शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

एकवीस वर्षांत एकवीस आयुक्त बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:15 IST

(दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला २१ वर्षे पूर्ण) अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र व राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य ...

(दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला २१ वर्षे पूर्ण)

अभिजित कोळपे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र व राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना आहेत. तसेच दिव्यांग हक्क कायदा यांची अंमलबजावणी करून घेण्यात राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय सपशेल अपयशी ठरले आहे. राज्यातील दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडे आकडेवारी नाही. सरकारी योजना व दिव्यांग हक्क कायदा हे सर्व कागदावरच राहिले आहे, असा आरोप दिव्यांगांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या प्रहार अपंग क्रांती संघटनेने केला आहे. विशेष बाब म्हणजे २१ वर्षांत २१ आयुक्त बदलून गेले आहेत.

दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांची स्थापना १९ ऑगस्ट २००० रोजी झाली. २१ वर्षांत २१ आयुक्त बदलून गेले. म्हणजे सरासरी एक वर्षात बदली ठरलेली आहे. काही जणांनी कामात उदासीनपणा दाखवून आपले वजन वापरून इतर चांगल्या ठिकाणी बदली करून घेतली आहे, असे प्रहार अपंग क्रांती संघटनेचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अपुरा कर्मचारी वर्ग स्वंतत्र प्रशस्त कार्यालीन इमारत नसल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिव्यांगांची पुण्यात मोठी गैरसोय होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने आयुक्तांशी संपर्क साधला मात्र तो होऊ शकला नाही.

----

कोट

दिव्यांगांच्या प्रश्नासाठी स्थापन झालेल्या दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी हे राज्यातील दिव्यांगांची हेळसांड करत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिव्यांग बांधव हे पुण्यात येतात. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य हे अधिकारी-कर्मचारी करत नाही. उलट पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवत आहेत. त्याबाबत आम्ही वेळोवेळी आयुक्तांना भेटून निवेदने दिली. आंदोलनही केले. मात्र, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र आहे.

- धर्मेंद्र सातव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटना

-----

आयुक्तांकडे कोणताही प्रश्न घेऊन गेले तरी ते दुर्लक्ष करतात. ते कोणताही विषय समजून घेत नाही. त्यावर काही मार्ग काढत नाही. तक्रारींची दखल घेत नाही. वंचित घटकांना दिव्यांग कल्याण आयुक्तच जर अशी वागणूक देत असेल तर आम्ही कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उभा राहतो. वेळोवेळी आम्ही आंदोलनही केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

- सुरेखा ढवळे, प्रदेशाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटना

-----

दिव्यांगांच्या भावना...

* दिव्यांगांच्या नोकरीचा कोटा पूर्ण भरला नाही.

* दिव्यांगांना महामंडळाकडून व्यवसायासाठी तरतूद असलेली कर्जे मिळत नाही.

* दिव्यांगाना सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाते.

* राज्यातील दिव्यांगांची आकडेवारी २१ वर्षांत अद्याप तयार करता आली नाही. त्याबाबत पाठपुरावा केल्यास उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात.

* दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी स्थापन केलेले आयुक्तालयच जर त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर मग या आयुक्तालयाचा काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित होत आहे.