शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तुळशीबाग, मंडई कॅशलेसच्या दिशेने

By admin | Updated: January 2, 2017 02:38 IST

नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनतुटवड्यामुळे रोखीने व्यवहार करण्यावर बंधने आली. त्याचा परिणाम व्यापारावर होत असल्याने लहान विक्रेत्यांनी नाइलाजास्तव कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

पुणे : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनतुटवड्यामुळे रोखीने व्यवहार करण्यावर बंधने आली. त्याचा परिणाम व्यापारावर होत असल्याने लहान विक्रेत्यांनी नाइलाजास्तव कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. शहरातील गजबजीचे आणि गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीबागेतील आणि मंडईतील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक विक्रेत्यांचे व्यवहार पेटीएम आणि स्वाइप मशिनच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे तुळशीबाग आणि मंडईचा प्रवास कॅशलेसच्या दिशेने सुरू झाल्याचे दिसून आले.नोटाबंदीच्या ५0 दिवसांनंतरही नागरिकांच्या हातात सुट्टे पैसे पडले नाहीत. केवळ ग्राहकांनाच नाही तर विक्रेत्यांनाही नाईलाज म्हणून कॅशलेस व्यवहार करावे लागत आहेत. केंद्र शासनानेही कॅशलेस व्यवहाराबात केलेल्या जागृतीला काहीसा सकारात्मक प्रतिसाद तुळशीबागेतील आणि मंडईतील विक्रेत्यांकडून दिला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. तुळशीबागेतील छोट्या व्यावसायिकांना कॅशलेस व्यवहार करणे खरंच शक्य आहे का? याचा आढावा घेतला असता तुळशीबागेतील ५० टक्क्यांहून अधिक व्यावसायिक स्वत: किंवा इतरांच्या मदतीने कॅशलेस व्यवहार करत असल्याचे दिसून आले. ग्राहकांची गैरसोय होत असल्याने त्यांनी कॅशलेस साधनांचा वापर करत असल्याचे तुळशीबागेतील विक्रेत्यांनी सांगितले. परंतु, जे व्यावसायिक कॅशलेस व्यवहाराबाबत अज्ञानी आहेत, ज्यांना स्मार्ट फोन वापराबाबत फारशी माहिती नाही, अशा व्यावसायिकांकडून रोखीने व्यवहार करणे योग्य असल्याचे सांगितले. मंडईतील विक्रेते कॅशलेस व्यवहार करत असले तरी मोठे व्यापारी त्यांच्याकडून रोख रकमेची मागणी करत आहेत.