शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

प्रचाराचा विद्यार्थ्यांना होतोय त्रास

By admin | Updated: February 11, 2017 02:21 IST

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर धरला आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार सुरू करण्यात आला आहे.

रावेत : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर धरला आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार सुरू करण्यात आला आहे. यामध्ये रिक्षांसह विविध वाहनांवरून लाऊड स्पीकरवरून उमेदवारांचा गल्ली-बोळात प्रचार सुरू आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही ध्वनिक्षेपकावरून प्रचार करण्यात येत असून, ध्वनिमर्यादेचे उल्लंघनही होत आहे. अशाप्रकारच्या प्रचारामुळे शाळा-महाविद्यालयीन परिसरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्या आहेत आणि याच कालावधीत निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर बरेच विद्यार्थी निवडणूक प्रचारात सहभागी झालेले दिसून येत आहेत. एकंदरीत या निवडणुकीच्या वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता शैक्षणिक वर्तुळासह मनोविकारतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार सुरू आहे. जाहिरात फलकांबरोबरच दूरदर्शन, वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती, पथनाट्य व लाऊडस्पीकरवरून जाहिरातींचा यात समावेश आहे. प्रामुख्याने ज्या भागात शैक्षणिक संस्था आहेत. त्या परिसरातून लाऊडस्पीकरवरून करण्यात येणाऱ्या प्रचारामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळा निर्माण होत असल्याची शिक्षकांची तक्रार आहे. याबाबत बिजलीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक चारुहास चिंचवडे यांनी सांगितले की, प्रचारात ध्वनीच्या मर्यादेचे उल्लंघन सर्रास होत आहे. तीन ते चार उमेदवारांच्या गाड्या एकत्र आल्यास गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. शाळा-महाविद्यालयांजवळ एकापेक्षा अधिक प्रचाराच्या गाड्या आल्यास लाऊडस्पीकरवरील आवाजाच्या गोंगाटामुळे विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होत आहे. शाळा-महाविद्यालयाच्या मार्गावर असणाऱ्या उमेदवारांच्या जाहिरातफलकांचेही विद्यार्थ्यांना आकर्षण वाटत आहे. बोर्डाच्या तोंडी, प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा आहेत. त्यातच महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गल्ली-परिसरातील राजकीय वातावरणाचा शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बारावी आणि दहावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. या परीक्षेचा विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. परंतु प्रचाराच्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. तसेच शिक्षकांना निवडणुकीचे प्रशिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशी पालकांची तक्रार आहे. (वार्ताहर)