लोणी देवकर : उजनी धरणातील एकूण 63.5क् टक्के रिझव्र्ह पाणीसाठा राखीव ठेवावा, तसेच भीमा-सिना नदी सिना-माढा बोगदय़ाद्वारे सोडण्यात येणारे पाणी त्वरित बंद करावे, सोडलेल्या पाण्याची चौकशी करावी आदी मागण्या मंगळवारी पाटबंधारे विभाग उपअभियंता कार्यालय पळसदेव येथे शेतकरी संघटनेने केल्या. या वेळी शेतकरी संघटनेने उपोषण केले.
या वेळी उजनी धरण उपकार्यकारी अभियंता ए. एम. मशिदास यांनी शासनाच्या वतीने शेतकरी संघटनेच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले. एकूण 117 टीएमसी क्षमता असलेल्या उजनी धरणातील 63.5क् टक्के राखीव पाणीसाठा आहे. मात्र, दर वर्षी ही मर्यादा तोडून पाणी सोडले जाते. उजनी धरणच सोलापूर जिल्ह्यात असल्याने पिण्यासाठी पाणी सोडा, या नावाखाली मोठय़ा प्रमाणात धरणातून पाणी सोडण्यात येते. परिणामी, याचा मोठा फटका उजनी धरण परिसरातील नागरिकांना, शेतक:यांना सहन करावा लागतो. यामधील धक्कादायक बाब म्हणजे वाळूमाफियांना पोसण्यासाठी अशा प्रकारे अवैध्यरीत्या धरणातून पाणी सोडले जाते. वाळूमाफिया वाळू काढण्यासाठी नदीपात्रत मोठमोठे खड्डे खोदतात. त्यातून वाळू काढून नेतात. या खड्डय़ांतील वाळू संपली, की अधिका:यांशी संगनमताने धरणातून पाणी सोडले जाते. मग या पाण्यामुळे बारीक वाळू या खड्डय़ांत पाण्याच्या प्रवाहाने जमा होते. पाण्याचा प्रवाह बंद केला, की महिना-दोन महिने परत जोराने वाळूउपसा सुरू होतो. त्यामुळे वाळूमाफियांना पोसण्यासाठी अधिकारी परस्पर पाणी सोडण्याचा प्रताप करीत असल्याचा आरोप या वेळी शेतकरी संघटनेचे अनिल खोत यांनी केला.
पुणो शहर परिसरातील धरणाच्या पाण्याने उजनी धरणात मुबलक पाणीसाठा होतो. उजनी धरण व्यवस्थापकाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका उजनी धरण परिसरातील नागरिकांना मोठय़ा प्रमाणात बसत आहे. उजनीतील पाण्याचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांमध्ये सिंचनासाठी 9.6क् टीएमसी, कालवा सिंचन 32.15 टीएमसी, कन्हेर ते शिवापूर सिंचन 3.15 टीएमसी, सिना-माढा उपसा सिंचन 4.75 टीएमसी, शिरपूर उपसा सिंचन योजना 1.73 टीएमसी, आष्टी उपसा सिंचन योजना 1 टीएमसी, एकरूख उपसा सिंचन योजना 3.18 टीएमसी, बार्शी उपसा सिंचन योजना 2.59 टीएमसी, सांगोला उपसा सिंचन योजना 2 टीएमसी, दहिगाव उपसा सिंचन योजना 1.81 टीएमसी व बाष्पीभवन 16.क्क् टीएमसी अशा प्रकारे पाणी या योजनांसाठी पाणी देण्याचे नियोजन कागदोपत्री करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती अधिकारातून मिळालेली आहे. मात्र, प्रत्यक्षात यापेक्षा किती तरी पटींनी अधिक पाणी कधी राजकीय दबावापोटी, तर कधी अधिकारी मनमानीपणाने सोडतात. शिवाय, उजनी धरणावर यापेक्षाही मोठय़ा क्षमतेच्या पाणी योजना प्रस्तावित आहेत. (वार्ताहर)
4वास्तविक पाहता, कालवा व नदीत पावसाळ्यात अधिक झालेले पाणी सोडण्यात यावे, असा नियम आहे. अधिकारी नदी अथवा बोगद्यामध्ये उन्हाळ्यात नियमबाह्य पाणी सोडत आहे. शिवाय, सिना-माढा बोगदा त्याच्या निश्चित आराखडय़ापेक्षा अधिक खोलीचा करण्यात आला असल्याचा आरोप या वेळी अर¨वद जगताप यांनी केला. याबाबत अधिकारी व शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल आहे. त्यामुळे यामधून क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडले जात आहे.
4याबाबत कार्यकारी उपअभियंता उजनी व्यवस्थापन विभाग भीमानगर ए. एम. मशिदास यांनी सांगितले, ‘‘आम्ही शेतकरी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले आहे. त्वरित अहवाल तयार करून वरिष्ठ अधिका:यांना सादर केला जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल.’’ याबाबत अधीक्षक अभियंता दाभाडे म्हणाले, की पाणीवाटपाबाबत आपल्याला मिळालेली माहिती चुकीची आहे.
4मागण्यांवर त्वरित अंमलबजावणी न झाल्यास गुरुवारी (दि. 11 डिसेंबर) कार्यकारी अभियंता भीमानगर यांचे कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा खोत यांनी दिला आहे. या वेळी लक्ष्मण गुणवरे, दादा ¨शदे, राजाराम बनसुडे, अर¨वद जगताप, दीपक बांडे, विजयकुमार काळे, सचिन बनसुडे आदी उपस्थित होते.