शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दोनशे मतदानकेंद्रे संवेदनशील

By admin | Updated: October 9, 2014 05:21 IST

पोलीस, प्रशासन व उमेदवारांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील २०० मतदानकेंदे्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत

पुणे : पोलीस, प्रशासन व उमेदवारांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील २०० मतदानकेंदे्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील उमेदवारांनी सुचविलेल्या ९६ मतदानकेंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. सूक्ष्म निरीक्षक व व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून या मतदान केंद्रावर नजर ठेवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांनी सुचविलेल्या मतदानकेंद्राचाही संवेदनशील मतदानकेंद्र निश्चित करताना विचार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत १०८ संवेदनशील मतदानकेंदे्र होती. नवीन निकषामुळे त्यात दोनशेपर्यंत वाढ झाली आहे. एखाद्या मतदानकेंद्रात सर्वांत कमी मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र असेल व त्या केंद्रावर सिंगल व्होटरची संख्या अधिक असणारे केंद्र संवेदनशील ठरविण्यात येते. तसेच ज्या मतदानकेंद्रात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असेल व झालेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान एकाच उमेदवाराला झालेले असेल तर त्याचा समावेश संवेदनशील केंद्राच्या यादीत होतो. आयोगाच्या या निकषानुसार मतदान केंद्रांचे सर्वेक्षण करून संवेदनशील मतदानकेंद्रे घोषित करण्यात आली आहेत.या शिवाय पोलिसांनी अथवा उमेदवारांनी काही मतदारकेंद्रांत गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अशा मतदानकेंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित केल्याने, संवेदनशील मतदारसंघात वाढ झाली आहे. उमेदवार व पोलिसांनी सूचविलेल्या ९६ संवेदनशील मतदारकेंद्रांसाठी १५० सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदानकेंद्रात पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत. मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यावर सूक्ष्म निरीक्षक मतदान केंद्राच्या परिस्थितीचा अहवाल निवडणूक निरीक्षकांना त्याच दिवशी पाठविणार आहेत. तसेच या केंद्राचे छायाचित्रणही केले जाणार आहे तर १०४ मतदानकेंद्रांचे चित्रीकरण केले जाईल. या विषयी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘जिल्ह्यातील संवेदनशील मतदार केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी या मतदार केंद्रावर अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे.’ (प्रतिनिधी)