शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या राखीव पाणीसाठय़ासाठी उपोषण

By admin | Updated: November 12, 2014 23:19 IST

उजनी धरणातील एकूण 63.5क् टक्के रिझव्र्ह पाणीसाठा राखीव ठेवावा, तसेच भीमा-सिना नदी सिना-माढा बोगदय़ाद्वारे सोडण्यात येणारे पाणी त्वरित बंद करावे,

लोणी देवकर : उजनी धरणातील एकूण 63.5क् टक्के रिझव्र्ह पाणीसाठा राखीव ठेवावा, तसेच भीमा-सिना नदी सिना-माढा बोगदय़ाद्वारे सोडण्यात येणारे पाणी त्वरित बंद करावे, सोडलेल्या पाण्याची चौकशी करावी आदी मागण्या  मंगळवारी पाटबंधारे विभाग उपअभियंता कार्यालय पळसदेव येथे शेतकरी संघटनेने केल्या. या वेळी शेतकरी संघटनेने उपोषण केले. 
या वेळी उजनी धरण उपकार्यकारी अभियंता ए. एम. मशिदास यांनी शासनाच्या वतीने शेतकरी संघटनेच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले. एकूण 117 टीएमसी क्षमता असलेल्या उजनी धरणातील 63.5क् टक्के राखीव पाणीसाठा आहे. मात्र, दर वर्षी ही मर्यादा तोडून पाणी सोडले जाते. उजनी धरणच सोलापूर जिल्ह्यात असल्याने पिण्यासाठी पाणी सोडा, या नावाखाली मोठय़ा प्रमाणात धरणातून पाणी सोडण्यात येते. परिणामी, याचा मोठा फटका उजनी धरण परिसरातील नागरिकांना, शेतक:यांना सहन करावा लागतो. यामधील धक्कादायक बाब म्हणजे वाळूमाफियांना पोसण्यासाठी अशा प्रकारे अवैध्यरीत्या धरणातून पाणी सोडले जाते. वाळूमाफिया वाळू काढण्यासाठी नदीपात्रत मोठमोठे खड्डे खोदतात. त्यातून वाळू काढून नेतात. या खड्डय़ांतील वाळू संपली, की अधिका:यांशी संगनमताने धरणातून पाणी सोडले जाते. मग या पाण्यामुळे बारीक वाळू या खड्डय़ांत पाण्याच्या प्रवाहाने जमा होते. पाण्याचा प्रवाह बंद केला, की महिना-दोन महिने परत जोराने वाळूउपसा सुरू होतो. त्यामुळे वाळूमाफियांना पोसण्यासाठी अधिकारी परस्पर पाणी सोडण्याचा प्रताप करीत असल्याचा आरोप या वेळी शेतकरी संघटनेचे अनिल खोत यांनी केला. 
पुणो शहर परिसरातील धरणाच्या पाण्याने उजनी धरणात मुबलक पाणीसाठा होतो. उजनी धरण व्यवस्थापकाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका उजनी धरण परिसरातील नागरिकांना मोठय़ा प्रमाणात बसत आहे. उजनीतील पाण्याचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांमध्ये सिंचनासाठी 9.6क् टीएमसी, कालवा सिंचन 32.15 टीएमसी, कन्हेर ते शिवापूर सिंचन 3.15 टीएमसी, सिना-माढा उपसा सिंचन 4.75 टीएमसी, शिरपूर उपसा सिंचन योजना 1.73 टीएमसी, आष्टी उपसा सिंचन योजना 1 टीएमसी, एकरूख उपसा सिंचन योजना 3.18 टीएमसी, बार्शी उपसा सिंचन योजना 2.59 टीएमसी, सांगोला उपसा सिंचन योजना 2 टीएमसी, दहिगाव उपसा सिंचन योजना 1.81 टीएमसी व बाष्पीभवन 16.क्क् टीएमसी अशा प्रकारे पाणी या योजनांसाठी पाणी देण्याचे नियोजन कागदोपत्री करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती अधिकारातून मिळालेली आहे. मात्र, प्रत्यक्षात यापेक्षा किती तरी पटींनी अधिक पाणी कधी राजकीय दबावापोटी, तर कधी अधिकारी मनमानीपणाने सोडतात. शिवाय, उजनी धरणावर यापेक्षाही मोठय़ा क्षमतेच्या पाणी योजना प्रस्तावित आहेत.  (वार्ताहर)
 
4वास्तविक पाहता, कालवा व नदीत पावसाळ्यात  अधिक झालेले पाणी सोडण्यात यावे, असा नियम आहे. अधिकारी नदी अथवा बोगद्यामध्ये उन्हाळ्यात नियमबाह्य पाणी सोडत आहे. शिवाय, सिना-माढा बोगदा त्याच्या निश्चित आराखडय़ापेक्षा अधिक खोलीचा करण्यात आला असल्याचा आरोप या वेळी अर¨वद जगताप यांनी केला. याबाबत अधिकारी व शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल आहे. त्यामुळे यामधून क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडले जात आहे.
 
4याबाबत कार्यकारी उपअभियंता उजनी व्यवस्थापन विभाग भीमानगर ए. एम. मशिदास यांनी सांगितले, ‘‘आम्ही शेतकरी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले आहे. त्वरित अहवाल तयार करून वरिष्ठ अधिका:यांना सादर केला जाईल.  त्यानंतर निर्णय घेतला जाईल.’’ याबाबत अधीक्षक अभियंता दाभाडे म्हणाले,  की पाणीवाटपाबाबत आपल्याला मिळालेली माहिती चुकीची आहे. 
4मागण्यांवर त्वरित अंमलबजावणी न झाल्यास गुरुवारी (दि. 11 डिसेंबर) कार्यकारी अभियंता भीमानगर यांचे कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा खोत यांनी दिला आहे. या वेळी लक्ष्मण गुणवरे, दादा ¨शदे, राजाराम बनसुडे, अर¨वद जगताप, दीपक बांडे, विजयकुमार काळे, सचिन बनसुडे आदी उपस्थित होते.