सुषमा नेहरकर-शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू केली. कोरोनाकाळात ही योजना बेरोजगार तरुण व नवउद्योजकांसाठी आधार ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र, बँकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बेरोजगार तरुण व नवउद्योजकांचा भ्रमनिरास झाला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २ हजार १३३ प्रस्ताव दिले असताना बँकांकडून केवळ १४६ प्रस्ताव मंजूर केले आहेत.

राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील बेरोजगार तरुण व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे ही ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजना हाती घेतली. या योजनेत सेवा क्षेत्राबरोबरच पहिल्यांदाच व्यवसायासाठी १० लाख रुपये कर्ज देणार असून, उत्पादनांसाठी ५० लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे. या योजनेत १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान आहे. ५ ते १० टक्के स्वगुंतवणूक आहे. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जरुपात घ्यावी लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे. समितीने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर हे प्रस्ताव बँकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतात.

पुणे जिल्ह्यात तरुण व नवउद्योजकांकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तब्बल २ हजार १३३ प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे पाठवले आहेत. या प्रस्तावांना जिल्हाधिकारी यांच्या समितीने मंजूर करून बँकांकडे कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी पाठवली आहेत. परंतु बँकांकडून अनेक प्रकरणांना केराची टोपली दाखवली आहे. आतापर्यंत केवळ १४६ प्रकरणे मंजूर केली आहेत.

--

गेल्या वर्षभरात उद्योगांकडून बँकांना दिलेले प्रस्ताव - २ हजार १३३

मंजूर झालेले प्रस्ताव - १४६

प्रलंबित प्रस्ताव - १९८७

--

बँकांची टाळाटाळ

संबंधित व्यक्तीकडून प्रस्ताव योग्य पद्धतीने दिला नाही. प्रस्तावात काही दम नाही, खोटी माहिती भरली, अशी विविध कारणे देत बँकांकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील प्रस्तावांना केराची टोपली दाखवली जाते.

--

बँकांकडे नियमित पाठपुरावा

जिल्हा समितीकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत अनेक प्रस्ताव मंजूर करून बँकांकडे कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी पाठवितात. परंतु, प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी असल्याने कर्ज मंजूर होण्याचे प्रमाण कमी आहे. या संदर्भात सर्व संबंधित बँकांशी पाठपुरावा करून जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- आनंद बेडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक