शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

हेल्पलाइन क्रमांकांपासून सामान्य अनभिज्ञ

By admin | Updated: October 28, 2015 23:52 IST

सामान्य नागरिकांसाठी शासनाने विविध विभागांचे टोल फ्री (हेल्पलाइन) क्रमांक सुरू केले आहेत. बहुतांशी क्रमांक सुरूदेखील आहेत.

शिरूर : सामान्य नागरिकांसाठी शासनाने विविध विभागांचे टोल फ्री (हेल्पलाइन) क्रमांक सुरू केले आहेत. बहुतांशी क्रमांक सुरूदेखील आहेत. मात्र, ज्यांच्यासाठी हे क्रमांक सुरू केलेत, ते या क्रमांकांपासून अनभिज्ञ असल्याने त्याचा त्यांना फायदा होत नसल्याचे चित्र आहे. वास्तविक या हेल्पलाइनमुळे सामान्यांना नक्कीच आधार मिळू शकेल, असे ‘लोकमत’ने या क्रमांकाशी संपर्क साधल्यावर लक्षात आले. सामान्य नागरिकांना विविध प्रकारची मदतही तत्काळ अथवा वेळेत उपलब्ध व्हावी, या हेतूने शासनाने पोलीस विभागापासून ते आधार कार्ड विभागापर्यंत अशी २५ विभागांची हेल्पलाइन सुरू केली आहे. अलीकडे १०२/१०८ ही हेल्पलाइन रुग्णवाहिकेसाठी सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनचा शहरी भागात चांगला उपयोगही सुरू झाला आहे. मात्र, या क्रमांकाबाबत ग्रामीण भागात जास्त माहिती नसल्याचे दिसून आले. जिथे पर्याय उपलब्ध नाही, अशा ग्रामीण भागात याची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. एका शासकीय कर्मचाऱ्यास रुग्णवाहिकेचा टोल फ्री क्रमांक किती? असे विचारले असता त्यांनी माहीत नाही, असे उत्तर दिले. शासकीय कर्मचाऱ्यांची ही अवस्था आहे, तर इतरांची काय? असा प्रश्न आहे. अनेकदा एखाद्या गावाला जाण्यासाठी एसटी बस कोणत्या वेळेत, किती वेळा याची, तसेच इतरही एसटीविषयक माहिती आपल्याला हवी असते. यासाठी शासनाने १८००२२१२५० हा हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. या क्रमांकावर ही माहिती उपलब्ध होते. मात्र, याबाबतही बहुतांशी नागरिक अनभिज्ञ आहेत. देशात, राज्यात घडणाऱ्या बलात्कार, छेडछाड या प्रकरणांमुळे महिला सुरक्षेसाठी शासनाने ‘महिला तक्रार’ म्हणून ‘१०९१’ हा क्रमांक (हेल्पलाइन) सुरू केला आहे. महिलांनी कोठूनही यावर संपर्क साधल्यास त्यांना पोलिसांची मदत मिळू शकते. कौटुुंबिक हिंसाचार, छळ प्रकरणांत महिलांना पोलीस ठाण्यात जाण्याआधी या हेल्पलाइनचा आधार मिळू शकतो. मात्र, बहुतांशी महिलांना या हेल्पलाइनची माहिती नसल्याचे वास्तव आहे.बालगुन्हेगारी, बालकांवरील लैंगिक अत्याचार आदींसाठी १०९८ क्रमांकाची ‘चाइल्डलाइन’ ही हेल्पलाइन आहे. गर्भलिंगनिदान करून अवैध गर्भपात करण्याचा प्रकार (स्त्रीभ्रूणहत्या) कुठे आढळल्यास याबाबत काही मदत हवी असल्यास अथवा तक्रार करायची असल्यास १८००२३३४४७५ या हेल्पलाइनचा उपयोग होतो. या क्रमांकांची सामान्य नागरिकांनाच माहिती नसल्याने शासनाचा मूळ हेतू असफल झाल्यासारखा वाटतो. सामान्य नागरिकांना याची माहिती झाल्यास त्या हेल्पलाइनचा फायदा करून घेऊ शकतील.(वार्ताहर)