शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

तुकोबांच्या पालखीला निरोप, बारामतीकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:59 IST

जगद्गुुरू संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बारामतीकडे रवाना झाला. गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता वासुंदे गुंजखिळा या ठिकाणी समस्त दौंड तालुक्यातील हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने तुकोबारायांना निरोप दिला.

वासुंदे : जगद्गुुरू संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बारामतीकडे रवाना झाला. गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता वासुंदे गुंजखिळा या ठिकाणी समस्त दौंड तालुक्यातील हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने तुकोबारायांना निरोप दिला.या वेळी दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे, पोलीस उपअधीक्षक गणेश मोरे, दौंड पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड, उपसभापती प्रकाश नवले, सुशांत दरेकर, नितीन दोरगे, महावितरणचे उपअभियंता मिलिंद डोंबाळे, दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, यवतचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे, कुरकुंभ प्रा. आरोग्य केंद्राचे डॉ. राजेंद्र पाखरे, पुरवठा अधिकारी राजेंद्र म्हस्के वासुंदे गावाच्या सरपंच नंदा जांबले, उपसरपंच दिलीप जगताप, मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, तुकोबारायांचा पालखी सोहळा वरवंड मुक्काम आटोपून पाटसला विसावला. त्यानंतर या पालखीमार्गावरील नागमोड्या रोटी घाटाच्या पायथ्याशी ११.३०च्या सुमारास आल्यानंतर तब्बल ५ बैलजोड्यांच्या साह्याने तुकोबारायांचा जयघोष करीत १ वाजून २० मिनिटांनी रोटी घाटमाथ्यावर आला. सोहळा घाटमाथ्यावर आल्यानंतर आरती घेण्यात आली. या वेळी संपूर्ण रोटी घाट व परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. सोहळा रोटी गावात आल्यानंतर रोटीच्या सरपंच तेजस्विनी शितोळे, उपसरपंच विलास शितोळे व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. पुढे हिंगणीगाडा येथे हा सोहळा आल्यानंतर सरपंच सिंधूबाई खोमणे, उपसरपंच विनोद गायकवाड व ग्रामस्थांनी स्वागत केले. मजल-दरमजल करीत पालखी सोहळा वासुंदेत दाखल झाल्यानंतर सरपंच नंदा जांबले, उपसरपंच दिलीप जगताप व ग्रामस्थांनी स्वागत केले. या वेळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यानच्या काळात विविध ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या वतीने वारकरी भक्तांसाठी चहा व अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.दोन दिवसांचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीला दौंड तालुक्यामधून निरोप देण्यात आला. या दोन दिवसांच्या मुक्कामामध्ये शेकडो भाविकांनी सश्रद्ध मनाने पादुकांचे दर्शन घेतले. पंढरीची वारी अनुभवण्यासाठी भाविकांनी वारकऱ्यांची शक्य तेवढी मनोभावे सेवा केली.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा