शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराचा विद्यार्थ्यांना होतोय त्रास

By admin | Updated: February 11, 2017 02:21 IST

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर धरला आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार सुरू करण्यात आला आहे.

रावेत : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर धरला आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार सुरू करण्यात आला आहे. यामध्ये रिक्षांसह विविध वाहनांवरून लाऊड स्पीकरवरून उमेदवारांचा गल्ली-बोळात प्रचार सुरू आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही ध्वनिक्षेपकावरून प्रचार करण्यात येत असून, ध्वनिमर्यादेचे उल्लंघनही होत आहे. अशाप्रकारच्या प्रचारामुळे शाळा-महाविद्यालयीन परिसरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्या आहेत आणि याच कालावधीत निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर बरेच विद्यार्थी निवडणूक प्रचारात सहभागी झालेले दिसून येत आहेत. एकंदरीत या निवडणुकीच्या वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता शैक्षणिक वर्तुळासह मनोविकारतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार सुरू आहे. जाहिरात फलकांबरोबरच दूरदर्शन, वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती, पथनाट्य व लाऊडस्पीकरवरून जाहिरातींचा यात समावेश आहे. प्रामुख्याने ज्या भागात शैक्षणिक संस्था आहेत. त्या परिसरातून लाऊडस्पीकरवरून करण्यात येणाऱ्या प्रचारामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळा निर्माण होत असल्याची शिक्षकांची तक्रार आहे. याबाबत बिजलीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक चारुहास चिंचवडे यांनी सांगितले की, प्रचारात ध्वनीच्या मर्यादेचे उल्लंघन सर्रास होत आहे. तीन ते चार उमेदवारांच्या गाड्या एकत्र आल्यास गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. शाळा-महाविद्यालयांजवळ एकापेक्षा अधिक प्रचाराच्या गाड्या आल्यास लाऊडस्पीकरवरील आवाजाच्या गोंगाटामुळे विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होत आहे. शाळा-महाविद्यालयाच्या मार्गावर असणाऱ्या उमेदवारांच्या जाहिरातफलकांचेही विद्यार्थ्यांना आकर्षण वाटत आहे. बोर्डाच्या तोंडी, प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा आहेत. त्यातच महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गल्ली-परिसरातील राजकीय वातावरणाचा शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बारावी आणि दहावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. या परीक्षेचा विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. परंतु प्रचाराच्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. तसेच शिक्षकांना निवडणुकीचे प्रशिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशी पालकांची तक्रार आहे. (वार्ताहर)