शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

राज्य सरकारचा यू टर्न इंदापूरकरांसाठी दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळस : इंदापूर तालुक्यातील बारमाही पाण्याच्या प्रश्नाबाबत गेली ३० वर्षे शेतकरी मागणी करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कळस : इंदापूर तालुक्यातील बारमाही पाण्याच्या प्रश्नाबाबत गेली ३० वर्षे शेतकरी मागणी करीत आहे. उजनी धरणामध्ये सर्वात जास्त जमिनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या आहेत ५ टीएमसी पाणी रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय दुर्दैवी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा व तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा महिला आघाडीच्या निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

पाटील यांनी सांगीतले, की पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत असताना राज्य सरकारच्या यू टर्नमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी अजून प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. राज्य शासनाचा हा निर्णय आम्हा इंदापूरकरांसाठी अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. त्याचा सरकारने पुनर्विचार करावा. दुष्काळी गावांची पाहणी व सर्वेक्षण करावे. या गावांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सणसर कटव्दारे ३.९ टीएमसी पाणी दरवर्षी मिळेल असा निर्णय शासनाने केला होता. परंतु, पाणीच मिळत नाही. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाण्याचा एक थेंबही येथील शेतकरी मागत नाही. आमचे हक्काचे पाणी पुणे महानगरपालिका व परिसर पिण्यासाठी वापरत असल्याने त्यामधून तयार होणारे सांडपाणी उजनी जलाशयात १७ ते १८ टीएमसी जमा होत असल्याने त्यापैकी ५ टीएमसी पाणी आम्हास मिळावे ही आमच्या शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे, असे पाटील म्हणाल्या.