शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
2
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
3
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
4
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
5
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
6
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
7
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
8
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
9
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
11
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
12
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
13
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
15
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
16
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
17
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
18
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
19
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
20
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम

अनिश्चितता, चिंताग्रस्तता अन‌् खिन्नतेमुळे तरुणांमध्ये नैराश्य वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाचे वाढते संकट आणि सातत्याने लागू केल्या जाणाऱ्या संचारबंदीमुळे सामान्य माणसाच्या जीवनात नकळतपणे मानसिक ताण-तणावाने प्रवेश केला ...

पुणे : कोरोनाचे वाढते संकट आणि सातत्याने लागू केल्या जाणाऱ्या संचारबंदीमुळे सामान्य माणसाच्या जीवनात नकळतपणे मानसिक ताण-तणावाने प्रवेश केला आहे. विशेषत: या कोरोनाच्या कालखंडात चिंताग्रस्तता, खिन्नता, अनिश्चितता, अपेक्षाभंगामुळे येणारे दु:ख, प्रचंड ओढा-ताण या कारणांमुळे तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. या आप्तकालीन परिस्थितीचा सामना करताना तरुणवर्ग गोंधळलेला असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. परंतु, ‘बहारे फिर भी आयेगी’....हे वाक्य सातत्याने मनाशी बाळगल्यास जगण्याला बळ मिळेल. निरोगी, आनंदी आयुष्य जगा आणि तुमचा हा अनुभव इतरांसोबत शेअर करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असल्याने सर्वांवर मानसिक ताण-तणाव वाढले आहेत. कोरोनाने जोडप्यांना एकत्र येण्याची दिलेली संधी देखील घटस्फोटामध्ये परिवर्तित होत आहे. समाजात एकप्रकारे नकारात्मक वातावरण पसरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, अशी हार मानून उपयोगी नाही. सकारात्मक विचारांची पेरणी करा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.

----------------

एक वर्ष आपण कशीतरी मनाची समजूत काढत राहिलो. आता पुढच्या आव्हानांना तोंड द्यायला स्वत:ला सज्ज केलं पाहिजे. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याच्या हिंदोळ्यावर मनाला ठेवतो तेव्हा कालांतराने मन हे बंडखोरीकडे वळते. ‘नको आहेत निर्बंध, सर्व बंधन’ झुगारून देऊयात असा बंडखोर विचार मनात यायला लागतो आणि सर्व निर्बंध जाचक वाटायला लागतात. यासाठी प्रतिसादाचा जो आपला प्रवाह आहे त्याची एक शैली किंवा पॅटर्न बनवायचा आहे. त्यात सराव आणि सहजता आणायची आहे. आपण जे करीत आहेत त्याची गुणवत्ता वाढवावी लागेल. मनाची उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. या काळात विचारप्रक्रिया चांगली ठेवणे गरजेचे आहे. एवढे करून फायदा काय? एवढे केले तर माझ्या हातात काय? पडणारे? अशा पद्धतीच्या बाहेरून येणाऱ्या विचारांना बाजूला ठेवूया आणि विचारप्रक्रियेला प्राधान्य देऊया.

- डॉ. आनंद नाडकर्णी, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ

-------------------------------------------------

तरुणाला घरात थांबायचं, बाहेर पडायचं नाही अशा कृत्रिम बंधनात जगावं लागत आहे. या अनैसर्गिक बंधनामुळे हिरमोड, अपेक्षाभंग आणि नैराश्य येते. भावनांना दाबून ठेवायचे हाच मोठा ताण आहे. प्रत्येक जण मोकळेपणामुळे आनंदी आहेत असे नाही. सामान्य वर्तनाचे जे संकेत दिले आहेत. त्यांनाच आव्हान मिळत आहे. त्यामुळे मनुष्य गडबडून गेला आहे. विचारांची कोणतीच शाखा उपलब्ध नाही. त्याचा कोणताच अनुभव नाही. कशाच्या बळावर आपण नवीन वर्तन उभे करायचे हे अवगत नाही. कारण, नवीन वर्तन उभे करतानाही त्याचा एक इतिहास असतो. एक अनिश्चिततेची लढाई सुरू आहे. जिंकणार कोण? हे माहिती नाही, तरी लढाई मात्र खेळायची आहे आणि त्यातून बाहेर पडायचे आहे. केवळ बैद्धिक आणि मानसिक पातळीवर ही लढाई लढायची आहे, ज्याला शारीरिक साथ नाही. मनाला धाडस करून नवीन करण्याचा वाव नाही. जे करायचंय त्यावर बंधने आहेत. त्यामुळे नैराश्य अधिक येत आहे.

-डॉ. उल्हास लुकतुके

--------------------------------------

आसपासचे नकारात्मक वातावरण पाहिल्यानंतर एकप्रकारचे नैराश्य येत आहे. आत्ता कुठं सर्व सुरळीत चालले होते. नवीन नोकरी लागली, घराचे पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. पण, कोरोनामुळे अनिश्चिततेची टांगती तलवार सातत्याने डोक्यावर असते. एकीकडे कुटुंबाला जपायचे, दुसरीकडे नोकरी जपायची अशी दुहेरी कसरत करावी लागत आहे. मग मानसिक ताण-तणाव येणारचं ना? तरीही सकारात्मक राहून कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.

- प्रशांत देशपांडे, इंजिनियर

----------

काय करायला हवं?

* मनाची तब्येत उत्तम राखायची.

* आपण खचलो किंवा मनाचे खांब कोसळले असे बोलायचे नाही.

* मी हे करू शकतो, हे वाक्य मनाशी हजारवेळा काढायचे.

* संकटच संकट आहेत असे सातत्याने बोलत राहू नका. मी उत्तम आहे यात आनंद मानायचा.

---------------------------------------------------------------------------