शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

दोन हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी अद्याप दिवास्वप्नच

By admin | Updated: May 13, 2015 02:41 IST

राज्यातील साखर हंगाम संपला तरीही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची किंमत मिळाली नाही. केंद्र आणि राज्य सरकार गेल्या ६ महिन्यांपासून

सोमेश्वरनगर : राज्यातील साखर हंगाम संपला तरीही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची किंमत मिळाली नाही. केंद्र आणि राज्य सरकार गेल्या ६ महिन्यांपासून एफआरपीबाबत फक्त चर्चाच करत असल्याचे दिसत आहे. मात्र, यावर अजून ठोस उपाययोजना होत नाहीत. गेल्या आठवड्यात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले असल्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा ऊस उत्पादकांसाठी दिवास्वप्न ठरल्याची चर्चा ऊस उत्पादकांमध्ये आहे. शासनाने २ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली़ पण, त्याबाबतची कोणतीही सूचना अथवा कोणतीही माहिती जिल्हा बँका अथवा साखर कारखान्यांपर्यंत अद्याप पोहचलेली नाही़ या वर्षभरात तब्बल ९०० रुपयांनी साखरेचे दर उतरले. त्यामुळे कारखान्यांची एफआरपी व राज्य बँक देत असलेली पोत्यावरील उचलीत तब्बल एक हजार रुपयांचा फरक भरून काढणे, साखर कारखान्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी केंद्र सरकारने साखर उद्योगाला मदत करावी, अशी साखर कारखानदारांचीअपेक्षा होती. मात्र, ही मदत कर्ज स्वरूपात नसावी. तर ती अनुदान स्वरूपात असावी, अशी अपेक्षा कारखानदारांनी व्यक्त केली होती. मात्र, कारखाने सुरू झाल्यापासून साखरेच्या वारंवार पडणाऱ्या दरामुळे राज्य बँकेने ४ वेळा साखरेच्या मुल्यांकनात घट केली. त्यामुळे एफआरपी मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा धुसर झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जानेवारीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. या वेळी साखर निर्यातीसाठी टनाला ५ हजार रुपये अनुदान, २० लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी आणि ऊस उत्पादाकांना उचित भाव देण्यासाठी दि.२१ जानेवारी रोजी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. माजी कृषिमंत्री शरद पवार, राज्य संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावर ऊस प्रश्नांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन मोदींनी दिले. आता, या आश्वासनांची पूर्तता होणार कधी, याकडे साखर कारखान्यांसह ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)