शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरला पाणी बंद करा

By admin | Updated: May 13, 2017 04:27 IST

सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून दरवर्षी सोडण्यात येणारे उजनी धरणातील २२ टीएमसी

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून दरवर्षी सोडण्यात येणारे उजनी धरणातील २२ टीएमसी पाणी बंद करण्यात यावे, या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात ते याचिका दाखल करणार आहेत.पळसदेवचे धरणग्रस्त प्रवीण काळे, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड गावचे निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. कापसे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, उजनीच्या मूळ आराखड्यात भीमा नदीत पाणी सोडता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. तथापि नियम कायदा धाब्यावर बसवून केवळ पुढाऱ्यांच्या दबावामुळे अधिकारी पाणी सोडत आहेत. सोलापूर शहराला पिण्यासाठी जे पाणी लागत आहे. ते जलवाहिनी टाकून घेऊन जावे, असे लेखी आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण दरवर्षी सोलापूर महानगरपालिकेला लेखी आदेश देत आहे. मात्र तशी कार्यवाही महानगरपालिका करत नाही.वास्तविक पाहता सोलापूर शहराला वर्षाला साधारण दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यापैकी एक टीएमसी पाणी सध्या रोज नळपाणी पुरवठा योजनेमधून जाते. केवळ एक टीएमसी पाण्यासाठी जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल २२ टीएमसी पाणी दरवर्षी भीमा नदीत सोडले जाते. ते बंद करण्यात यावे, असे सांगून त्या ऐवजी नळपाणी पुरवठा योजना तयार करुन, सोलापूरला जेवढे पाणी लागते तेवढे घेऊन जावे, त्यास आमची हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.