शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

आदिवासी विद्यार्थ्यांचा घोडेगावात तीन दिवसांपासून ‘ठिय्या’

By admin | Updated: November 5, 2014 05:41 IST

अचानक केशवनगर (पुणे) येथे हलविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतल्यामुळे आदीवासी विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

घोडेगाव : काळेवाडी (पिंपरी) येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न देता, अचानक केशवनगर (पुणे) येथे हलविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतल्यामुळे आदीवासी विद्यार्थी संतप्त झाले आहेत. ६५ विद्यार्थ्यांनी घोडेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दालनात ३ नोव्हेंबरपासून पासून ‘धरणे आंदोलन’ सुरू केले आहे. या कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी टी. एम. पिचड यांनी अजूनही कोणतीही दखल घेतली नसून, दि. ५ रोजी सकाळपर्यंत प्रकल्प अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली नाही, तर प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या सदस्य विद्यार्थ्यांनी लेखी निवेदनाद्वारे सांगितले आहे. पुणे शहरात आदिवासी मुलांसाठी मांजरी, शेवाळवाडी, येवलेवाडी, हडपसर, कोरेगाव पार्क व काळेवाडी फाटा या सहा ठिकाणी वसतिगृह आहेत. यातील काळेवाडी, पुणे हे वसतिगृह मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना सोयीस्कर आहे; परंतु हे वसतिगृह प्रकल्प कार्यालयाने केशवनगर येथे हलविण्याचा निर्णय घेतला. काळेवाडीचे वसतिगृह पुण्याच्या बाहेर केशवनगर येथे नेऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाशी अनेकवेळा पत्रव्यवहार करून संपर्क साधला; परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.या वसतिगृह जागामालकाने पाणी व जेवण बंद केले, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले. येथे १४५ विद्यार्थी राहतात. यातील अनेक विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा सुरू आहे. तसेच, पहिले शैक्षणिक सत्र संपले नसतानाही अधेमधेच जागा बदलण्याचा प्रकल्प कार्यालयाने घातलेला घाट अतिशय अन्यायकारक आहे. काळेवाडी परिसरातच जागा विद्यार्थ्यांना सोयीस्कर असून, येथे जागा मिळेपर्यंत हे वसतिगृह हलवू नये, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. प्रकल्प अधिकरी टी. एम. पिचड अथवा कोणताही अधिकारी त्यांच्याशी चर्चेला आला नाही, त्यामुळे हे विद्यार्थी प्रकल्प अधिकाऱ्याच्या दालनातच बसून आहेत. दोन रात्र विद्यार्थी प्रकल्प अधिकाऱ्याच्या दालनातच झोपले. तसेच, एसएफआय संघटनेचे गणपत घोडे, सोमनाथ निर्मळ आदी विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्याच्या पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजी केली. दरम्यान, दोन दिवसांत अनेक संघटना व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली. (वार्ताहर)