शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
3
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
6
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
7
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
8
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
9
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
10
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
11
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
13
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
14
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
15
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
16
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
17
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
18
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
19
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
20
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

भोरमधील बारा गावे होणार जलयुक्त

By admin | Updated: March 21, 2016 00:34 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भोर तालुक्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. गावातील विविध प्रकारची कामे करून गावातील टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सुमारे

भोर: जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भोर तालुक्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. गावातील विविध प्रकारची कामे करून गावातील टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सुमारे १५ कोटी ४६ लाख रु. निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्ष मौसमी बर्डे यांनी सांगितले. पावसाचे पडणाऱ्या, पाणीच्या पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये. पाणी जमिनीत मुरावे आणी टंचाई दूर व्हावी म्हणून शासनाने टंचाईग्रस्त गावे, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी गावे,एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजनेत असणारी गावे, लोकसहभाग देणारी गावे व आमदार-खासदार यांनी आदर्श गाव म्हणून निवडलेली भोर तालुक्यातील गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला आहे. गावांसाठी नेडल अधिकारी नेमण्यात आला आहे. सन २०१६/१७ या वर्षासाठी १२ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. मागील वर्षी १२ गावे घेण्यात आली होती. गावात कृषी, वन, छोटेपाटबंधारे, ग्र्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागांतर्गत तर गाळ काढणे, नालाखोलीकरण, सरळीकरण, दुरुस्ती ही कामे लोकसहभागातून व सामाजिक संस्था किंवा कंपन्यांकडून विविध प्रकारची कामे करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १५ कोटी ४६ लाख रु. निधीचा अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे कृषी अधिकारी व जलयुक्त अभियानाचे सचिव सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.भोर तालुक्याच्या पश्चिम भागात दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे या भागातील अधिकाधिक गावांची निवड जलयुक्त शिवार योजनेत करून निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर मात करता येऊन या भागातील अनेक गावांतील टंचाई दूर करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावात पावसाचे पडलेले पाणी गावातच जिरवून, मुरवून, नाला खोलीकरण, सरळीकरण, समतल चर, शेततळी, ओढे, कोल्हापूर पद्धतीचे नवीन बांधणे, जुने बंधारे दुरुस्ती करणे, विहिरीतील गाळ काढणे, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्त करणे ही कामे करून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करता येऊ शकते. त्यासाठी भोरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे, खासगी उद्योजक, कंपनीवाले व गावागावांत सर्व विभागाचे प्रमुख व लोकांच्या बैठका घेऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी करून गावातील टंचाईचा आढावा घेऊन आराखडा तयार करून विविध विभागांना पाठवून त्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. (वार्ताहर)