शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

बिबट्याच्या हल्ल्यात दोन गार्इंचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 02:35 IST

भोर येथून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर गेल्या चार दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायींचा मृत्यू झाला आहे.

भोर - येथून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर गेल्या चार दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायींचा मृत्यू झाला आहे. तसेच एका शेतकऱ्याचे खोंडही बेपत्ता आहे. यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. रात्री अपरात्री ग्रामस्थांना बिबट्याचे दिसत असल्याने त्यांनी भीतीपोटी बाहेर पडणेही बंद केले आहे.या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.रायरेश्वर किल्ल्यावरील कृष्णा बाळू जंगम यांच्या गायी सोमवारी सकाळी तर नामदेव राजाराम जंगम यांची गायी गुरुवारी अशा दोन शेतकºयांच्या गायी रानात चरायला सोडल्या होत्या.यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले. जर्शी जातीच्या सुमारे २५ हजार रु. किमतीच्या दुभत्या गायी मेल्याने या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकºयांचा दूध व्यवसाय हा प्रमुख जोडधंदा आहे. यामुळे त्यांना चार पैसे मिळतात. जनावरे मेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. तर हरिश्चंद्र धोंडिबा जंगम यांचा खोंड बिबट्याने पळवला आहे. तो अद्याप सापडला नाही. त्यामुळे वनविभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी केली आहे.बिबट्याचा वावर या परिसरात असल्याने नागरिक बाहेर पडण्यास घाबरत आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी गोपाळ जंगम, कृष्णा जंगम, नारायण जंगम या शेतकºयांनी केली आहे.वीज नसल्याने गैरसोयरायरेश्वर किल्ल्यावर जाणारी लोकंडी शिडी ते मंदिरापर्यंत रात्रीच्या वेळी वीज नसल्याने येणारे पर्यटक आणि किल्ल्यावरील लोकांना रात्री अपरात्री अंधारात बाहेर पडता येत नाही. त्यामुळे या परिसरात विजेची सोय करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य किशोर जंगम यांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याnewsबातम्या