शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

स्मारकासाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: March 27, 2017 02:39 IST

ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य झाले व त्यांनी भेटी दिल्या, त्या ठिकाणांचा विकास करण्यासाठी

लोणावळा : ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य झाले व त्यांनी भेटी दिल्या, त्या ठिकाणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बाबासाहेबांना अभिप्रेत संकल्पना प्रत्यक्षात आणू, असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. आॅल इंडिया भिक्खू संघ यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म महाअधिवेशनात बडोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले, आमदार बाळा भेगडे, भदंत महाबोधी डॉ. राहुल बोधी महाथेरो, भदंत पघ्यादीपजी, भदंत विरत्न थेरो, भदंत विनय बोधी थेरो, रिपाइंचे प्रदेश महामंत्री अविनाश महातेकर, पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, सुनील शेळके, नगरसेवक दिलीप दामोदरे, अनिता पवार, पंचायत समिती सभापती गुलाब म्हाळसकर, रिपाइंचे नेते गणेश गायकवाड, संजय आडसुळे, लक्ष्मण भालेराव, चंद्रकांता सोनकांबळे, शांताराम कदम आदी उपस्थित होते.शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा भिक्खू संघाने जगभरात प्रचार व प्रसार करावा,असे मत केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आमदार भेगडे म्हणाले, ‘‘मावळ तालुक्यातील देहूरोड येथील दीक्षाभूमी व तळेगाव येथील डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या विकासासाठी कालच राज्य शासनाने दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे, आॅल इंडिया भिक्खू संघाचे मुख्यालय असलेल्या गया येथे २५ कोटी रुपयांचे अद्ययावत बुद्धविहार उभारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. महाअधिवेशनाचे आयोजक भदंत डॉ. राहुल बोधी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. २२ देशांतील धर्मगुरू व प्रतिनिधी सहभागी झाले होते. (वार्ताहर)रामदास आठवले : संविधानामुळे जाती-धर्म एकत्रआठवले म्हणाले, ‘‘मला बौद्ध धर्माचा अभिमान आहे. मात्र, मी सर्व जाती-धर्माचा आदर करतो. कोणी कोणता धर्म स्वीकारायचा, कोणाचे पालन करायचे यांचे प्रत्येकांना स्वातंत्र्य आहे. भारत हा हिंदू देश असला, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या देशात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत. सम्राट अशोक हे क्षत्रिय होते. मात्र, त्यांनी शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व प्रचार केला. डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जगभरात मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रसार झाला.