शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

सोलापूरला पाणी बंद करा

By admin | Updated: May 13, 2017 04:27 IST

सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून दरवर्षी सोडण्यात येणारे उजनी धरणातील २२ टीएमसी

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून दरवर्षी सोडण्यात येणारे उजनी धरणातील २२ टीएमसी पाणी बंद करण्यात यावे, या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात ते याचिका दाखल करणार आहेत.पळसदेवचे धरणग्रस्त प्रवीण काळे, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड गावचे निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. कापसे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, उजनीच्या मूळ आराखड्यात भीमा नदीत पाणी सोडता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. तथापि नियम कायदा धाब्यावर बसवून केवळ पुढाऱ्यांच्या दबावामुळे अधिकारी पाणी सोडत आहेत. सोलापूर शहराला पिण्यासाठी जे पाणी लागत आहे. ते जलवाहिनी टाकून घेऊन जावे, असे लेखी आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण दरवर्षी सोलापूर महानगरपालिकेला लेखी आदेश देत आहे. मात्र तशी कार्यवाही महानगरपालिका करत नाही.वास्तविक पाहता सोलापूर शहराला वर्षाला साधारण दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यापैकी एक टीएमसी पाणी सध्या रोज नळपाणी पुरवठा योजनेमधून जाते. केवळ एक टीएमसी पाण्यासाठी जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल २२ टीएमसी पाणी दरवर्षी भीमा नदीत सोडले जाते. ते बंद करण्यात यावे, असे सांगून त्या ऐवजी नळपाणी पुरवठा योजना तयार करुन, सोलापूरला जेवढे पाणी लागते तेवढे घेऊन जावे, त्यास आमची हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.