शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

राज्य सरकारचा यू टर्न इंदापूरकरांसाठी दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळस : इंदापूर तालुक्यातील बारमाही पाण्याच्या प्रश्नाबाबत गेली ३० वर्षे शेतकरी मागणी करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कळस : इंदापूर तालुक्यातील बारमाही पाण्याच्या प्रश्नाबाबत गेली ३० वर्षे शेतकरी मागणी करीत आहे. उजनी धरणामध्ये सर्वात जास्त जमिनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या आहेत ५ टीएमसी पाणी रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय दुर्दैवी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा व तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा महिला आघाडीच्या निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

पाटील यांनी सांगीतले, की पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत असताना राज्य सरकारच्या यू टर्नमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी अजून प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. राज्य शासनाचा हा निर्णय आम्हा इंदापूरकरांसाठी अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. त्याचा सरकारने पुनर्विचार करावा. दुष्काळी गावांची पाहणी व सर्वेक्षण करावे. या गावांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सणसर कटव्दारे ३.९ टीएमसी पाणी दरवर्षी मिळेल असा निर्णय शासनाने केला होता. परंतु, पाणीच मिळत नाही. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाण्याचा एक थेंबही येथील शेतकरी मागत नाही. आमचे हक्काचे पाणी पुणे महानगरपालिका व परिसर पिण्यासाठी वापरत असल्याने त्यामधून तयार होणारे सांडपाणी उजनी जलाशयात १७ ते १८ टीएमसी जमा होत असल्याने त्यापैकी ५ टीएमसी पाणी आम्हास मिळावे ही आमच्या शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे, असे पाटील म्हणाल्या.