शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

आरटीई अंतर्गत २४ शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र, पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २४ शाळांनी आरटीईंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या शाळांना येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या असून प्रवेश न दिल्यास या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत वंचित व दुर्बल गटातील बालकांना खासगी विना अनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के राखीव प्रवेश देण्याची तरतूद आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये आरटींतर्गत प्रवेश देण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह महाापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून वारंवार तोंडी सूचना देण्यात आल्या. तरीही अनेक शाळांनी आरटीईंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविली नाही. आरटीई प्रवेशापासून अनेक बालके वंचित राहिल्याची माहिती पुढे आली. या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गांभिर्याने दखल घेतली असून त्याबाबत कारवाईचा पवित्रा घेतला आहे.

शहरासह जिल्ह्यातील अनेक शाळांकडून आरटीई प्रवेशाची माहिती मागविण्यात आली होती. त्या माहितीमध्ये अनेकांनी आरटीईंतर्गत प्रवेशाच्या जागा रिकाम्या ठेवल्या तर काहींनी त्या बालकांना प्रवेश न देता त्या जागांवर इतरांना प्रवेश दिला आहे. तसेच काही शाळांनी प्रवेशच दिला नाही. त्यामुळे शाळांनी व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ तसेच राज्य सरकारच्या विविध अधिसूचनांचा भंग पुणे, पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २४ शाळांनी भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या संदर्भात या शाळांना नोटिसा बजावून कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

कोट

‘आरटी’ईंतर्गत कागदपत्रांच्या तपासणीतून अनेक घोळ समोर आले आहेत. त्यातून २४ शाळांनी प्रवेश न दिल्याचे समोर आले. या शाळांना काही दिवसांपूर्वी सुनावणीसाठी बोलावले होते. त्यांना येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहे. त्यांनी याबाबत कारवाई न केल्यास त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे. तसेच ज्या शाळांनी राखीव जागांवर इतरांना प्रवेश दिल्यास त्यांच्या प्रवेशाची रक्कम दंड म्हणून सरकारकडे जमा केली जाणार आहे.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी