शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
5
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
6
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
7
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
9
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
10
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
11
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
12
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
13
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
14
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
15
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
16
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
17
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
18
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
19
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
20
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना

भोरमधील बारा गावे होणार जलयुक्त

By admin | Updated: March 21, 2016 00:34 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भोर तालुक्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. गावातील विविध प्रकारची कामे करून गावातील टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सुमारे

भोर: जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भोर तालुक्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. गावातील विविध प्रकारची कामे करून गावातील टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सुमारे १५ कोटी ४६ लाख रु. निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्ष मौसमी बर्डे यांनी सांगितले. पावसाचे पडणाऱ्या, पाणीच्या पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये. पाणी जमिनीत मुरावे आणी टंचाई दूर व्हावी म्हणून शासनाने टंचाईग्रस्त गावे, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी गावे,एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजनेत असणारी गावे, लोकसहभाग देणारी गावे व आमदार-खासदार यांनी आदर्श गाव म्हणून निवडलेली भोर तालुक्यातील गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला आहे. गावांसाठी नेडल अधिकारी नेमण्यात आला आहे. सन २०१६/१७ या वर्षासाठी १२ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. मागील वर्षी १२ गावे घेण्यात आली होती. गावात कृषी, वन, छोटेपाटबंधारे, ग्र्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागांतर्गत तर गाळ काढणे, नालाखोलीकरण, सरळीकरण, दुरुस्ती ही कामे लोकसहभागातून व सामाजिक संस्था किंवा कंपन्यांकडून विविध प्रकारची कामे करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १५ कोटी ४६ लाख रु. निधीचा अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे कृषी अधिकारी व जलयुक्त अभियानाचे सचिव सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.भोर तालुक्याच्या पश्चिम भागात दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे या भागातील अधिकाधिक गावांची निवड जलयुक्त शिवार योजनेत करून निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर मात करता येऊन या भागातील अनेक गावांतील टंचाई दूर करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावात पावसाचे पडलेले पाणी गावातच जिरवून, मुरवून, नाला खोलीकरण, सरळीकरण, समतल चर, शेततळी, ओढे, कोल्हापूर पद्धतीचे नवीन बांधणे, जुने बंधारे दुरुस्ती करणे, विहिरीतील गाळ काढणे, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्त करणे ही कामे करून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करता येऊ शकते. त्यासाठी भोरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे, खासगी उद्योजक, कंपनीवाले व गावागावांत सर्व विभागाचे प्रमुख व लोकांच्या बैठका घेऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी करून गावातील टंचाईचा आढावा घेऊन आराखडा तयार करून विविध विभागांना पाठवून त्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. (वार्ताहर)