शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केडगावला दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: October 24, 2016 01:19 IST

परिसराला रविवार घातवार ठरला. २ वेगवेगळ्या घटनांमध्ये २ चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पहिली घटना वाखारी येथे घडली

केडगाव : परिसराला रविवार घातवार ठरला. २ वेगवेगळ्या घटनांमध्ये २ चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पहिली घटना वाखारी येथे घडली. यात वैभव नामदेव शेळके (वय १३, रा. वाखारी) येथील सिदुराम कोरडे यांच्या विहिरीत पोहायला गेला होता. त्याच्यासोबत २ मुले पोहायला होती. पोहताना त्याला दम लागल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कळताच ग्रामस्थ जमा झाले. बराच प्रयत्न करूनही वैभवचा मृतदेह बाहेर काढताना अडचणी येत होत्या. कुरकुंभ एमआयडीसीमधील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनाही मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले. त्यानंतर आमदार राहुल कुल यांनी एनडीआरएफ येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला संपर्क करून पथक बोलावले. सायंकाळी ६ च्या सुमारास पाणबुडीच्या साह्याने वैभवचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. वैभव हा आंबेगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकत होता. या वेळी मंडलाधिकारी विजय खारतोडे, पोलीस जितेंद्र पानसरे, शिवाजी मारकड, मनोज शेळके, मधुकर शेळके, सचिन शेळके, पोपट गोरगल, सुनील गोरगल, ईश्वर शेळके उपस्थित होते. दुसरी घटना बोरीपार्धी येथे सकाळी ११ च्या सुमारास घडली. यामध्ये गीता उत्तम कोळी (वय १४, रा. बोरीपार्धी, ता. दौंड) ही बोरीपार्धी स्मशानभूमीशेजारी कालव्यामध्ये अंघोळीसाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास ग्रामस्थांनी गीताचा मृतदेह बाहेर काढला. गीताची आई मजुरी करते. वडील नसल्याने कुटुंबातील ती जबाबदार व्यक्ती होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)