शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दोनशे मतदान केंद्रे संवेदनशील

By admin | Updated: October 9, 2014 05:36 IST

पोलीस, प्रशासन व उमेदवारांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील २०० मतदानकेंदे्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

पुणे : पोलीस, प्रशासन व उमेदवारांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील २०० मतदानकेंदे्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील उमेदवारांनी सुचविलेल्या ९६ मतदानकेंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. सूक्ष्म निरीक्षक व व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून या मतदान केंद्रावर नजर ठेवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांनी सुचविलेल्या मतदानकेंद्राचा संवेदनशील मतदानकेंद्र निश्चित करताना विचार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत १०८ संवेदनशील मतदानकेंदे्र होती. नवीन निकषामुळे त्यात दोनशेपर्यंत वाढ झाली आहे. एखाद्या मतदानकेंद्रात सर्वांत कमी मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र असेल व त्या केंद्रावर सिंगल व्होटरची संख्या अधिक असणारे केंद्र संवेदनशील ठरविण्यात येते. तसेच ज्या मतदानकेंद्रात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असेल व झालेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान एकाच उमेदवाराला झालेले असेल तर त्याचा समावेश संवेदनशील केंद्राच्या यादीत होतो. आयोगाच्या या निकषानुसार मतदान केंद्रांचे सर्वेक्षण करून संवेदनशील मतदानकेंद्रे घोषित करण्यात आली आहेत.या शिवाय पोलिसांनी अथवा उमेदवारांनी काही मतदारकेंद्रांत गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अशा मतदानकेंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित केल्याने, संवेदनशील मतदारसंघात वाढ झाली आहे. या विषयी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘जिल्ह्यातील संवेदनशील मतदार केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी या मतदार केंद्रावर अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे.’ (प्रतिनिधी)