शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सोलापूरला पाणी बंद करा

By admin | Updated: May 13, 2017 04:27 IST

सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून दरवर्षी सोडण्यात येणारे उजनी धरणातील २२ टीएमसी

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून दरवर्षी सोडण्यात येणारे उजनी धरणातील २२ टीएमसी पाणी बंद करण्यात यावे, या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात ते याचिका दाखल करणार आहेत.पळसदेवचे धरणग्रस्त प्रवीण काळे, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड गावचे निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. कापसे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, उजनीच्या मूळ आराखड्यात भीमा नदीत पाणी सोडता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. तथापि नियम कायदा धाब्यावर बसवून केवळ पुढाऱ्यांच्या दबावामुळे अधिकारी पाणी सोडत आहेत. सोलापूर शहराला पिण्यासाठी जे पाणी लागत आहे. ते जलवाहिनी टाकून घेऊन जावे, असे लेखी आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण दरवर्षी सोलापूर महानगरपालिकेला लेखी आदेश देत आहे. मात्र तशी कार्यवाही महानगरपालिका करत नाही.वास्तविक पाहता सोलापूर शहराला वर्षाला साधारण दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यापैकी एक टीएमसी पाणी सध्या रोज नळपाणी पुरवठा योजनेमधून जाते. केवळ एक टीएमसी पाण्यासाठी जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल २२ टीएमसी पाणी दरवर्षी भीमा नदीत सोडले जाते. ते बंद करण्यात यावे, असे सांगून त्या ऐवजी नळपाणी पुरवठा योजना तयार करुन, सोलापूरला जेवढे पाणी लागते तेवढे घेऊन जावे, त्यास आमची हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.