शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा ‘रास्ता रोको’

By admin | Updated: January 23, 2016 02:36 IST

पडकईचे थकीत रक्कम द्या, रीडिंगप्रमाणे वीजेची बिलं काढा आदी मागण्या करीत आंबेगाव तालुक्यातील आदीवासींनी शुक्रवारी

तळेघर : पडकईचे थकीत रक्कम द्या, रीडिंगप्रमाणे वीजेची बिलं काढा आदी मागण्या करीत आंबेगाव तालुक्यातील आदीवासींनी शुक्रवारी मंचर भीमाशंकर रस्त्यावर तळेघर येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला. अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या आंबेगाव तालुका संघटनेच्या वतीने विविध समस्यांबाबत हे आंदोलन केले. रॅली काढत तब्बल दोन तास रस्त्यावर ठिय्या मारला. रीडिंग न घेता अवास्तव वीज बिले बंद करून रीडिंगप्रमाणे बिल देण्यात यावे. बिल कमी करण्यासाठी पहिल्या गुरुवारी तळेघर येथे अधिकारी नेमण्यात यावा. पेन्शनधारकांसाठी तलाठ्याच्या पंचनामा ही जाचक अट रद्द कराव्यात, आदिवासी भागामध्ये बी.एस.एन.एल. कंपनीचा अनागोंदी कारभार बंद करून नियमित विस्कळित होणारी सेवा सुरळीत व्हावी. आदिवासी भागातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजना सुरू करावी. आदिवासी भागांमध्ये तलाठी, ग्रामसेवक यांच्या चालणाऱ्या मनमानी कारभारांना त्वरित आळा बसावा. आदी मागण्या यावेळी केल्या. या रास्ता रोकोसाठी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण, आहुपे खोऱ्यातील तमाम आदिवासी बांधव उपस्थित होते. या वेळी कामगार तलाठी एम. जे. सुडीत, महावितरणाचे प्रमोद मारबते, कृषी खात्याचे डी. एम. गायकवाड यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या वेळी अखिल भारतीय किसान सभा आंबेगाव तालुका उपाध्यक्ष राजेंद्र घोडे, सचिव अशोक पेकारी, अशोक जोशी, पाटणचे सरपंच महादू मावळे, मच्छिंद्र कढण, बबन मावळे, दिलीप मुदगुण उपस्थित होते. (वार्ताहर)दीड वर्ष होऊनही पडकईचे पैैसे नाहीतआदिवासी भागांमध्ये आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्याकडून आदिवासी भागात शेतीच्या कामासाठी कृषी विभाागामार्फत पडकई ही योजना राबविली जाते. सन २०१३-१४ या वर्षामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अंदाजपत्रक तयार करून योजना मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना कामे करावयास सांगितली. शेतकऱ्यांनी कामे पूर्ण करूनही दीड वर्षामध्ये अद्यापही त्यास पैसै मिळाले नाहीत. पैसे न मिळाल्यामुळे त्या भागाताील आदिवासी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मजूर पैशांसाठी शेतकऱ्यांच्या वारंवार दारात आल्यामुळे शेतकऱ्यांनी बैल, म्हैस, सोने तारण ठेवून कर्ज काढून मजुरांचे पैसे दिले आहेत. या शेतकऱ्यांना पडकईचे लवकरात लवकर पैसे मिळावेत.