शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांमुळे सर्वसामान्यच होताहेत उद्ध्वस्त

By admin | Updated: November 5, 2014 23:46 IST

कष्टाने पै-पै पुंजी जमवून घराचे स्वप्न साकारण्यासाठी सामान्य नागरिक आयुष्यभर धडपडत असतात. तोकड्या पगारातून शहरात घर घेणे परवडणारे नसल्याने हद्दीलगतच्या कमी किमतीच्या सदनिकेच्या आहारी तो पडतो

हणमंत पाटील, पुणेकष्टाने पै-पै पुंजी जमवून घराचे स्वप्न साकारण्यासाठी सामान्य नागरिक आयुष्यभर धडपडत असतात. तोकड्या पगारातून शहरात घर घेणे परवडणारे नसल्याने हद्दीलगतच्या कमी किमतीच्या सदनिकेच्या आहारी तो पडतो. मात्र, निकृष्ट दर्जामुळे एका क्षणात पत्त्याप्रमाणे कोसळणाऱ्या अनधिकृत इमारतीमुळे याच सामान्य नागरिकांचा संसार उद्ध्वस्त होतो. शासनाच्या कायद्यातून बिल्डर सहीसलामत सुटला तरी दोन्ही बाजूंनी सामान्य नागरिकच भरडला जातोय.नऱ्हे-आंबेगाव येथील सहा मजली इमारत कोसळण्याची घटना ताजी आहे. त्यामध्ये एका तरुणांचा नाहक बळी गेला, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. दोन वर्षांपूर्वी तळजाई येथील इमारतीतही अशाच १२ निष्पाप मजुरांचा बळी गेला होता. त्यानंतर महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर महिनाभर अनधिकृत इमारतींना नोटीस देणे आणि काही प्रातिनिधिक इमारतींवर कारवाई करण्यात आली. आताही प्रशासनाने आठवडाभरात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन, असे दिसते. या पार्श्वभूमीवर, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आलेले वास्तव असे : महापालिकेच्या हद्दीबाहेर जिल्हाधिकारी कार्यालय व नगरनियोजन विभाग बांधकामांना परवानगी देतात. त्यानंतर संबंधित बांधकामांची ग्रामपंचायतीकडे नोंदणी व करआकारणी अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायतींनी परस्पर परवानगी देण्याचा सपाटा लावला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी ग्रामपंचायतीला परवानगी देण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना आळा बसण्याची शक्यता होती; परंतु महापालिकेच्या हद्दीत आणखी ३४ गावांचा समावेश करण्याची अधिसूचना तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ६ महिन्यांपूर्वी काढली. त्यानंतर पालिकेत समावेश होणार असल्याने नगररचना व ग्रामपंचायतीकडे कोणतीही नोंदणी न करता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचा जोर वाढला. एकट्या नऱ्हे गावात २,८३८ अनधिकृत बांधकामांच्या बोगस नोंदी आढळून आल्या आहेत. मात्र, महापालिकेत हे गाव जाणार असल्याने जिल्हा प्रशासनानेही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. याचे परिणाम मात्र सामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत, असे जाणकारांचे मत आहे.