शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी पुण्यात तिरंगी लढत

By admin | Updated: November 6, 2016 04:41 IST

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांचे मन वळविण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश आले

पुणे : विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांचे मन वळविण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश आले; मात्र तांत्रिकदृष्ट्या त्यांचा अर्ज राहणार आहे. मनसे उमेदवाराचा बाद झालेला अर्ज आणि शिवसेनेची माघार, यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. विधान परिषदेसाठी दहापैकी पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने, आता पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार अनिल भोसले, काँगे्रसचे संजय जगताप, भाजपाचे अशोक येनपुरे, राष्ट्रवादी काँगे्रसचे बंडखोर विलास लांडे आणि अपक्ष उमेदवार यशराज पारखी या पाच उमेदवारांचा समावेश आहे; मात्र, लांडे यांनी आपला अर्ज तांत्रिकदृष्ट्या राहिला असून, आपण अनिल भोसले यांचाच प्रचार करणार असल्याचे सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवारी अखेरचा दिवस होता. सकाळी दहा ते दुपारी २ वाजेपर्यंत एकही उमेदवार मघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकला नाही. दुपारी दोन नंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक केदार (गणेश) गायकवाड माघारी घेण्यासाठी आले. गायकवाड यांच्या माघारीसाठी खासदार संजय काकडे व जगताप जातीने हजर होते. त्यानंतर खेड तालुक्याचे भाजप अध्यक्ष अतुल देशमुख यांनी पुढाकार घेऊन आळंदीचे नगरसेवक बापू थिगळे व चाकणचे नगरसेवक आॅड.प्रकाश गोरे यांचे अर्ज मागे घेतले. तर काँगे्रसचे अधिकृत उमेदवार संजय जगताप, शहरध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड व काँगे्रस पक्षातील काही वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोपाळ तिवारी यांनी आपला अर्ज मागे घेतला. तिवारी यांच्या माघारी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जगताप यांच्यासह काँगे्रसचे सर्वच नेते पावणे चार वाजे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये तळ ठोकून होते. शिवसेनेचे ज्ञानेश्वर खंडागळे यांनी देखील तीनला पाच मिनिटी बाकी असताना आपला अर्ज मागे घेतला. भाजपने काही खेळी करत अधिकृत उमेवाराचा अर्ज मागे घेतला असता तर शिवसेना आपला अर्ज कायम ठेवणार होती, असे खंडागळे यांनी स्पष्ट केले.लांडे यांचे माघारीनाट्य... विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसचे बंडखोर उमेदवार विलास लांडे आपला अर्ज मागे घेणार किंवा नाही, याकडे लक्ष लागले होते. माघारीची मुदत संपण्यापूर्वी काही मिनीट अगोदर लांडे यांचा प्रतिनिधी माघारीचे पत्र घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाला; परंतु लांडे यांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठी संबंधित व्यक्तींची अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करीत असल्याचे लेखी पत्र देणे आवश्यक होते. संबंधित प्रतिनिधीने हे पत्र न दिल्याने, त्याचा अर्ज घेण्यात आला नाही. यामुळे अखेर निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार शिल्लक राहिले.