शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

राज्य सरकारचा यू टर्न इंदापूरकरांसाठी दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळस : इंदापूर तालुक्यातील बारमाही पाण्याच्या प्रश्नाबाबत गेली ३० वर्षे शेतकरी मागणी करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कळस : इंदापूर तालुक्यातील बारमाही पाण्याच्या प्रश्नाबाबत गेली ३० वर्षे शेतकरी मागणी करीत आहे. उजनी धरणामध्ये सर्वात जास्त जमिनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या आहेत ५ टीएमसी पाणी रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय दुर्दैवी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा व तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा महिला आघाडीच्या निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

पाटील यांनी सांगीतले, की पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत असताना राज्य सरकारच्या यू टर्नमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी अजून प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. राज्य शासनाचा हा निर्णय आम्हा इंदापूरकरांसाठी अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. त्याचा सरकारने पुनर्विचार करावा. दुष्काळी गावांची पाहणी व सर्वेक्षण करावे. या गावांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सणसर कटव्दारे ३.९ टीएमसी पाणी दरवर्षी मिळेल असा निर्णय शासनाने केला होता. परंतु, पाणीच मिळत नाही. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाण्याचा एक थेंबही येथील शेतकरी मागत नाही. आमचे हक्काचे पाणी पुणे महानगरपालिका व परिसर पिण्यासाठी वापरत असल्याने त्यामधून तयार होणारे सांडपाणी उजनी जलाशयात १७ ते १८ टीएमसी जमा होत असल्याने त्यापैकी ५ टीएमसी पाणी आम्हास मिळावे ही आमच्या शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे, असे पाटील म्हणाल्या.