शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अस्तरीकरणाला गती

By admin | Updated: February 29, 2016 01:03 IST

भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणातंर्गत येणाऱ्या उजव्या कालव्याला सतत गळती होत असल्याने सध्या पाटबंधारे विभागाकडून कालव्याच्या यांत्रिक पद्धतीने सिमेंट काँकिटच्या अस्तरीकरणाचे काम वेगात सुरू आहे.

भोर : भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणातंर्गत येणाऱ्या उजव्या कालव्याला सतत गळती होत असल्याने सध्या पाटबंधारे विभागाकडून कालव्याच्या यांत्रिक पद्धतीने सिमेंट काँकिटच्या अस्तरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, १० वर्षे होऊनही कालवा आणि त्यावरच्या उपसा जलसिंचन योजना अपूर्णच आहे. शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा असून प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार. तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या नीरा देवघर धरणाचा पाणीसाठा ११.९१ टीएमसी असून, धरणातून भोर ते माळशिरस असा १९८ किलोमीटरचा उजवा कालवा आहे. कालव्याचे १ ते ६५ किलोमीटरपर्यंत एक ते दोन ठिकाणचे खोदकाम वगळता पूर्ण झाले आहे. पुढील १३३ किलोमीटरचे काम अद्याप बाकी आहे. शनिवारी (दि. २७) वेनवडी (भोर), शेकमिरवाडी, वाघोशी (फलटण), गावडेवाडी (खंडाळा) अशा चार उपसा जलसिंचन योजना आहेत.या कामाची मुदत दोन वर्षांची असल्याने सध्या वेगात काम सुरू आहे. दरम्यान, ११ ते २० किलोमीटरच्या अस्तरीकरणाच्या कामाचे १५ कोटीचे अंदाजपत्रक मंजूर आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने ही कामे पूर्ण होतील, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.धरणाच्या कालव्याचे काम सुरू होऊन १० वर्षे झाली. मात्र, निधीचे कारण देत अद्याप १ ते ६५ किलोमीटरपर्यंतचेच खोदकाम पूर्ण असून, पुढील काम सुरूच झालेले नाही, तर त्यावर चार उपसा जलसिंचन योजनांपैकी एका योजनेचे काम अपूर्ण तर तीनचे काम सुरूच नाही. त्यामुळे कालव्याचे व उपसा जलसिंचन योजनांचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार, हे न सुटणारे कोडेच आहे. (वार्ताहर)४भोर तालुक्यातील ६६७० हेक्टर, फलटण तालुक्यातील १२,५५० हेक्टर, माळशिरस तालुक्यातील १०,९७० हेक्टर, खंडाळा १२,८६० हेक्टर असे ४३,०५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मात्र, भोर तालुक्यातील वेनवडी उपसा जलसिंचन योजनेचे काम थोड्याफार प्रमाणात पूर्ण झाले आहे. इतर तीनही उपसा जलसिंचन योजनांचे सर्वेक्षणच सुरू आहे. धरणाच्या उजव्या कालव्याचा सध्या १ ते १० किलोमीटरचे सुमारे १२ कोटी ९८ लाख रु काम मंजूर असून, यांत्रिक पद्धतीने सिमेंट काँक्रिटचे अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. पहिल्या किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, तीन - चार किलोमीटरची साफसफाई होऊन काम सुरू झाले आहे.