शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

मतभेद विसरून निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: July 25, 2015 04:56 IST

: हवेली तालुक्यातील पूर्व भागामधील अष्टापूर येथील ग्रामपंचायत २०१५ ची निवडणूक बिनविरोध करण्यास स्थानिक नेत्यांना यश आले आहे

पिंपरी सांडस : हवेली तालुक्यातील पूर्व भागामधील अष्टापूर येथील ग्रामपंचायत २०१५ ची निवडणूक बिनविरोध करण्यास स्थानिक नेत्यांना यश आले आहे. सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी मतभेद विसरून ती निवडणूक बिनविरोध केली. विशेष म्हणजे या गावचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. गावातील सर्व पुढाऱ्यांनी एकत्र बसून आपापसांतील मतभेद विसरून गावची निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. अष्टापूर ग्रामपंचायतीसाठी एकूण चार प्रभाग असून यामध्ये छाया प्रकाश जगताप, नितीन अंकुश मेमाणे, लक्ष्मी संदीप मलाव, सुनंदा कांतिलाल कोतवाल, सुभाष चंद्रकांत जगताप, रुक्मिणी सुरेश कोतवाल, आत्माराम बबन कोतवाल, चंद्रभागा दिलीप कोतवाल, दत्तात्रय शांताराम कोतवाल, सुनीता संतोष कोतवाल, संतोष भाऊसाहेब निकाळजे यांचा बिनविरोधमध्ये समावेश आहे. अष्टापूर ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी एकूण ३० अर्ज आले होते. त्यापैकी तब्बल १९ जणांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध करणे सोपे झाले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुणे मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश जगताप, हवेली पंचायत समिती माजी सदस्य सुभाष जगताप, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, श्रीहरी कोतवाल, सुखदेव कोतवाल, सूर्या ग्रुपचे चेअरमन बाळासाहेब भोसले, माजी सरपंच रमेश कोतवाल, अण्णासाहेब कोतवाल, शामराव कोतवाल, तयाजी जगताप, अरविंद कोतवाल, ज्ञानोबा कोतवाल, पांडुरंग कोतवाल, आबा कोतवाल, कोंडिबा कोतवाल, बाजीराव कोतवाल, विकास कोतवाल, सुभाष कोतवाल, पंढरीनाथ कोतवाल, शिवाजी कोतवाल, राजेंद्र कोतवाल, कैलास कोतवाल, रामदास कोतवाल, अण्णासाहेब कोतवाल आदींनी प्रयत्न केले. सासवड : पुरंदर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत निवडणुकांमधील बेलसर, खानवडी, वाळुंज, केतकावळे व पोंढे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. याबरोबरच २६ ग्रामपंचायतींमधील ६६ जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे एकूण ५७ ग्रामपंचायतींच्या एकूण ४४१ जागांसाठी मतदान होईल. या प्रक्रियेमध्ये एकूण १,६७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर ५५९ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे एकूण १,००६ जणांचे अंतिम अर्ज राहिले असून, ४ आॅगस्ट रोजी मतदान घेण्यात येईल, अशी माहिती पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी १३ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. १३ ते २० जुलै या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. एकूण ६२ ग्रामपंचायतींसाठी ५४८ उमेदवार निवडण्यात येणार होते. यासाठी एकूण २०६ प्रभाग निश्चित करण्यात आले होते. स्त्री मतदार ५५,१८७ व पुरुष मतदार ६०,१३२ असे एकूण मतदार १,१५,३१९ इतके होते. अर्ज दाखल करण्याच्या काळात एकूण १,६७३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. तसेच अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १,६७३ पैकी ५५९ जणांनी तडजोड करून आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे एकूण १,००६ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले.एकूण ६२ ग्रामपंचायतींपैकी बेलसर, खानवडी, वाळुंज, केतकावळे, पोंढे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ५७ ग्रामपंचायतीं साठी मतदान घेण्यात येईल. त्याचप्रमाणे एकूण ६२ ग्रामपंचायतींमधील ५ बिनविरोध ग्रामपंचायती धरून ५४८ पैकी ४४१ जागांसाठी मतदान घेण्यात येईल, अशी माहिती संजय पाटील यांनी दिली.